Author: Saimat

सोयगाव :   प्रतिनिधी ब्बी हंगामातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या ई-पिक पाहणीसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या,त्यामुळे रब्बीची ई –पिक पाहणी शेतकऱ्यांना मोबाईलवर करता आलेली नसल्याचे जमाबंदी आयुक्त पुणे यांच्या लक्षात आल्यावरून त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत या प्रक्रियेला दि.२८ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्य्ता आली आहे.त्यामुळे ग्रामीण स्तरावरील कृषी अधिकारी,मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या हि बाब तातडीने लक्षात आणून द्यावी असे आदेशात म्हटले आहे. रब्बी हंगामाच्या पिक पाहणी नोंदीसाठी ई-पिक पाहणीचे १.०,०.७ हे अपडेट व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी या नवीन अपडेट व्हर्जन वरून तातडीने स्वतःच्या मोबाईलवरून ई-पिक पाहणी करून घ्यावयाची आहे.या आधी खरीप हंगामासाठी कृषी आणि महसूल कर्मचाऱ्यांना…

Read More

???????? नमस्ते ???????? ???? आज देवों के देव महादेव… नवग्रह जिनके दास है… ऐसे भोलेनाथ जी के सबसे बड़े व्रत के बारे मे आज चर्चा करेंगे ????️ धर्मसिन्धु के दूसरे परिच्छेद के अनुसार अगर किसी खास फल की इच्छा हो तो भगवान के विशेष शिवलिंग की पूजा करनी चाहिए… यहां जानिए किस धातु से बने शिवलिंग की पूजा करने से कौनसा फल मिलता है ❇️ सोने के शिवलिंग पर अभिषेक करने से सत्यलोक (स्वर्ग ) की प्राप्ति होती है ????चांदी के बने शिवलिंग पर अभिषेक करने से पितरों से मुक्ति होती है… याने पितृदोष खत्म होता है ???? मोती के…

Read More

जळगाव : प्रतिनीधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारकडून तीन कोटी रुपयांची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. तर विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शनिवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या उपक्रमाच्या आयोजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, माजी मंत्री आमदार संजय…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शेरी येथील रहिवासी तथा धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भीमराव जाधव यांनी शिवसेनेचे उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील , शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्या उपस्थिती शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. भीमराव जाधव यांचा भगवी शाल व श्रीफळ देऊन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी ज्या गावामध्ये विकासाची दिशा एकसंघपणे ठरते ते गाव समृद्ध होण्यास वेळ लगत नाही. समृद्ध गाव हाच उद्देश नजरेसमोर ठेवून गाव विकासासाठी प्रयत्नशील आहे. पालकमंत्री म्हणून किंवा माझ्या मुलांनी गावात भानगडी लावण्याचे पाप कधीही केले नाही . राजकीय पटलावर स्पर्धा होणारच पण तिचा परिणाम गावाच्या विकासावर कधीही होता कामा नये. घाणेरड्या राजकारणाचा शिरकाव गावात होऊ देऊ नका. कार्यकर्त्यांनी वडाच्या झाडाच्या पारंबी प्रमाणे नम्र राहून विकासासाठी जनतेच्या आशीर्वादाने व सहकार्याने विकासाची चालना मिळत असते. लोकार्पण झालेल्या व्यायाम शाळेत तरुणांसाठी व्यायामशाळा साहित्य उपलब्ध केले जाईल अशी ग्वाही दिली. धार – चोरगाव रस्त्यावरील ३ कोटींच्या निधीतून ३ लहान पुलांचे काम लवकरच…

