जळगाव प्रतिनिधी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेस संबोधित करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर माजी महापौर ललित कोल्हे,राजेश झाल्टे, उपायुक्त विद्याताई गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तरी या अभिवादन सभेत जळगाव शहरातील तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. शहर…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे छातीठोकपणे सांगणारे देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी कासावीस झाले आहे, मात्र आता ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत, असा चिमटा राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांनी काढला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी जळगाव येथे येणार आहे. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, कैलास पाटील, मनीष जैन आदी उपस्थित होते. यावेळी खडसे म्हणाले, मागील अडीच वर्षांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत…
मुंबई : प्रतिनिधी राज ठाकरे यांनी काल आपल्या उत्तर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात राज्य सरकारला अल्टीमेटमही दिला होता. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषर घेत उत्तर दिले आहे. राज्य सरकारला कुणीही अल्टीमेटम देऊ शकत नाही. ती ताकद या देशात फक्त फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती, असे राऊत यांनी सुनावले. तसेच, काल ठाण्यात वाजलेला भोंगा हा भाजपचाच होता. भाजपला महाविकास आघाडीविरोधात सरळ राजकारण करता येत नाही म्हणून त्यांनी राज ठाकरेंना पुढे आणल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. हिंदुत्व आमच्या रक्तात! हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. त्यामुळे आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये. ज्यावेळी…
चोपडा – प्रतिनिधी येथील नगरपरिषद क्षेत्रातील कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेमध्ये कर्तव्य पार पाडतांना कोरोनाची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी यांना सानुग्रह सहाय्य अनुदान देणेचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. चोपडा नगरपरिषद आस्थापनेवरील मयत कर्मचारी कै.प्रताप माधवराव बाविस्कर, शिपाई यांचे कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेत कर्तव्यावर असतांना कोव्हिड-19 चे संक्रमणामुळे मृत्यू झालेने तसेच कै.संजय जिजाबराव साळुंखे, मजुर, पाणीपुरवठा विभाग यांचे अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 चे संक्रमणामुळे मृत्यू झाल्याने त्यांचे पात्र वारसांना सानुग्रह सहाय्य अनुदान मिळणेकामी चोपडा नगरपरिषदतर्फे शासनास प्रस्ताव सादर करणेत आलेला होता. चोपडा नगरपरिषदेतर्फे शासनाकडे पाठविलेले उक्त दोन्ही मयत कर्मचारी यांचे प्रस्ताव मंजुर झाले. प्रती मयत कर्मचारी रक्कम रु.50…
जळगाव प्रतिनिधी नवजीवन शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थेतर्फे ११ एप्रिल रोजी सामूहिक व्रतबंध सोहळ्याचा कार्यक्रम राजाराम मंगल कार्यालय इंद्रप्रस्थ नगर येथे संपन्न झाला. हा सोहळा जिल्हा स्तरावर घेण्यात आला असून या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या गावांहून तेरा बटूंची उपस्थिती लाभली. नवजीवन शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थेची स्थापना २०२० मध्ये झाली असून, समाज हितासाठी अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात आले आहेत. यात परशुराम जयंती, covid-19 मध्ये गरजूंना मदत, किराणा वाटप, वृद्धाश्रमात फळ वाटप आदी कामांचा समावेश आहे. सदर संस्थेचे सात लोकांचे कार्यकारी मंडळ असून संजय लक्ष्मण जोशी, कुणाल जितेंद्र अत्रे, आनंद सुधाकर जोशी, विवेक प्रकाश जोशी, दीपक गजानन काळे, देवा दिगंबर काळे, केतन संजय…
लोणार (गुलाब शेख) लोणार येथे विज वितरण कंपनी सहायक अभियंता यांना लोणार शहर बुलढाणा जिल्हा कांग्रेस कमेटी ओबीसी विभाग शहरात होत असलेल्या भारनियमनच्या विरोधात निवेदन देण्यात आले. निवेदनात नमुद करण्यात आले कि ३ एप्रिल पासुन मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महीना सुरू झाला असुन,यामध्ये उपवास (रोजा) ठेवण्यासाठी मुस्लिम समाज सुर्य उगवण्याच्या आधी अंधारात सहेरी (जेवण) करण्यासाठी उठत असतो आणि दिवसभर उपाशी राहुन संध्याकाळी उपवास सोडत असतात,परंतु सध्या उन्हाचा पारा दिवसेदिवस वाढत आहे. रोजे ठेवणार्या बांधवांना भारनियमन होत असल्यामुळे फार त्रास सहन करावा लागत आहे. तरी महोदय साहेब आपण रमजान महीन्यामध्ये होत असलेले भारनियमन बंद करुन विज पुरवठा सुरळित ठेवावा अशी मागणी…
मुंबई : प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल ठाण्यात भव्य सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी तलवार उंचावली होती. यामुळे त्यांच्यावर याच कारणाने गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाचाही तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाषणात आक्षेपार्ह आढळल्यास याप्रकरणही गुन्हा दाखल होऊ शकते अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. उत्तरसभेआधी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली तलवार राज ठाकरे यांनी उंचावली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात तलावर उंचावल्याने मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली…
यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील सातपुडा डोंगरात अतिदुर्गम क्षेत्रातील गाडऱ्या गावातील एका आदीवासी अविवाहीत तरुणीला विषारी सर्पदंश झाल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.या संदर्भात सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार गाडऱ्या तालुका यावल या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम गावात राहणाऱ्या फुगली भाया बारेला ही22 वर्ष ही तरूणी काल दि.12 एप्रील रोजी आपल्या कुटुंबा सोबत गाडऱ्या शिवारातील आपल्या शेतात सकाळी9ते 9:30च्या सुमारास तुर कापणीचे काम करीत असतांना अचानक एका विषारी सर्याने तिच्या उजव्या हातावर दंश केला,सदर दंश करणारा साप हा अत्यंत विषारी असल्याने त्या तरूणीचा जागेवर मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.सदरची तरूणीला सर्पदंश झाल्याची माहीती मिळताच गावातील सरपंच भरत छ्तरसिंग बारेला पोलीस पाटील तेरसिंग गाठु…
मेष : आज मेष राशीचे लोकं एखादे महत्वाचे काम पूर्ण झाल्याने आनंदी राहतील. आज तुमच्यासाठी वेळ अनुकूल आहे. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. भविष्यासाठी उत्पन्नातून काही पैसे वाचवू शकता. वचन पूर्ण न केल्यामुळे मित्र नाराज होऊ शकतात. या दिवशी तुमची हुशारी दाखवून तुम्ही तुमची कामे सहज पूर्ण कराल. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. वृषभ : वृषभ राशीचे लोक आज शरीर आणि मनाने आनंदी व प्रफुल्लित राहतील. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करू शकता. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. यशासाठी कोणतीही जोखीम पत्करण्याची तयारी असेल. एकत्र काम करणाऱ्यांकडून तुम्हाला आनंद मिळेल. लोकांमध्ये सन्मान मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळेल. प्रमोशनसुद्धा…
कळवन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्री रामनवमी पासून अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात सुरू असून, पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा – सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत असून, यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. आज कामदा एकादशी सकाळची पंचामृत महापूजा मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद श्रीमती लिना बनसोड यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली या वेळी संस्थानचे व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान…