शाळा प्रशासनासह ग्रामस्थांवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी: तालुक्यातील पिलखेडे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मराठी शाळा, पिलखेडे या शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांत जिल्हास्तर व विभागीय स्तरावर घवघवीत यश संपादित केले आहे. त्याबद्दल शाळा प्रशासन व ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या राज्यस्तरावरील आदर्श उपक्रमाचा दुसरा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या टप्प्यावरील मुल्यांकन जाहीर झालेले असून त्यात जळगाव तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मराठी शाळा, पिलखेडे जिल्हा परिषद शाळेने प्राथमिक गटातून जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादित केले आहे. पिलखेडे…
Author: saimat
रायसोनी महाविद्यालयात “डिझाईन थिंकींग मेथोडोलॉजी द इंडियन वे” विषयावर कार्यशाळा साईमत / जळगाव / प्रतिनिधी कोणतीही गोष्टीची निर्मिती करण्याचा डीएनए खरे तर डिझाइनच असतो. तो आपल्याला त्याच समस्यांकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची, त्यावर उपाय शोधण्याची साधने देतो. गुंतागुंतीच्या समस्या छोटे छोटे भाग करून समजून घेणे हा डिझाइन थिंकिंगचा भाग आहे. डिझाइन शिक्षण विद्यार्थ्यांना वास्तवाशी जोडते आणि त्यांना उपायांवर काम करण्यासाठी ज्ञान व अनुभव देते. आजही बहुतांश लोक डिझाइनला केवळ सौंदर्य शिल्प मानतात, पण डिझाइन थिंकिंग हे एक सामाजिक तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये व्यावहारिक साधनांसह मानवी वर्तन समजून घेणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन व “अमाय डिझाईन सोल्युशन”चे संस्थापक तसेच सीईओ अभिषेक निरके यांनी केले.…
उज्ज्वल स्कूलमध्ये विषय मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केले अनोखे प्रकल्प साईमत / जळगाव / प्रतिनिधी उज्ज्वल स्कूलमध्ये “विषय मेळावा २०२४” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, ज्यात विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, इतिहास, आणि भूगोल या विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे आणि सखोल शैक्षणिक ज्ञानाचे दर्शन घडवले.कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या अध्यक्षा अनघा गाडगानी, शाळा समितीचे अध्यक्ष प्रविण गगडाणी, मुख्याध्यापिका मानसी गगडाणी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला परीक्षक म्हणून डॉ. रेणुका चव्हाण, प्रा. प्रमोद समाधान भोई, आणि प्रा. डॉ. अतुल सोपानराव इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात सौर ऊर्जा, रोबोटिक्स, आणि पर्यावरण संवर्धनासारख्या अद्ययावत विषयांवर प्रकल्प सादर केले.…
रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स सुवर्णसेवेचा सुवर्णमहोत्सवा निमित्त लोगोचे अनावरण साईमत / जळगाव / प्रतिनिधी सोने, हिरे, रत्ने याबद्दल विचार मनात आला की जळगावकरांचे पाय आपसूकच वळतात ते रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडेच…! आपल्या मनमोहक कलाकुसरीने जळगावचेच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने ग्राहकांच्या सेवेत ५० वर्षांचा टप्पा पार केला. विश्वासाची परंपरा, दर्जेदार अलंकार, गुणवत्ता उचित दर यामुळे कोट्यवधी ग्राहकांची निष्ठा अशी ख्याती असलेले या प्रतिष्ठानाने ही मजल गाठली. नुकतेच ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर्षोत्सव सुवर्णमहोत्सवाचे- सेवेचे आणि विश्वासाचे- १९७४ ते २०२४” हे मुद्रित केलेल्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या सुवर्णमहोत्सवी उत्सवात ‘रतनलाल सी. बाफना…
कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : येथील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपले संकल्प पक्के करण्याबाबत व सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे प्रा. विजय डांगे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या महत्त्वपूर्ण कार्याची चर्चा केली. त्यांनी समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करण्याची प्रेरणा दिली. देशातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनासारख्या चळवळींची आवश्यकता स्पष्ट केली. प्रास्ताविकात रासेयोचे कार्यक्रम अधिकारी नामदेव धुर्वे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी विषद केली. स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचा…
रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, वाचनीय पुस्तके देऊन स्पर्धकांचा गौरव साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथील प्रताप विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय वकृत्त्व, गीत गायन, व निबंध स्पर्धा भुसावळ येथील के.नारखेडे विद्यालयात स्व. बाबासाहेब के नारखेडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराची विजयी पताका सदैव फडकवित विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत विद्यालयाचे उपशिक्षक पंकज शिंदे यांनी राज्यस्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पी.एस. ठाकरे, एम.एफ. माळी, पी.बी.कोळी या मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे विज्ञान विभाग प्रमुख डॉ.दिलीप देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व…
दोन सत्रात विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्रमुख मार्गदर्शक म्हणून परीक्षा विभाग प्रमुख डॉ.के.एस.भावसार व मानसशास्त्र विभाग एस.बी.पाटील उपस्थित होते. व्यापीठावर प्रा.सौ.एस.टी.शिंदे, विद्यार्थी विकास विभागअधिकारी डॉ.डी.डी. कर्दपवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ.डी.डी.कर्दपवार यांनी विद्यार्थ्यांना ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळेची माहिती दिली. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात मार्गदर्शक डॉ.के.एस.भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, विद्यार्थ्यांनी कॉपी न करता कॉपी मुक्त परीक्षा दिली पाहिजे, जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही. तसेच विद्यापीठ कॉपी केस…
नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालयात ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी “स्वच्छता हीच खरी सेवा” विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. आर.जाधव उपस्थित होते. व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अधिसभा सदस्य, मीनाक्षी निकम, प्रा.सुनील निकम, उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख, डॉ. उज्ज्वला नन्नवरे, डॉ.विजय लकवाल उपस्थित होते. यावेळी अधिसभा सदस्य, मीनाक्षी निकम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. अधिसभा सदस्य प्रा. सुनील निकम यांनी ‘स्वच्छता हीच खरी…
३० गावातील ४७१ शेतकऱ्यांचे नुकसान, तात्काळ नुकसान भरपाईची मागणी साईमत/रावेर/प्रतिनिधी : तालुक्यातील केळी व खरिपाची पिकांना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठया प्रमाणावर पुन्हा एकदा भुई सपाट केले आहे. तालुक्यातील ३० गावांच्या शिवारातील केळी, कापुस, मका, तुर, चवळी, उडीद, मुग याचे ४७१ शेतकऱ्यांच्या सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल व कृषी विभागातर्फे वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्याच्या शेती शिवाराला झोडपल्याने खिरोदे प्र, रावेर, रसलपूर, मुंजलवाडी, विवरे, बलवाडी, शिंगाडी, भामलवाडी, सिंगत, वडगाव, निंभोरा, ऐनपूर, निंबोल, मस्कावद, आभोडा खुर्द, जिन्सी, गुलाब वाडी, लालमाती आदी गावांसह ३० ते ४० गावांचा समावेश आहे.…
मनसेत ५० तरुणांचा ॲड.जयप्रकाश बाविस्कर, ॲड.जमील देशपांडे यांच्या उपस्थितीत प्रवेश साईमत/यावल/प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक-अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन तसेच मनसेचे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या अमोल दर्शनामुळे आणि मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संजय नन्नवरे यांच्या ५० व्या वाढदिवसाचे निमित्त साधत पाडळसे गावातील ५० कट्टर कार्यकर्त्यांनी २ दिवसांपूर्वी मनसेमध्ये स्वयंस्फूर्तीने प्रवेश करून तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण करण्याचा संकल्प केला.तालुक्यातील पाडळसे येथील भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित मार्गदर्शक ॲड.जमीलभाई देशपांडे, भुसावळ उप जिल्हाध्यक्ष विनोद पाठक, जळगाव महानगर अध्यक्ष किरण तळेले, उपाध्यक्ष सतिष सैंदाणे आणि यावल शहराध्यक्ष अजय तायडे (पाडळसा, भालोद गटाचे), यावल ता.उपाध्यक्ष पंकज तावडे,…