Read More

जळगाव : प्रतिनीधी प्रखर राष्ट्रभक्त,स्वातंत्र्य विर समाजसुधारक, लेखक, कवी, आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि शरीराचा प्रत्येक कण मातृभूमीच्या स्वातंत्र्य आणि सेवेसाठी अर्पित करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त भाजपा तर्फे अभिवादन करण्यात आले. आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्य चौकातील गांधी उद्यानातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला (पुतळ्याला) माल्यार्पण व पूजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राजुमामा भोळे, दिल्ली येथील भाजपा कार्यालय चे प्रसिध्द आर्किटेक्ट अरविंद नांदापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी अध्यक्ष सुभाष तात्या शौचे व अरविंद नांदापूरकर यांनी विर सावरकरांनी देशासाठी दिलेल्या आहुती व योगदानाला उजाळा दिला यावेळी माजी महापौर सीमा भोळे,…

Read More

जळगाव : प्रतिनीधी केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावला यंदा राज्यस्तरीय युवा संसदचे आयोजन करण्याचा मान मिळाला होता. आयएमआर महाविद्यालयाच्या सौजन्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ७२ स्पर्धकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. राष्ट्रहिताच्या विषयांवर वक्तृत्व सादर करीत अनेकांनी उपस्थितांची मने जिंकली. राज्यातील अक्षता देशपांडे, सोनिया मिश्रा आणि करण पारीख या तीन स्पर्धकांची निवड झाली असून ते दिल्ली येथील राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. नेहरू युवा केंद्राच्या राज्यस्तरीय युवा संसदचे आयोजन महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे संचालक प्रकाशकुमार मनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयएमआर महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. युवा संसद उदघाटन कार्यक्रम अध्यक्षस्थानी खा.उन्मेष…

Read More

पाचोरा :  प्रतिनिधी अवैध वाळू वाहतुकीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाचोरा तालुक्यातील परधांडे गावातील गिरणा नदी मधील वाळूगटाचा लिलाव झाला होता मात्र तो गेल्या 20 ते 22 दिवसापासून बंद आहे. तरी या वाळूगटातून दिवसाढवळ्या वाळूची चोरी सुरू आहे ,तर  दुसरीकडे ठेका दिलेला असताना ठरवून दिल्यापेक्षा कितीतरी पटीने अवैध वाळूउपसा केला जातो. मात्र वाळू ठेका बंद केला असताना बिनधास्त पणे नदीतून रात्रीच्या वेळी पोकलेन – जीसीबी च्या साहाय्याने वाळू काढून मोठ्या प्रमाणात साठा करायचा आणि दिवसभर डंपर व ट्रॅक्टर च्या माध्यमातून वाहतूक करायची असा प्रकार सुरू असून या बाबत आचर्य व्यक्त होत आहे. नैसर्गिक संपत्तीवर दरोडा टाकत, महसुली उत्पन्न…

Read More

धर्मशाला ः वृत्तसंस्था प्रामुख्याने युवा खेळाडूंभोवती संघबांधणी करण्यात आलेला भारतीय संघ शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन लढतींच्या ट्वेन्टी-20 मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. उभय संघांत धरमशाला येथे दुसरा ट्वेन्टी-20 सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या लढतीत श्रीलंकेला 62 धावांनी धूळ चारली. आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ युवा फळीची चाचपणी करत आहे. दुसरीकडे अनेक प्रमुख खेळाडू विविध कारणास्तव संघाबाहेर गेल्यामुळे श्रीलंकेच्या चिंतेत भर पडली आहे. विंडीजविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत धावांसाठी झगडणाऱ्या इशान किशनने 89 धावांची खेळी साकारून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याशिवाय मुंबईकर श्रेयस अय्यरनेही वेगवान अर्धशतकासाह विश्वचषकाच्या दृष्टीने संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या तंदुरुस्तीबाबत…

Read More

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माजगाव येथील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील डर्टी डझन म्हणत भ्रष्ट नेत्यांविरोधात आम्ही पुरावे तपास यंत्रणांना देणार असल्याचे म्हटले. याच साऱ्या घडामोडींवरुन शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेने भाजपाची तुलना तालिबानशी केली आहे. भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणे म्हणजे तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखे असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. “भारतीय जनता पक्षाने म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण भाजपानेही युद्ध पुकारले आहे. तेही भ्रष्टाचाराविरुद्ध! केंद्रीय तपास…

Read More