जळगाव : प्रतिनिधी मुलगी अल्पवयीन असून देखील तिचे लग्न लावून दिल्याने पतीने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समाेर आला आहे. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली असून याप्रकरणी पतीसह लग्न लावून देणार्या ७ जणांविरूद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, जामनेर तालुक्यात राहणाऱ्या या १६ वर्षीय मुलीचे लग्न जून २०२१ मध्ये लावून देण्यात आले. यानंतर पतीने तीला जळगाव शहरात रहिवासाला आणले. तिच्यावर अत्याचार केले. चारीत्र्यावर संशय घेऊन तीला मारहाण केली. अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळुन अखेर या मुलीने ८ फेब्रुवारी रोजी घरातून पळून जात थेट इंदूर (मध्यप्रदेश) गाठले. नातेवाइकांचे घर…
Author: Saimat
मुंबई: प्रतिनिधी चाणक्याशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल. समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल. गुरुचं महत्त्व खूप मोठं असतं, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्रं पोस्ट करत राज्यपालांचं म्हणणं खोडून काढलं आहे. तर नाशिक जिल्हा राष्ट्रवादीने राज्यपाल हटाव मोहीम सुरू करून राष्ट्रपतींना पत्रं पाठवण्यास सुरुवात केली आहे. आता या वादात खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आपलं विधान त्वरीत मागे घ्यावे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्यामुळे आता या…
मुंबई : प्रतिनिधी विज्ञान अर्थात ‘सायन्स’हा एक केवळ शिक्षण क्षेत्रातलाच भाग नाही तर यामधून जे बदल घडतात ते देशाला दिशादर्शक ठरतात. त्यामुळे विज्ञानाला एक वेगळे महत्व आहे. काळाच्या ओघात अनेक बाबींचे महत्व कमी होते विज्ञानाच्या माध्यमातून जे संशोधन केले जाते त्याचे महत्व अधिक कोरले जाते. असेच संशोधन भारतीय (Physicist) भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केले होते. त्यामुळे सबंध देशात आज (National Science Day) विज्ञान दिवस साजरा केला जात आहे. (The Work of Researchers) संशोधकांचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना प्रेरणादायी ठरावे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या अनुशंगाने सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था एवढेच नाही तर शास्त्रज्ञ आणि…
जळगाव : प्रतिनिधी येथील इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे रविवारी २७ फेब्रुवारी रोजी घरगुती महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘इनरव्हील मेळा’चे आयोजन करण्यात आले होते. मेळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी एका गरजू मुलीला सायकल तर एका शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले आहे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेळ्याचे उदघाटन इनरव्हील क्लबच्या जिल्हा चेअरमन अश्वनी गुजराती, सहायक विश्वस्त मीनल लाठी, उद्योजिका कल्पना भालचंद्र पाटील, शिल्पा चोरडिया, डॉ. अनुराधा वानखडे राऊत यांच्या उपस्थितीत झाले. सुरुवातीला केतकी पाटील हिने गणेश वंदना सादर केली. प्रस्तावनामधून इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षा नीता परमार यांनी मेळ्याच्या आयोजनाबाबतचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील उपनगर असलेल्या पिंप्राळा परिसरातील सावखेडा रोडजवळील सोनी नगर येथील स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त उद्या दि.1 मार्च रोजी विविध धार्मीक कार्यक्रम आयोजीत करण्यातआले आहे. महाशिवरात्री निमित्त उद्या सकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान पुजारी चेतन कपोले महाराज यांच्या हस्ते ” रुद्रअभिषेक व हवन पूजा ” सोहळा पार पाडण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता महादेवाची महाआरती परिसरातील भाविकांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 3 वाजता शहरातील सुप्रसिद्ध श्री भक्ती महिला मंडळाच्या प्रियंका विशाल त्रिपाठी ” समुहसह भजन ” सादर करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता महादेवाची महाआरती होणार आहे. सायंकाळी 7 वाजता ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज…
