Author: saimat

शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीची ५० हजार रुपये एकरी मदत द्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : सतत बरसणाऱ्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीची मदत एकरी ५० हजार रुपये द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शासनामार्फत जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपयाची मदत त्वरित देण्यात यावी, अशी मागणी मुक्ताईनगरचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर्षी जुलै महिन्यापासून सतत मुसळधार व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात…

Read More

यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभासदांना लाभांश वाटप सुरू साईमत/यावल/प्रतिनिधी : यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे व सर्व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावात संस्थेच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत नोंदणी असलेल्या सर्व सभासदांना यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघातर्फे सभासदांना १० टक्के लाभांश वाटप १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू करण्यात आली. लाभांश घेण्यासाठी आलेले प्रथम सभासद जयंत उखर्डू महाजन, रा. सातोद यांना यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे युवा उपसभापती तेजस धनंजय पाटील यांच्या हस्ते लाभांश देण्यात आला. यावेळी मॅनेजर संजय दादा भोईटे, यावलकर साहेब, रामचंद्र भोईटे उपस्थित होते. संस्थेच्या वाटचालीत…

Read More

श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसह वारकऱ्यांतर्फे दुर्गा सप्तशती पारायण सेवा साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी, ३ ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे. ३ रोजी घटस्थापना असल्याने हा दिवस आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई साहेबांचा प्रकट दिन आहे. हा जमोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात व्हावा म्हणून दरवर्षी प्रमाणे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र , मुक्ताईनगर व तापी पूर्णा परिसराच्यावतीने हजारो सेवेकऱ्यांतर्फे श्री संत मुक्ताबाई समाधी स्थळ(कोथळी) श्रीक्षेत्र मुक्ताईनगर (जुने मंदिर) येथे “दुर्गा सप्तशती” पारायण सेवेचे आयोजन केले आहे. सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. पारायण सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख…

Read More

वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसिलदारांसह मुख्याधिकाऱ्यांना निवेदन साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शहरातील तितूर नदीवरील पंचम कार्यालय ते दयानंद हॉटेलपर्यंत असलेल्या पुलास विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे चाळीसगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संदेश निकुंभ व नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही चाळीसगाव शहराचे रहिवासी आहोत. आम्ही आपणास विनम्र विनंती करतो की, नुकतेच बांधलेल्या पंचम कार्यालय ते दयानंद हॉटेलपर्यंत असलेल्या नदी पात्रावरील पुलास विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. चाळीसगाव शहरात यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक अशी नामकरणे केली आहेत. तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे…

Read More

प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राबविला विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचालित प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये दररोज यावे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, यासाठी शाळेच्या वतीने, ज्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के हजेरी असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने “शाळेमध्ये शंभर टक्के हजेरी आहे” अशा पद्धतीचा बॅच लावून त्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक जनजागृती त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी आणि आपण शाळेत दररोज आले पाहिजे. अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबाबतीत कोणत्याही पद्धतीची अडचण निर्माण होणार नाही. एक छोटासा बदल…

Read More

जळगाव व जामनेरच्या शेतकऱ्यांना दिलासा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यानुसार भागपूर उपसा सिंचन योजनेच्या रु. 3 हजार 533 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या सुधारित प्रस्तावामुळे सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असून, जळगाव तालुक्यातील भागपुर- वावडदा सह 25 गावांच्या, तसेच जामनेर व पाचोरा पाचोरा तालुक्यांतील शेतकऱ्यांची 30 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्र्यांसह दोन्ही मंत्रीद्वयांना शेतकरी धन्यवाद देत आहे. सन 1999-2000 मध्ये या प्रकल्पासाठी 557 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता…

Read More

खा.स्मिताताई वाघ, आ.लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांनी दाखवला झेंडा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 800 यात्रेकरुंची विशेष वातानुकुलीत भारत गौरव पर्यटन रेल्वे अयोध्येकडे सोमवारी 30 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात, ढोल ताशांचा गजरात, पारंपारिक नृत्य करून यात्रेकरूंच्या स्वागतात खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते फीत कापून यात्रेकरूंचा रेल्वेत प्रवेश झाला. खासदार स्मिताताई वाघ, आमदार लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी महापौर सिमाताई भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी श्री.अंकित, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, माजी नगरसेवक उज्वला बेंडाळे यांनी झेंडा दाखवून ही स्पेशल ट्रेन जळगाव स्टेशनवरून अयोध्येकडे रवाना झाली. ढोल, तासे, उत्सव कमानीने…

Read More

विद्यापीठातर्फे ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळाची व्हॅन’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने नंदूरबार जिल्हयातील सहा माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळाची व्हॅन’ उपलब्ध करून देण्यात आली. दोन दिवसात २७०० विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला. विज्ञानात गोडी निर्माण व्हावी यासाठी ही विज्ञान प्रयोगशाळा व्हॅन नंदूरबार जिल्ह्यातील शहादा, धडगाव या तालुक्यातील शेठ वि.के. शाह विद्यालय, शहादा, कै. सौ. जी.एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, शहादा , एस.टी.ई.एस आणि सहकारी शिक्षण संस्था विज्ञान महाविद्यालय, शहादा. धडगाव तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, चुलवड, शासकीय आश्रमशाळा, मंडवी बुद्रुक आणि शासकीय आश्रमशाळा, काकरदा येथील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. फिरती विज्ञान…

Read More

वर्षातील आठ थीमद्वारे कौशल्यपूर्ण शिक्षणाचे धडे साईमत/पारोळा/प्रतिनिधी : येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये भगतसिंग यांची नुकतीच जयंती साजरा करण्यात येऊन विद्यार्थ्यांना त्यांची माहिती देण्यात आली. तसेच त्यानिमित्त खेळातून प्रशिक्षण देणाऱ्या संकल्पनेला साजेशी अशी प्रोफेशनल अँड इंडस्ट्रियल थीमचे आयोजन केले होते. प्ले ग्रुप,नर्सरी, ज्युनिअर के.जी.व सिनियर के.जी.तील विद्यार्थ्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनियर, नर्स, शिक्षक, हॉटेल मॅनेजमेंट, पोलीस, सैनिक, शेतकरी, फिल्म कलाकार, शृंगार करून पालकांनी स्वतः सहभाग म्हणून विविध प्रकारे व्यावहारिक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी स्वतः प्रदर्शित केले. पालकांनी उत्स्फूर्त पद्धतीने विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी मदत केली. विद्यार्थ्यांनी स्कूलमध्ये जशीच्या तशी थीम त्याद्वारे सर्व व्यावसायिक शिक्षण ग्रहण केले. अशा प्रकारचे व्यवहारिक आणि व्यावसायिक ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले.टायगर…

Read More

अर्थ, सुरक्षा, संस्कृतीवर चर्चा : डझनभर देशाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण साईमत / जळगाव / प्रतिनिधी जगातील प्रमुख उद्योन्मुख देशांच्या अर्थव्यस्थांना एकत्र करीत आर्थिक, सुरक्षित आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणसाठी चीन येथे नुकतीच ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत जळगावची रहिवासी तथा अहमदाबाद येथील पंडित दीनदयाल एनर्जी विद्यापीठाची विद्यार्थीनी आश्लेषा राजेश यावलकर हिने सहभाग घेवून देशाचे नेतृत्व केले. भारतात सरकारच्या योजना कशा पद्धतीने राबविल्या जातात या विषयावर आश्लेषाने पेपरचे सादरीकरण केले. ब्रिक्स (BRICS) म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आणि आता जानेवारी 2024 पासून इथियोपिया, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश असलेला एक अभ्यास गट…

Read More