जळगाव ः प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षेच्या शेवटच्या दिवशी 645 विद्यार्थ्यांपैकी 396 विद्यार्थ्यांनी पेटची ऑनलाईन परीक्षा दिली. पाच दिवसात एकूण 2312 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दिनांक 18 ते 22 एप्रिल पर्यंत विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रात या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. एकुण 3 हजार 688 विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यासर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जात असून त्यासाठी 250 संगणकांची व्यवस्था करण्यात आली होती. एका दिवसात 4 बॅचेसमध्ये या परीक्षा झाल्या. शेवटच्या दिवशी चार बॅचेससाठी 645 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी 396 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. पाचव्या दिवशी इंग्रजी, राज्यशास्त्र, समाज कार्य, इतिहास, संरक्षणशास्त्र आणि…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी युवारंग युवक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थी कलावंतांनी वारकऱ्यांची दिंडी, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे शिबली नृत्यासह इतर कलाविष्कार दाखवत उपस्थितांवर मोहिनी घातली. विद्यार्थी कलावंतांनी विविधतेत एकात्मतेचे दर्शन घडविल्यामुळे महोत्सवाच्या परिसरात संपूर्ण भारत अवतरल्याचे दिसत होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवाच्या तिसरा दिवस समुह लोकनृत्य, शास्त्राय नृत्य, लोकसंगीत, वक्तृत्व, फोटोग्राफी, चित्रकला, इन्स्टॉलेशन, मेहंदी या कला प्रकारांचे पाचही रंगमंचावर सकाळ पासून सादरीकरणाला सुरूवात झाली. युवारंगच्या मंचावर जणू भारत अवतरला होता. खुला रंगमंच क्र.1 वर (स्वा.से.अण्णासाहेब…
जळगाव ः प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर तसेच राज्यसभा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी राज्यस्तरीय दीपस्तंभ 2022 पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.दीपस्तंभ फाउंडेशन 2009 सालापासून सेवाभावी काम करणाऱ्या तरुणांना व ज्येष्ठांना दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करत आहे.2017 पासून हे पुरस्कार स्व.डॉ.जगन्नाथ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जातात.सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे व समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. 2021-22 या वर्षासाठीचे पुरस्कार खालील प्रमाणे आहेत.संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या जेष्ठ व्यक्तीला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या वर्षाच्या जीवन गौरव पुरस्काराने विदयार्थी सहाय्यक समितीचे रमाकांत तांबोळी (पुणे) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.समाजामध्ये अतिशय कमी कालावधी मध्ये…
जळगाव : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण हे सामाजिक सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे शिक्षण आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी एकमेकांशी बोला. संवाद वाढवा. मैत्रीपूर्ण सलोखा जोपासावा. तंत्रज्ञान साक्षर व्हा. तसेच, शिस्त व नियोजनबद्ध शिक्षण घेण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन प्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व अधिष्ठाता संदेश (डीन्स ऍड्रेस) पार पडला. तसेच याचबरोबर प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तासिकादेखील सुरु झाल्या. यावेळी मंचावर उप अधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ.किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड, विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैला पुराणिक, शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ.…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील उमर्टी परिसरातून शुक्रवारी पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने चोपडा पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कारवाईत पथकाने ५ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुस, १ चारचाकी आणि २ मोबाईल तर २ जणांना अटक करण्यात आली असून दोघांनी पळ काढला आहे. असा ऐवज हस्तगत केला आहे. सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या उमर्टी भागातून जळगाव जिल्ह्यात नेहमी गावठी पिस्तूल आणि काडतुस आणले जातात. जिल्ह्यात त्याची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एक विशेष पथक देखील तयार करण्यात आले आहे.…
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असेल. तुमच्या मनात काही असेल तर ते व्यक्त करा. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबाबत अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता खरेदीसाठी दिवस चांगला आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. भविष्यासाठी उत्पन्नातून काही पैसे वाचवू शकता. वचन पूर्ण न केल्यामुळे मित्र नाराज होऊ शकतात. आज ८९% नशिबाची साथ आहे. भगवान विष्णूची पूजा करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आज चांगली माहिती मिळू शकेल. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरी चांगली राहील. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकारी तुमचा हेवा करू शकतात.…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील सोनवड रोडच्या डाव्या बाजूला एका विहिरीत अनोळखी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, सध्या ग्रामीण भागात सर्वत्र शेतीचे कामे जोरात सुरू असून संबंधित शेतात काही दिवसांपूर्वी मक्का पिकांची काढणी होऊन काम संपल्याने शेत मालक दोन तीन दिवस शेतमजूर पाणी घेण्याची विहिरीवर गेल्यामुळे संबंधित घटक उघडकीस आली. त्यानंतर धरणगाव पोलिस ठाण्यात तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस बांधवांनी स्थानिक लोकांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढून पुढील तपास पो. नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलिस कर्मचारी करीत असुन मृददेहाचा उजव्या हातावर आकाश नाव गोंदण केलेले असुन अंगात चौकडीचा निळ शर्ट…
मुंबई : प्रतिनिधी विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलनाचे हत्यार उपसलेले एसटी कर्मचारी अखेर सेवेत रूजू झाले आहेत. त्यामुळे सामान्यांची जीवनवाहिनी असलेली एसटी पुन्हा एकदा रस्त्यांवर धावू लागली आहे. एसटीच्या पटावरील एकूण 82,263 कर्मचाऱ्यांपैकी 76,962 कर्मचारी गुरुवारपर्यंत कामावर परतले आहेत. 11 हजार कर्मचारी अद्याप बडतर्फ आहेत. संपापूर्वी एसटीच्या सेवेत एकूण 92,266 कर्मचारी होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर मोठ्या प्रमाणावर बसफेऱ्या सुरू झाल्याचे दिलासादायक चित्र राज्यात दिसू लागले असून ग्रामीण भागाला मोठा आधार मिळू लागला आहे. बुधवारी महामंडळाने राज्यात 29 हजार फेऱ्या चालवल्या. यातून 17.78 लाख प्रवाशांची वाहतूक करत 11 कोटींचे उत्पन्न मिळवले, अशी माहिती महामंडळाने दिली. विलीनीकरण, वेतनवाढीसह…
धुळे / जळगाव : प्रतिनिधी धुळे जिल्हा सामाजिक, आर्थिक व शैक्षणीकदृष्टया मागासलेला आहे परंतु, विकास साधायचा असेल तर पाणी, वीज, संचार व्यवस्था व रस्ते असले तरच तेथे उद्योग व्यापार येतो. जिथे उद्योग व्यापार वाढतो तिथे विकास होतो. जिथे रोजगार येतो तेथील गरीबी दूर होते. हेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात करायचे आहे. याच दृष्टीने येत्या तीन -चार वर्षात दोन्ही जिल्ह्यातील रस्ते हे अमेरिकेच्या दर्जाचे असतील; असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना दिले. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी धुळे व जळगाव शहर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम, प्रकल्पांचे उद्घाटने, कार्यारंभ होवून राजर्षी छत्रपती शाहू नाट्यमंदिरात राष्ट्रीय महामार्ग…