मुंबई ः कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत नुकतीच उमराहला जात असताना पापाराझीसोबत दिसली. मक्का येथील पवित्र मशिदी अल-हरम येथे मुस्लिमांद्वारे केलेली तीर्थयात्रा तिथे असते.जेव्हा शटरबग्सने तिला तिचा माजी पती आदिल खान दुर्रानी सोबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबद्दल बोलण्यास सांगितले तेव्हा तिने त्याच्यावर आणि त्याची मैत्रीण राजश्रीवर तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केल्याचा आरोप केला. दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले राखी सावंतचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे.ती म्हणाली की, माझ्याकडे अक्सेस नाही. आदिल आणि राजश्रीने माझे अकाउंट हॅक केले आहे, ते मला जेवू देत नाहीत आणि झोपू देत नाहीत. मी घरी जातो आणि ते माझा छळ करतात. राखी सावंतचे इन्स्टाग्राम हॅक राजश्रीने राखीविरुद्ध…
Author: saimat
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावात डेंग्यू विरोधी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. किनगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन, तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत उपकेंद्र किनगाव बुद्रुक, किनगाव खुर्द व डांभुर्णी येथे अति संवेदनशील भागात डेंग्यू विरोधी मोहीम सुरू केली आहे. मोहिमद्वारे गावात डेंग्यूू ताप रुग्ण सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटण्यासह गाव पातळीवर डेंग्यू तापाची लक्षणे, उपचार, डेंग्यू ताप प्रतिरोधक उपाययोजनाबद्दल माहिती ग्रामीण पातळीवरील नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे, घरासमोरील नाल्या वाहत्या करणे, खिडक्यांना जाळ्या बसविणे, शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बसविणे, घरासमोर पाणी साचू न देणे,…
सोयगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तिडका आणि वाडी या दोन गावात गुरुवारी चार तास रेस्क्यू मोहीम राबवून चार सर्पमित्रांनी एक भला मोठा अजगर आणि एक मण्यार जातीचा साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. वाडी गावात रंगनाथ जंजाळ यांच्या केळीच्या बागेत दबा धरून बसलेला दहा फुटांचा अजगर पकडण्यासाठी सर्पमित्र सलमान पठान, ज्ञानेश्वर जाधव, रवि राठोड़, मोहन चौधरी, रितेश चव्हाण अशा पाच जणांनी तीन तास रेस्क्यू मोहीम हाती घेत अजगरला पकडले. त्याला वाडीच्या जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. त्यानंतर सर्पमित्रांना तिडका गावात मनोज तडवी यांच्या घरात भिंतीत मण्यार साप असल्याचे कळाले. त्यानंतर सलमान तडवी आणि ज्ञानेश्वर जाधव यांनी तिडका गाव गाठून एक…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गांजाचा नशा करणाऱ्या तरूणावर कारवाई केल्याची घटना बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशीरा भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात शेख अन्वर शेख अकबर (वय ३२, रा. आगाखान वाडा, भुसावळ) हा बेकायदेशीर गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता गांजाचा नशा करणाऱ्या शेख अन्वर याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख अन्वर शेख अकबर…
रावेर : प्रतिनिधी एकाच रात्री तीन वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रावेर तालुक्यात पाल-खरोदा दरम्यान दोन ४०७ गाड्यांवर तर रावेर शहरात एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर अवैध वाळू वाहतूक करतांना महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. तहसीलदार बंडू कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री वेगवेगळे पथक तयार करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुध्द धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात पाल-खिरोदा दरम्यान एमएच १० एक्यू ५५०० नंबरची ४०७ पिकअप, एमएच २० सियु ०२७९ ४०७ पिकअप दोन्ही गाड्यांमध्ये वाळू भरलेली होती. एमएच २८ डी ११४५ नंबरचे ट्रॅक्टर-ट्रॉली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पकडण्यात आले. महसूल पथकाने…
मलकापूर : प्रतिनिधी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, डीपी पथकाचे प्रमुख स.पो.नी. करुणाशील तायडे, स.पो.नी. लेडीज सिंघम स्मिता महसाये, पो.नि. सुरेश रोकडे, आसिफ शेख, संतोष कुमावत, प्रमोद राठोड, आनंद माने, ईश्वर वाघ, पंजाबराव शेळके, गोपाल तारूडकर, गोपाल इंगळे, मंगेश चारखे, प्रवीण गवई, राहुल वाघ, मुळे, एल.पी.सी. प्रियांका डहाके, निता वाढे यांनी विविध दाखल गुन्ह्यांचा यशस्वी तपास लावून उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन महानिरीक्षकांनी सन्मानित केले. यावेळी बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पाचही विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.
