Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी सिद्धिविनायक विद्यालय , नोवातियार इलेक्ट्रिकल्स व डिजिटल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त सिद्धिविनायक विद्यालय परिसरात स्वच्छता अभियानची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका डॉक्टर अमृता सोनवणे नोवातियार इलेक्ट्रिकल्स व डिजिटल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत कवटे, समीर दाभोळकर, खुशबू ठाकूर, पी एस. पाटील, संदीप पाटील, रेखा सपकाळे, सुरक्षा अधिकारी गुलाबराव महाजन, मुख्याध्यापक आर. पी. खोडपे ,गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छता पंधरवडा निमित्त विद्यालयात प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. प्रश्नमंजुषा कार्यक्रमातून खुशबू ठाकूर यांनी स्वच्छता विषयावर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून उत्तराच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व विशद करून सांगितले. तसेच विद्यालयातील केवल पाटील, कृष्णा सपकाळे,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी माजी आमदार व मनसे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.३० सप्टेंबर रोजी जळगाव तालुका कंडारी येथील वाघुर धरण परिसरात मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महाराष्ट्र मच्छीमार सहकारी संस्था जळगाव व कृषी तंत्र विद्यालय,डिक्साई यांनी केले होते. त्यानिमित्त मत्स्य व्यवसायाबद्दल विविध माहिती देण्यात आली. युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, मत्स्य व्यवसायाची संबंधित प्रधानमंत्री मत्स्यसंपदा अंतर्गत शासनाच्या योजनांची माहिती देणे, मत्स्य व्यवसायाला मिळणारा अनुदानाबद्दल माहिती देणे, मत्स्य व्यवसाय करतांना घ्यावयाची काळजी व वाघूर धरणाच्या गावालगतच्या तरुणांना मत्स्य व्यवसायातून रोजगार उपलब्ध कसा करता येईल याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील नामांकित त्रिमूर्ति शिक्षण संस्थेत “गणेशोत्सव व फार्मसी डे” कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. दहा दिवसाच्या गणेशोत्सवमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी त्रिमुर्तीचा राजा विराजमान झाले. श्रींची स्थापना त्रिमुर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव नियोजन मंडळाचे सदस्य मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. दुसऱ्या दिवशी श्रींची आरती त्रिमुर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. चौथ्या दिवशीच्या आरती धरणगांव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या हस्ते करण्यात आली. सातव्या दिवशी श्रींची आरती महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ सुकाणू समिति सदस्य भरत अमळकर यांच्या हस्ते…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी “स्वच्छताही सेवा” या मोहिमे अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी रविवार दि.१ ऑक्टोबर रोजी बांभोरी आणि विद्यापीठ परीसरात श्रमदान केले. या मोहिमेचे नेतृत्व कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी केले. या मोहिमेला बांभोरी ग्राम पंचायतीने सहकार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छताही सेवा ही मोहिम राबविण्याचे आवाहन देशवासींयांना केले होते. त्या मोहिमेला प्रतिसाद देत रविवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बांभोरी परिसरात शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी स्वच्छता केली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ वित्त व लेखा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजसा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्ताने आयोजीत ‘अहिंसा सद् भावना शांती यात्रा’ २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून निघून पंडीत जवाहरलाल नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रा येईल. या सद्भावना शांती यात्रेत पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जलप्रदूषण रोखण्यासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरेक्ट क्लबच्या विध्यार्थ्यातर्फे गणेशोत्सवात ‘निर्माल्य संकलन व विघटन’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विध्यार्थ्यानी शहरातील मेहरूण तलाव परिसरात जाऊन स्वच्छता केली. तसेच गणेशोत्सव काळातील जमा झालेले निर्माल्य व घरगुती गणपती जवळील निर्माल्य संकलित करून विघटन करण्यात आले. गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेले फुले, दुर्वा, फुलांचे हार पाण्यात टाकले जातात. त्यामुळे जलप्रदूषण होते. हे टाळून या उपक्रमामुळे निर्माल्याचे योग्य पद्धतीने विघटन करून पावित्र्य राखले गेले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. गणपती विसर्जनाला येणारे भाविक…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावसह देशभरात गुरुवारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. शहरातील मेहरुण तलाव परिसरात विसर्जनानंतर झालेली घाण, विखुरलेले निर्माल्य संकलन करून परिसर स्वच्छ करण्याचे कार्य नेहरू केंद्र जळगावतर्फे करण्यात आले. उपक्रमासाठी श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे सहकार्य लाभले. जळगाव शहरातील मेहरुण तलावात शहरासह परिसरातील सर्व लहान मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत असते. गुरुवारी तलावात गणेश मूर्ती विसर्जन करताना अनेकांनी निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा तलाव परिसरातच टाकला होता. तलाव आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी जळगाव शहर मनपातर्फे विविध संस्थांना निवेदन पाठविण्यात आले होते. भारत सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मेहरुण तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी स्वच्छ भारत पंधरवड्यानिमित्त दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा (SHS) थीम “कचरामुक्त भारत” उपक्रम आयोजन करण्यात आले आहे. पंधरवडयानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. त्यांचाच एक भाग म्हणून “01 तारिख, 10 वाजता, एक घंटा,” दि.01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 वा राज्यातील प्रत्येक गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सुमारे 56,786 उपक्रमांचे ग्रामीण भागात नियोजन करण्यात आले असून महाश्रमदानाकरिता सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आवाहन केले आहे. सदर पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी,बारावी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सभेसाठी जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, प्राध्यापकवृंद तसेच अकरावी,बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात शिक्षक प्रियांका मल व संदीप पाटील यांच्या प्रेझेन्टेशनने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली. यानंतर प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी अकरावी,बारावी वर्गातील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक वाढीसाठी अध्यापनाची बदललेली पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शेक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सायन्स व अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली. तसेच शिक्षकांसोबत पालकांची…

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी शहरात सालाबादाप्रमाणे अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबविला.या वेळेस उपक्रमाचे सातवे वर्ष होते. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करुन दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या मदतीतुन गोरगरीब विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात अक्षरमित्र पुस्तक, पाटी, पेंसील, वह्या, पेन, रंगपेटी, पट्टी, खोडरबर या वस्तुंचा समावेश आहे. निरंतर पाच दिवसापासून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा समारोप जिल्हा परिषद शाळा पिळोदे बु तालुका यावल येथे करण्यात आला. उपक्रमाची सुरुवात भुसावळ तालुक्यातील प्रतिभा पाटील प्राथमिक शाळा येथून झाली, त्यात नंतर मांगी तालुका रावेर जिप शाळा, भुसावळ तालुक्यातील जिप शाळा खेडी या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संत…

Read More