जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा गावाजवळील एका शेतातील गवताला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. यात एका शेतमजूर कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली आहे. महापालिकेच्या बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. कुसुंबा येथील विमानतळाच्या पुढे असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतातील गवताला अचानक लाग लागल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अवघ्या २० मिनीटात बंब घटनास्थळी पोहचला आणि ही आग विझविण्यात आली. शेतालगतच विलास पावरी (बारेला) कुटुंबिय वास्तव्याला आहे. आगी लोळमध्ये कुटुंबिय राहत असलेली झोपडी देखील…
Author: Saimat
मुंबई प्रतिनिधी – यास्मिन शेख राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आणि मित्रपक्षांची बैठक आज मुंबई येथे झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की , दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे.देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही आम्ही आणि संपूर्ण महराष्ट्र पाहतो आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातुन नवाब मलिक यांची हकालपट्टी व्हावी यासाठी आम्ही या अधिवेशनात आक्रमक भूमिका घेऊ . आणि तो घेतलाच पाहिजे ,तसे होणार नसेल तर…
मुंबई : यास्मीन शेख अधिवेशनात गोंधळ घालून तालिकाध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी निलंबित केलेल्या आमदारांचे निलंबन सर्वाच्च न्यायालयातून निलंबन रद्द झाले आहे . त्यामुळे भाजपचे १२ आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधिमंडळात येणार आहेत. ठाकरे सरकारवर नेहमीच आगपाखड करणाऱ्या या डझनभर आमदारांकडे या अधिवेशनात आता राष्ट्रवादी नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीचा कार्यक्रम सोपविल्याचे कळते. त्यामुळे निलंबनाच्या मुद्यावरून सरस ठरलेले हे आमदार महाविकास आघाडी सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या बरोबरच मराठा आरक्षण मुद्यावरून सरकारविरोधात आक्रमक झालेल्या विरोधी भाजपने अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे . तेव्हाचे तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांना त्यांच्या दालनात जाऊन शिवीगाळ केल्याचा…
मुंबई : यास्मीन शेख सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सार्वजनिक वर्गणी ठिकाण असे म्हटले तर वावगे ठरायला नको, सध्या तरी या विभागाचा कारभार या प्रमाणे सुरू असल्याचे चित्र आहे . मागील काहीदिवसांत सार्वजनिक बदल्या करून चर्चेत आलेले सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही सुधारले नाही. सुधारणार ही नाही कारण या विभागात खुद्द मंत्री मोहद्यांचे खाजगी सचिव यांचा एक हाती कारभार सुरू असून विभागाच्या सचिवांनी म्हणजेच वरिष्ठांनी देखील ‘तेरी भी चूप मेरी भी चूप ‘ धोरण स्वीकारले असल्याचे चित्र आहे . सार्वजनिक बांधकाम विभाग हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो त्यामुळे ही चर्चा कदाचित या विभागाच्या अधिकारी मंत्र्यांसाठी नवीन नसावी , मात्र…
मुंबई : प्रतिनिधी अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही आम्ही आणि संपूर्ण महराष्ट्र पाहतो आहे. अशी खोचक टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आणि मित्रपक्षांची मुंबई येथे आज बैठक झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या मंत्रिमंडळातुन नवाब मलिक यांची हकालपट्टी व्हावी यासाठी आम्ही या अधिवेशनात आक्रमक भूमिका…
धरणगाव : प्रतिनिधी आज चा सामाजिक व्यवस्थेत अडकलेला समाजाला दिशा देण्याचे महान कार्य संत व महात्मा केले असुन संताचे सातशे वर्ष पुर्वीचा ग्रंथ वाड्मयत लिहलेल्या संदेशाची हुबेहुब पुनवृती होत असुन आज ही संताचे विचार व आचार जगाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज प्रबोधनकार माईसाहेब महाराज यांनी केले. नुकत्याच येथील स्वर्गीय नामदेव महादु येवले यांचा प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त प्रवचनांच्या कार्यक्रम झाला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. आपल्या दिड तासाच्या प्रबोधनात माईसाहेब यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज,संत मुक्ताबाई यांचा सारखे संत व महात्म्यानी आजची समाज व्यवस्थेत अडकलेला समाजाला दिशा देण्याचे महान कार्य केले असल्याचे नमुद करून ते…
जळगाव : प्रतिनिधी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशातच नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातून समोर आली आहे. २४ वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून चुलत दिराने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये व सोन्याचे दागिनेही घेऊन फसवणूक झाल्याचे समजते. याप्रकरणी संशयीत चुलत दीर आणि सासू, सासऱ्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेच्या पतीचा 2020 मध्ये कोरोनाने मृत्यू झाला होता. पीडित महिलेचा पती आयटी इंजिनिअर होता. दरम्यान, पतीच्या मुत्युनंतर चुलत दीर आणि सासू, सासऱ्याने फसवणुक करण्याचा कट रचुन संगनमताने…
जळगाव : प्रतिनिधी येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे सरदार वल्लभाई पटेल चषक पर्व तिसरे अंतर्गत ‘लेवा पाटीदार प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथमच महिलांच्या क्रिकेट सामना झाला. सामन्यात सुचंद्रजी रायझिंग स्टार संघाने एक हाती विजय मिळवला. विजयी संघाला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. संघमालक पल्लवी चिरमाडे यांच्या चिरमाडे पिंक दिवास आणि संघमालक पूनम कोल्हे यांच्या सुचंद्रजी रायझिंग स्टार यांच्यामध्ये सामना झाला. हा सामना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला लेवा पाटीदार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये तीन वर्षात प्रथमच महिलांचा सामना खेळला गेला. सामन्यात संघमालक पूनम कोल्हे यांच्या विजयी सुचंद्रजी रायझिंग स्टार संघाला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. यावेळी मंचावर…
फैजपूर ता यावल : प्रतिनिधी देवाधिदेव महादेव यांची महिमा अफाट आहे. शंकर भगवान सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त महत्त्व असून महादेव म्हणजे महान देव म्हणून ओळखले जातात.त्यांचे केस मनाचे प्रतीक, त्रिशूल मनावर नियंत्रण करतो.ध्bयान शांततेचे प्रतिक आणि गळ्यातील सर्प अहंकाराचे प्रतिक असून जगातील दुष्टांचा नाश करणारा देवता म्हणून शंकर भगवान यांची ओळख आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून फैजपूर येथील रहिवासी व श्री एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेने अतिवास्तव वादी शैलीत कुंचल्याद्वारे महादेवाची पैंटींग तयार करण्यात आली असून सदर पैंटींग मध्ये पिंडेवर महादेवाचे मुख दाखवण्यात आलेले आहे. पैंटींग साठी निळ्या रंगाचा वापर करून सुंदर कलाकृती तयार…
जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने धरणगाव येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर तहसीलदार यांना निवेदन सादर केले या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मध्ये महिलांना प्रचंड सन्मान केला जात होता महिलांचा आदर केला होता महिला शत्रूची जरी असली तरी तिचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला परंतु त्याच महाराष्ट्र मध्ये अत्यंत लाजिरवाणी अशी घटना धरणगाव मध्ये वय वर्ष 65 या असणाऱ्या चंदुलाल मराठे नराधमाने वय वर्ष 6 व 8 वर्ष असणाऱ्या चिमुरड्यांवर अत्याचार केला या दोघी बालिका ची अवस्था गंभीर असूनया घटनेचा त्यांच्यावर दोघांवर परिणाम झालेला आहे जलदगती न्यायालयात लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात येईल अशी मागणी…