मलकापूर : प्रतिनिधी ओंकारेश्वर ज्योर्तिलिंग ते मलकापूर तब्बल २०० कि.मी. पायी कावड आणि छत्रपती शिवाजी नगर येथील राजेश्वर शिव मंदिरात जलाचा अभिषेक करण्यात आला. कावडधारी जय भवानी मंदिर ट्रस्टचे सचिव गजानन चव्हाण, अनिल सूर्यवंशी, गजराज साळुंके, गोलू पोंदे यांचे छत्रपती शिवाजी नगर वासियांनी ढोल-ताशाच्या निनादात रांगोळी काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले. बऱ्हाणपूर येथील शिवभक्त दरवर्षी ओंकारेश्वर ते बऱ्हाणपूर कावड यात्रेचे आयोजन करतात. शांतनु पाटीदार यांच्या अध्यक्षतेखाली ही कावड आयोजित केली जाते. छत्रपती शिवाजीनगर येथील चार जण बऱ्हाणपूर येथील पंकज मोरे यांच्या माध्यमातून यात्रेत सहभागी झाले होते. १८ ऑगस्ट रोजी ही यात्रा ओंकारेश्वर येथून निघून दररोज ४० कि.मी. पायी चालून त्यांचा…
सोयगाव : प्रतिनिधी तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ उपक्रमाअंतर्गत प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासह सोयगाव तालुक्यातील प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय व निर्धार करणारे जरंडी गाव अग्रस्थानी ठरणार आहे. गावातील व्यावसायिक, किराणा दुकानदार, ग्रामस्थांनी प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करून कागदी पेपर पिशवीचा वापर करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतमार्फत केले आहे. दररोज वापरता प्लास्टिक पिशवीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊन प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर, मोकळ्या पटांगणात उकिरड्यावर फेकल्या जातात. गुरा-ढोरांच्या खाण्यात प्लास्टिक पिशव्या येत असल्याने त्यांच्या जीवितास हानी होण्याची शक्यात असते. तसेच प्लास्टिक पिशवीचा अति वापर व वापर झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावून तिला योग्य प्रकारे नष्ट करता…
रावेर : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सुकतेला विराम देत उद्योजक श्रीराम पाटील यांनी आपण रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. अखेर रावेर विधानसभेसाठी उद्योजक श्रीराम पाटील यांचे राजकीय लॉन्चिंग झाले आहे. यासंदर्भात त्यांनी मॅक्रो व्हिजन अकॅडमी शाळेत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. पत्रकार परिषदेला गोपाल दर्जी, पिपल्स बँकेचे संचालक सोपान साहेबराव पाटील, विजय गोटीवाले, प्रवीण पाचपोहे, मॅक्रो व्हिजन अकॅडमीचे सचिव स्वप्निल पाटील, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. रावेर विधानसभा निवडणूक मी लढवावी हे जनतेच्या मनात आहे. म्हणून आपण पुढची निवडणूक लढणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका…
सोलापूर : ‘सैराट’, ‘फँड्री’ या दोन चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घातले आहे. आज या चित्रपटांना प्रदर्शित होऊन बरीच वर्षे झाली असली तरीसुद्धा हे चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. नागराज मंजुळे हे नाव यामुळेच आपल्या लक्षात राहते. नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे. २४ ऑगस्ट १९७८ साली त्यांचा जन्म कर्माळा येथे झाला. त्यांच्या चित्रपटातील विविध सामाजिक विषयांचे वास्तविक चित्रण जगासमोर आणले. २०१६ साली आलेल्या ‘सैराट’ या चित्रपटानं तर संपुर्ण जगाला वेड लावलं होतं. या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. ‘झिंगाट’ हे गाणंही अख्ख्या जगात लोकप्रिय झाले होते. मध्यंतरी चर्चा होती ती म्हणजे नागराज मंजुळेंच्या दहावीच्या मार्कशीटची. त्यांनी आपली मार्कशीट शेअर केली…