जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठेचे फुलाबाई आनंदराव फडतरे स्मृती ग्रंथ पारितोषिक डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘कडीबंदी’ या कथासंग्रहास जाहिर झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे विविध वार्षिक ग्रंथ पारितोषिक दिले जातात. त्यापैकी संस्कृती प्रकाशन, पुणे यांचे पुरस्कृत ‘फुलाबाई आनंदराव फडतरे’ पारितोषिक डॉ. कोळी यांच्या कडीबंदी या कथासंग्रहासाठी जाहीर झाले आहे. येत्या 26 मे रोजी पुण्यातील एस.एम.जोशी सभागृहात प्रसिद्ध हिंदी लेखक अशोक वाजपेयी यांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. रावसाहेब कसबे हे भूषवणार आहेत. ‘कडीबंदी’ डॉ. अशोक कौतिक कोळी यांचा पाचवा कथासंग्रह आहे. यातून त्यांनी कोरोना काळातील भयावह…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी “ वृक्ष लागवडीला आर्थिक व सामाजिक विकासाशी सांगड घालून लोक चळवळीचे रुप देऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे काळाची काळाची नितांत गरज आहे “ असे कळकळीचे आवाहन हरीत शिक्षक पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र विजय लुल्हे यांनी केले.राष्ट्रीय वृक्ष दिनानिमित्त बुद्ध जयंतीच्या पर्वात भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लुल्हे बोलत होते. वृक्षारोपण जळगाव येथे चंदु अण्णा नगर पुढील सद्गुरु बैठक सभागृह परिसरात दिनांक 16 मे रोजी करण्यात आले. अध्यक्षस्थानी अथर्व प्रकाशनाचे प्रकाशक युवराज माळी होते.पुढील मार्गदर्शनात लुल्हे यांनी सण उत्सवात वृक्षवेलींचे धार्मिक महत्व सांगून परसबागेत लागवडयुक्त औषधी वनस्पतींची…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिरसोली रोडवरील जैन व्हॅली येथील एसीला लागणारे तांब्याच्या पाईप चोरून नेत असतांना एकाला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शिरसोली रोडवरील जैन व्हॅली येथील कांदा विभागाचे इमारतीच्या मागील बाजूस लावण्यात आलेले एअर कंन्डीशनला लावण्यात आलेले तांब्याचे पाईप रविवार १५ मे रोजी दुपारी २ वाजता चोरून नेत असतांना अमोल बापू पारधी रा. लेबर कॉलनी, जळगाव याला जैन व्हॅलीतील कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ६ हजार ९०० रूपये किंमतीचे साडे पाच किलो तांब्याचे पाईप हस्तगत केले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवार १६…
भुसावळ ः प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हनुमान चालीसा, मशिदींवरील भोंगे, मनसे-शिवसेनेच्या सभा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे धर्मा-धर्मात तेढ निर्माण होत असल्याची देखील भूमिका मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मतप्रवाह दिसून येत आहे. यासंदर्भात भुसावळमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे. तसेच, त्यांनी नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे. भुसावळमध्ये एका कार्यक्रमासाठी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थिती लावली होती.या कार्यक्रमात व्यासपीठावरून देखील यासंदर्भात टीका केल्यानंतर माध्यमांशी बोलताना खडसे यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. “सध्या राज्याच्या राजकारणात गढूळ…
पुणे : वृत्तसंस्था यात्रा सुरु होती. यात्रेला मोठी गर्दीही झाली होती आणि या गर्दीत भरधाव टेम्पो शिरल्याने एकच गोंधळ उडाला टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. दरम्यान, टेम्पोने दिलेल्या धडकेने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. धनकवडी गावात यात्रा सुरु असताना गर्दीत अचानक टेम्पो शिरल्याने यात्रेत एकच घबराट उडाली. सजावटीसाठी रस्त्यावर लावलेल्या डिजिटल फलकासह टेम्पोने दुचाकींनाही धडक दिली.या अपघातात सनी दत्ता ढावरे (16, रा. सहकारनगर) या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी टेम्पो चालक रुपेश बळीराम मालुसरे (19, रा. कोंढवा ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी चालक रुपेश याला अटक केली आहे. तसेच टेम्पोमालक दत्ता घनवट याच्या…
धुळे/ जळगाव ः प्रतिनिधी मुंबई-आग्रा महामार्गवर धुळ्यातील मित्रनगर भागात काल रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. मागून येणाऱ्या मालमोटारीने रिक्षाला धडक दिल्यामुळे नियंत्रण सुटून ही रिक्षा समोरून येणाऱ्या क्रूजरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की,यामध्ये रिक्षा आणि क्रूजरचा अक्षरश: चुराडा झाला.अपघातातील क्रूजरमधील प्रवासी पारोळा तालुक्यातल्या तरडीहून पुण्याला लग्नासाठी निघाले होते अशी माहिती मिळाली आहे. नेमके काय घडले? काल रात्री उशीरा हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मालेगावहून मध्यप्रदेशच्या दिशेने कांदा भरून नेणाऱ्या एका मालमोटारीने रस्त्यावर समोर असलेल्या रिक्षाला मागून जोरात धडक दिली.यामुळे रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले. रिक्षा समोरून विरुद्ध दिशेने…
जळगाव ः प्रतिनिधी केंद्राचे जाचक धोरण व वाढत्या महागाईच्या विरोधात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज सकाळी 10 वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी काढण्यात आलेली महागाईची प्रतिकात्मक अंत्ययात्रा व त्यानंतर घालण्यात आलेला ‘गोंधळ’ या आंदोलनाचे आकर्षण ठरले. या आंदोलनात माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, सतीष अण्णा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शहरातील आकाशवाणी चौफुलीजवळील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून हा मोर्चा (प्रतिकात्मक अंत्ययात्रा) निघाला. महागाईविरोधात आवाज उठविण्यासाठी गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.यावेळी महागाईविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध…
मेष : मेष राशीच्या लोकांना आज शुभ परिणाम मिळू शकतात, तुम्ही सकारात्मक विचार ठेवा. तुम्ही तुमच्या संवाद कौशल्याचा वापर करून लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल, तर विस्तार योजना अंमलात आणण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुमच्या व्यवसायातील काही काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतात. निरोगी पर्याय निवडल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्कृष्ट आहे. परीक्षा किंवा स्पर्धेच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्या किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छिणार्यांनी सतत प्रयत्न करावेत. कामाच्या ठिकाणी सहकार्यांसोबत काम करताना विशेष काळजी घ्यावी…
जळगाव : प्रतिनिधी प्रेम विवाह केल्याच्या रागातून पत्नीच्या नातेवाईकांनी पतीसह त्याच्या नातेवाईंकांना मारहाण करून जखमी केले तर रिक्षाची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भावेश रमेश गोसावी (वय-२२) रा. लक्ष्मीनगर जळगाव हा आपल्या पत्नी जागृती व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. भावेशने जागृतीशी प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे जागृतीचे नातेवाईक यांच्या मनात राग होता. दरम्यान १५ मे रोजी सकाळी ७ वाजता भावेश हा पत्नी व नातेवाईकांसोबत रिक्षाने विशाल पेट्रोल पंपाजवळील गुलाबाबा कॉलनी रोडवरील नर्सरी समोरून जात असतांना गजेंद्र घुगे-पाटील, निलेश राजेंद्र घुगे, दुर्गेश गजेंद्र घुगे, निखील…