साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील रामानंद नगर परिसरात एका 55 वर्षीय महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी 85 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र धूमस्टाईल लांबवल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामानंदनगर परिसरात असणाऱ्या जीवन नगरमध्ये राहणाऱ्या आशा ज्ञानेश्वर महाले ( वय 55 ) ह्या शुक्रवारी सायंकाळी 7.45 वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 85 हजार रुपये किमतीचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळ काढला. आशा महाले यांनी आरडाओरड करूनही उपयोग झाला नाही. याबाबत आशा महाले यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस स्टेशन…
Author: Saimat
साईमत , जळगाव, प्रतिनिधी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 123 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य व नाट्य पुरस्कारांची घोषणा पुरस्कार निवड समितीने केली आहे. यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार जळगाव येथील ख्यातनाम लेखक व रंगकर्मी शंभू पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे . निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर उपस्थित होते. शंभू पाटील यांच्या सोबत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत निशिकांत ठकार यांना तर शैलजा बापट, तमाशा कलावंत वसंत अवसरीकर, विश्वास…
साईमत भुसावळ प्रतिनिधी सुरक्षा बलाचे सहायक फौजदार संजय पाटील व जितेंद्र इंगळे श्वान वीरूसोबत अकोला ते भुसावलदरम्यान गांधीधाम एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी दि. ४ रोजी तपासणी करीत होते. रेल्वेच्या मागील जनरल डब्यामध्ये श्वान वीरूला दोन संशयित बॅग आढळून आल्या. एका बॅगमध्ये कपडे, तर दुसऱ्या बॅगमध्ये प्लास्टिक पिशवीमध्ये २४ किलो गांजा आढळून आला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरक्षा बळाचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी गांजा जप्त केला. मलकापुरवरून भुसावळ रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर गांधीधाम रेल्वे पोहचली असता, भुसावळ स्थानकाचे निरीक्षक राधा किशन मीना, उपनिरीक्षक नंदलाल राम, उपनिरीक्षक विनोद खरमाटे, गोपनीय विभागाचे सुरेश भगत, अवधेश कुमार, अमोल पाटील, यांनी जनरल डब्यात प्रवेश केला. सीट क्रमांक २२ ते…
साईमत धानोरा ता चोपडा वार्ताहर धानोरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त प्रतिमेला माल्यर्पण व पुजन करून गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच रज्जाक तडवी उपसरपंच विजय चौधरी, माजी प . स . उपसभापती माणिकचंद महाजन ग्रा.स गजानन कोळी, मुक्तार शेख, रविन्द्र शिरसाठ, पढंरीनाथ कुभार, चंद्रशेखर साळुके, प्रविण कोळी,गोकुळ साळूके, ज्ञानेश्वर सोनवणे आदी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य म्हणून मोहरदचे सरपंच अंजुम रमजान तडवी व हाजी रमजान तडवी यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना शेकडो वह्याचे वाटप केले अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनपटावर प्रा भरत शिरसाठ, फारुख शेख यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमसाठी भारतीय बहुजन मांतग संघ…
साईमत, मुंबई, प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार यांनी खिंडार पाडल्याने राज्यातील राजकारणात मोठे बदल घडून आले होते. पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा जबर हादरा लवकरच बसणार आहे. शरद पवारांच्या जटातीले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे आणि मानसिंग नाईक हे अजित पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याचे समजते. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटासोबत घेण्यास तत्कालीन भाजपा नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या नावावर फुली मारली होती. आता तोच प्रकार कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतीत घडल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनीच आव्हाड यांच्या प्रवेशाला विरोध केल्यामुळे जयंत पाटील यांच्यासोबतच्या ‘लॉट’मध्ये त्यांचा समावेश…
साईमत यावल प्रतिनिधी शहरालगतच्या विरावली शिवारातील विहीरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, शहरा पासुन सुमारे दोन किलोमिटर अंतरावर चोपडा मार्गा वरील दरबारसिंग शांताराम पाटील यांच्या विरावली शिवारातील शेत गट क्रमांक१७५ च्या शेतातील सुमारे १३० फुट खोल असलेल्या विहीरीतीत पडून पाण्यात बुडून ३०ते ३५ वर्ष वयाचा अज्ञात तरूण मरण पावल्याची घटनासमोर आली आहे. दि ५ ऑगस्ट रोजी शेतात कामास गेलेल्या महीलांना विहीरीतुन दुर्गंधीचा वास आल्याने त्यांनी शेतमालकास सदरची माहिती दिल्याने शेतमालक दरबारसिंग यांनी सदरची माहीती दिली. त्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. या अनुषंगाने मृतदेह विहिरीतून काढण्यात आला आहे.
साईमत यावल प्रतिनिधी यावल नगरपरिषदे पासून काही अंतरावर आणि यावल तहसील पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या हडकाई खडकाई नदी पात्रात मृत जनावरे आणून टाकली जात असल्याने याकडे यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे, पर्यायी यावल शहरात साथीचे रोग फैलावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावल नगरपरिषद कार्यालयाला लागून असलेल्या नदीपात्रात आणि यावल तहसील कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीपात्रात यावल शहरात मृत झालेल्या गाई- म्हशी, कुत्रे,डुकरे, इत्यादी प्राणी नदीत आणून टाकले जात आहेत, पावसाळ्याचे दिवस असल्याने या मृत प्राण्याचे अवशेष नदीतून उत्तरेकडे म्हणजे यावल शहराकडे नगरपालिका कार्यालयाकडे वाहत येऊन साथीचे मोठे रोग फैलावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मृत जनावरे फेकून…
साईमत भुसावळ प्रतिनिधी शहरातील घरगुती वापराच्या गॅसची विक्री कशी होत आहे. गॅस धारकांना गॅस एजंसिज कश्या सुवीधा पुरवीतात, ग्राहकांच्या काही तक्रारी आहेत का ? आदी बाबी जाणून घेण्यासाठी भारत पेट्रोलीयमच्या अधिकाऱ्यांनी शहरातील गॅस एजंसिजला सदीच्छा भेट देत माहिती जाणून घेतली. यावेळी भारत पेट्रोलियम चे मुख्यअधिकारी व्ही.नागराजन स्टेट हेड (महाराष्ट्र आणि गोवा राज्य) अधिकारी तसेच जळगाव एलपीजी टेरीटोरीचे मॅनेजर कमलेश कुमार , विक्री अधिकारी पवन भारती, अकोला येथील विक्री अधिकारी गौतम झा यांनी भुसावळातील धनश्री गॅस एजन्सीला नुकतीच भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी धनश्री गॅस एजन्सीचे संचालक रविंद्र शिंदे यांच्याशी चर्चा केली. व धनश्री गॅस एजंसीच्या भारत गॅस च्या सुरक्षा…
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या अटकेतील संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मुक्ताईनगर येथे मनसेतर्फे पोलीस स्टेशन मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, शहराध्यक्ष मंगेश कोळी, उचंदे गण अध्यक्ष गजानन पाटील, प्रहारचे दिव्यांग क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष उत्तम जुबळे, दीपक पाटील, कल्पेश पाटील, रोशन पाटील आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थिती होते. सदर निवेदन मुक्ताईनगर पोलीस स्थानकात देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर बस स्टँड येथे तालुक्यातील प्रवाशांची मोठी वर्दळ असते परंतु काही टवाळखोर व रोड रोमिओ मुलांमुळे त्या ठिकाणी वाद होत असून मोठा घातपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिक्षणासाठी खेड्या – पाड्यातून येणारी शाळकरी, कॉलेजच्या मुली तसेच प्रवाशी महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यामध्ये शाळा, कॉलेज, तहसील, पोलीस स्टेशन दवाखाना,हॉस्पिटल, पीडब्ल्यूडी ऑफिस, बँका, वीज वितरण असे विविध प्रकारचे मोठे मोठे ऑफिस या ठिकाणी येत असून आर्थिक देवाणघेवाण कागदोपत्री असा व्यवहार मुक्ताईनगर शहरांमध्ये होत असतो त्या अनुषंगाने मुक्ता नगर शहरांमध्ये रहदारीचे प्रमाण खूप असून खेड्यापाड्यातील लोक एसटी बसचा प्रवास करत असतात व बस स्टैंड वर येत असतात…