चोपडा : प्रतिनिधी येथील अंकलेश्वर – बुरहाणपूर महामार्गावार असलेले अकुलखेडा गांवाकडे जातांना हॉटेल खेतेश्वर व हॉटेल संकेत जवळील अनधिकृत गतिरोधकांमुळे दुचाकीस्वारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सदर अनधिकृत गतिरोधक काढण्यात यावे याबाबत जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे व अकुलखेडा उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. सदर वृत्त सायंदैनिक साईमतने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आज दि.27 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबी लावून ते अनधिकृत गतिरोधक काढण्यात आले. अनधिकृत गतिरोधकांमुळे अकुलखेडा, काजीपूरा, हिंगोणे, चहार्डी, हातेड व गलंगी तसेच परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. सदर बातमीचे…
बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. सोबत जर बारावी पास असलेल्या असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळांत किंवा एथलॅटिक्स टूर्नामेन्टमध्ये राज्य किंवा देश पातळीवर ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, अशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्पोर्ट्स क्वोटामध्ये असलेल्या आणि बारावी पास झालेल्यांना सीआयएसएफ (CISF recruitment 2022) म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात हेड कॉन्स्टेबलपदासाठी नोकरीची संधी आहे. चला तर जाणून घेऊयात या नोकरीसाठी कसं, कुठे आणि कधीपर्यंत अप्लाय करता येऊ शकेल? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात भरती केली जाणार आहे. या भरतीप्रकियेला सुरुवात झाली असून याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहेत. 31 मार्चपर्यंत उमेदवारांना सीआयएसएफमधील भरती प्रक्रियेसाठी…
आचार्य चाणक्य यांची धोरणे कोणत्याही व्यक्तीला बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. जीवनात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने तुम्ही आनंदी आणि समृद्ध होऊ शकता. चला तर जाणून घेऊयात अशी संकेत ज्याद्वारे घरातील समृद्धी संपते आणि आर्थिक संकट सुरू होते. ज्या घरांमध्ये पूजा केली जात नाही. देवी लक्ष्मी येत नाही. पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे घर प्रसन्न राहते. त्यामुळे अचानक पूजेपासून दूर राहणे आर्थिक संकटाचे कारण बनू शकते. आचार्य चाणक्य म्हणतात की, घरातील वाद हे कोणत्याही कुटुंबासाठी शुभ नसतात. ज्या घरात मारामारी, भांडणे, कलह असतात त्या घरात गरिबी येते. मारामारी यामुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. कोणतेही काम करावेसे वाटत नाही.…
मुबई : प्रतिनिधी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप भारत देशात आणण्याकरिता केंद्र सरकारने मोहिम राबवली आहे. या भागमध्ये, रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन येणारे दुसरे विमान आज पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी येथील विमानतळावर युक्रेन मधील नागरिकांचे गुलाबाचे फुल देऊन यावेळी स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चेमध्ये भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीचा मुद्दा उपस्थित केला होता. या अगोदर बुखारेस्ट येथून २१९ लोकांना घेऊन पहिले विमान मुंबईमध्ये आले होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ऑपरेशन गंगा अंतर्गत बुखारेस्टमधून २५० भारतीयांना…
चोपडा : प्रतिनिधी शहरातून जाणाऱ्या धरणगाव – चोपडा रस्त्यावर आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असलेले आयसर वाहन त्यामागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात होवून या अपघातात जागीच एकाच कुटूंबातील आई व मुलगी मयत होवून वडिल व मुलगा जखमी असल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर असे की, चोपडा शहरातून धरणगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आयसर धरणगावच्या दिशेने जात असतांना आयसरच्या मागे दुचाकी होती, यावेळेस दुचाकीस्वार सरळ जात असतांना आयसरने रस्त्याच्या बाजूला वळत असतांना मागून येणारी दुचाकी आयसरच्या खाली कोसळली. या अपघातात उज्वला जगदीश मोतीराळे (वय 37) व नेहा जगदीश मोतीराळे (वय 12) या आई व मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तर दुचाकी चालक…