साईमत प्रतिनिधी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Jalgaon District Central Co-operative Bank) मोठी पदभरती सुरू. 19 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार. महत्त्वाची बातमी जळगाव | नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी! जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारकून (सपोर्ट स्टाफ) या पदासाठी 220 जागांची भरती जाहीर केली आहे.या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून, 31 ऑक्टोबर 2025 ही शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर👉 https://jalgaondcc.com/येथे जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. 🧾 भरतीचा तपशील भरती संस्था: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Jalgaon DCC Bank) पदाचे नाव: कारकून (सपोर्ट स्टाफ) एकूण जागा: 220…
Author: Saimat
साईमत त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर शहरात दोन तास मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला. आज सकाळी झालेल्या या जोरदार पावसामुळे मुख्य रस्त्यांसह उपनगरी भागात पूरस्थिती निर्माण झाली. घरे व दुकाने पाण्याखाली गेल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वारकऱ्यांना चांगलेच हाल आज इंदिरा एकादशी असल्याने त्र्यंबकेश्वरला सकाळपासून वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र पावसाच्या संततधारेमुळे भक्तांना चिखल व पाण्यातून वाट काढावी लागली. रस्ते नदीसारखे वाहू लागल्याने काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. दोन तासांच्या मुसळधार पावसामुळे परिसरातील डोंगर-दऱ्यांमधून धबधबे प्रवाहित झाले. सप्टेंबर महिन्यात एवढा पाऊस अनेक वर्षांनी झाल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने त्र्यंबकवासीयांना अचानक आलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला. शहरातील…
साईमत प्रतिनिधी – “सेवा पंधरवडा २०२५” अंतर्गत देशभरात महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचा” शुभारंभ आज मध्यप्रदेशातील धार येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, रजनी सावकारे, भैरवी वाघ-पलांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, डॉ. इंद्राणी मिश्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. अभियानाची वैशिष्ट्ये…
साईमत नाशिक नाशिकमधील गुन्हेगारी टोळ्यांमधील वैमनस्य पुन्हा एकदा उघडकीस आले असून, पंचवटी परिसरातील पेठरोडवरील राहुलवाडी येथे मध्यरात्री झालेल्या गोळीबाराने शहर हादरले. या घटनेत सागर विठ्ठल जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेचा सविस्तर तपशील माहितीनुसार, सागर जाधव हा उघडे गँगचा कट्टर समर्थक असून काही महिन्यांपूर्वीच्या खंडणीप्रकरणात त्याचे नाव संशयित म्हणून पुढे आले होते. शनिवारी मध्यरात्री तो आपल्या काही सहकाऱ्यांसोबत परिसरातील ओट्यावर बसलेला असताना त्याचे शत्रू ठरलेले विकी उत्तम वाघ व विकी विनोद वाघ हे अचानक तिथे दाखल झाले. दोघांनी कोणताही वाद न घालता सरळ पिस्तुलातून सलग गोळ्या झाडल्या. या गोळीबारात जाधवच्या गालातून एक गोळी…
साईमत प्रतिनिधी १५ व १६ सप्टेंबर रोजी झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके वाहून गेली, घरांमध्ये पाणी शिरले, जनावरांचा मृत्यू झाला, तर अनेक गावांचा संपर्क तुटला. जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेत असून शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जामनेर तालुक्यात गावोगाव पूरस्थिती जामनेर तालुक्यातील नेरी, जामनेर, वाकडी, शेंदुर्णी, तोंडापूर या गावांमध्ये पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेरी बु. येथे तब्बल २१ ते ४० घरांमध्ये पाणी शिरले असून पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. नेरी दिगर येथे १५–२० घरे आणि ५ दुकाने पाण्याखाली गेली असून काही कुटुंबांना शाळांमध्ये…
साईमत प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. नेरी, चिंचखेडा यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये पाण्याचा पूर ओसंडून वाहत असल्याने शेतजमिनी तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीसह जनजीवन ठप्प झाले असून, ग्रामस्थांना असहाय्यतेची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली, माती वाहून गेली पुरामुळे शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, मका, भुईमूग यांसारखी हंगामी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी वाहून गेलेल्या गाळामुळे शेतीची सुपीकता नष्ट झाली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, या हंगामात अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे हाल पूरग्रस्त भागातील…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील गजबजलेल्या इच्छादेवी चौकात मंगळवारी पहाटेच भीषण अपघात घडला. चुकीच्या दिशेने येणाऱ्या ओमनी कारच्या जोरदार धडकेत ७० वर्षीय सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळच्या शांततेत घडली दुर्घटना खंडेराव नगर परिसरात राहणारे वसंत प्रताप पाटील (वय ७०) हे रोजप्रमाणे सायकलवरून जात असताना सकाळी सव्वा सहा वाजता इच्छादेवी चौकात पोहोचले. तेवढ्यात समोरून नियम धाब्यावर बसवत चुकीच्या दिशेने धावणाऱ्या ओमनी कारने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की पाटील रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र…
३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका न झाल्यास आयोग जबाबदार साईमत प्रतिनिधी राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण व्हायलाच हव्यात, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या विलंबाबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत कडवे शब्द वापरले. आयोगावर न्यायालयाचे ताशेरे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान राज्य निवडणूक आयोगावर कठोर शब्दांत टीका केली. “आजवरच्या कारभारावरून असे वाटते की आयोग निवडणुका पुढे ढकलतच राहणार आहे. अशा प्रकारच्या कारणांवर अवलंबून राहिले, तर निवडणुका २०२६ पर्यंतही होणार नाहीत,” अशी टिप्पणी न्यायालयाने केली. मशिन्सचा मुद्दा आणि वेळकाढूपणा सुनावणीदरम्यान आयोगाने, निवडणुका घेण्यासाठी ६५ हजार…
साईमत प्रतिनिधी धार्मिक संस्कार, नीतिमूल्ये आणि भारतीय परंपरेचे बीज लहान मुलांच्या मनामध्ये रोवण्यासाठी श्री स्वामिनारायण मंदिर, जळगाव येथे गेली अडीच वर्षांपासून बाल संस्कार केंद्र यशस्वीरित्या चालवले जात आहे. या केंद्राचा उद्देश म्हणजे बालकांमध्ये सद्गुणांची जडणघडण करून त्यांना उत्तम नागरिक आणि संस्कारित व्यक्तिमत्त्व म्हणून घडवणे. केंद्रात 8 ते 25 वयोगटातील मुला–मुलींचा उत्स्फूर्त सहभाग आहे. प्रत्येक रविवारी सकाळी घेण्यात येणाऱ्या या वर्गांमध्ये श्लोक पठण, भजन, स्तोत्र, नैतिक गोष्टी, नाटिका, प्रश्नोत्तरे, योग व प्रार्थना अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांना श्रद्धा, प्रामाणिकपणा, सेवा, अनुशासन आणि देशप्रेम यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी साधू–संत तसेच सेवाभावी कार्यकर्ते मार्गदर्शन करतात. गेल्या अडीच वर्षांत या उपक्रमामुळे शेकडो…
साईमत प्रतिनिधी दुपारी उसळला वाद, हिंसक हाणामारीत रुपांतर जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी गावात रविवारी दुपारी जुन्या वैरातून दोन कुटुंबांमध्ये भीषण हाणामारी झाली. यात एकनाथ निंबा गोपाळ (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून सर्वांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दशकभर जुना वाद पुन्हा पेटला गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरू आहे. शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील एका व्यक्तीची दुचाकी पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवल्याने शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी वातावरण तापले असले तरी ग्रामस्थांच्या हस्तक्षेपाने वाद थांबला. परंतु दुसऱ्या दिवशी हा वाद पुन्हा पेटला आणि…