जामनेर- तालुक्यातील चिंचखेडा बु! येथील रहिवाशी व जामनेर शहरातील हिमालया अॅ ग्रोचे संचालक आप्पासो आत्माराम शंकर पाटील यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी आज दीं.२८ रोजी संध्या.७:१२ वाजता औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर आज दीं.२९ रोजी सकाळी १० वाजता चिंचखेडा बू! येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.ते चिंचखेडा बू! येथील माजी सरपंच पांडूरंग शंकर पाटील यांचे मोठे बंधू होत. त्यांच्या पच्य्यात पत्नी, भाऊ, दोन बहिणी,तीन मुले , दोन मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Author: saimat team
धानोरा तालुका चोपडा – भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग व क्रीडा विभाग अंतर्गत १५ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडणूक साक्षरता मंचाची स्थापना प्रत्येक विद्यालयात केली होती.राष्ट्रिय मतदार सप्ताह अंतर्गत मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात व तालुका स्तरावर तहसिलदार अनिल गावित यांनी विविध स्पर्धा अंतर्गत निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व आभासी पडद्यावर वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यांत आले होते.या स्पर्धेत धानोरा येथील झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा.पाटिल ज्युनिअर काँलेजातील इयत्ता ९ वीची विद्यार्थीनी कु.मैथलि अनिल साळुंके हिने जिल्हातुन घोषवाक्य स्पर्धेत प्रथम पटकविला तर तालुका स्तरीय…
फैजपूर:प्रतिनिधी येथील तडवी वाड्यातील रहिवासी जसुबाई नजीर तडवी (वय -९२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ममुलं, मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते येथील पत्रकार राजु तडवी यांच्या आई होत.
फैजपूर:प्रतिनिधी हजारो वर्षापासून भारतभूमी परकीय आक्रमणे, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर संघर्ष आणि आणि अनगीणत बलिदानातून प्राप्त देशाचे स्वातंत्र्य व संविधानावर आधारित लोकशाही गणराज्य अवघ्या विश्वाला मार्गदर्शक आणि आदर्शवत असल्याचे मत प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी व्यक्त केले. ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिवसाच्या औचित्याने आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पिंगला धांडे, औषधनिर्माण पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एल चौधरी, लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील यांच्यासोबत विविध शाखांचे सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेटस आणि…
जळगाव प्रतिनिधी उस्मानिया पार्क येथील राहणारे अब्दुल गफ्फार जब्बार यांचा मृतदेह २७ जानेवारी रोजी दुपारी ममुराबाद येथील रस्त्यावर मिळाल्याने सदर प्रकार हा कुणाचा असल्याचे लक्षात आल्याने जळगाव शहरातील मुस्लिम समुदायाने जळगाव पोलीस विभागाला विनंती केली होती की सदर मृत्यूला कारणी असलेल्या गुन्हेगाराला चोवीस तासाच्या आत पकडून त्याच्यावर कारवाई करा त्याप्रमाणे पोलिसांनी दुपारपासून ते रात्री मध्यरात्रीच्या आत सुमारे नऊ तासामध्ये दोघी आरोपींना जेरबंद करून आपले कर्तव्य दक्षता जळगावकरांना दाखवून दिली त्यांच्या कर्तव्यदक्ष तेचा समाज मनानेसुद्धा समाजाने सुद्धा परतफेड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी जळगाव शहरातील सय्यद रियाज अली फाउंडेशनचे अध्यक्ष आयाज अली सय्यद…
जळगाव : खान्देशातील विविध कोविड रुग्णालयांकडे ८ कोटी २६ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही. कोविडच्या संकटातही महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीजजोडण्यांची १ कोटी ६६ लाख ४२ हजार ६४० रुपये थकबाकी आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे १० लाख ७५ हजार…
पाचोरा प्रतिनिधी – सामनेर तालुक्यातील ३५ वर्षीय तरुण मजुराचा नदीत पाय घसरल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे . जंगल नामदेव गजबे (३५ , रा यशवंत नगर भडगाव ) असे मयताचे नाव आहे. २ दिवसा पूर्वी तो शौचास गेला असतना त्याचा पाय घसरून पडल्या चा अंदाज लावला जात आहे. आज सकाळी त्याचा मृतुदेहा तरंगत असताना दिसून आल. गावा चे पोलीस पाटील अरुण गोसावी यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. पो . कॉ . निवृत्ती मोरे , संदीप सोनवणे , निलेश गायकवाड यांनी मृतू देह चा पंचनामा केला.
दि.२२ डिसेंबर २०२१ रोजीच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत सदरील मुद्दा चर्चेला गेला होता.मात्र या नागरिकांच्या समस्या कडे दुर्लक्ष झाल्याचे आज यावरून दिसून येते.तरी साधारणता एक महिन्यापासून पालिकेत न फिरकणारे प्रशासकीय अधिकारी कैलास कडलग व मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी यावर विचार मंथन करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकाकडून बाळगली जात आहे. सावदा तालुका रावेर प्रतिनिधी युसूफ शाह सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे गेल्या दोन वर्षांपासून शहराची हद्दवाढ झाल्याने संपूर्ण नविन भाग सावदा पालिका हद्दीत समाविष्ट असून या भागात रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट, ची सुविधा नही तसेच सदर परिसरात घाणीचे साम्राज्य असून याची पालिकेकडून…
धुळे: मिशन आयसीयू ने महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयांच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 10 खाटांचा आयसीयू सेटअप सुरू करण्याची घोषणा केली आहे. येऊ घातलेल्या तिसर्या लाटेमध्ये मदतीची नितांत गरज असलेल्या रुग्णालयांमधील आयसीयू च्या पायाभूत सुविधांना बळ देण्याच्या दिशेने हा उपक्रम म्हणजे एक पाऊल आहे. या नवीन उपक्रमाविषयी बोलताना, मिशन आयसीयू चे सह-संस्थापक श्री मनोज शाह म्हणाले, “सार्वजनिक रुग्णालयांना अत्याधुनिक आयसीयू बेड सुविधांनी सुसज्ज करून कोव्हीड पलीकडे टिकणारी शाश्वत प्रभावी व्यवस्था निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या संस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या मजबूत पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीसह, मिशन आयसीयू आधीच देशभरात 60 आयसीयू बेड स्थापित करण्यात यशस्वी झाले आहे. धुळे आणि इतर तीन जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून आम्ही यावेळी आमचे कार्य आणखी वाढवत आहोत, जेणेकरून आधीच ताण असलेल्या रुग्णालयांसाठी तिसरी लाट अधिक गंभीर होऊ नये.” महाराष्ट्रातील सुमारे 10 जिल्ह्यांमधील वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या स्थितीचा तपशीलवार अभ्यास केल्यानंतर हे स्थान निवडण्यात आले. सर्व जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांची स्थिती समजून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक/सिव्हिल सर्जन यांना एक योग्य फॉर्म पाठवण्यात आला होता, त्या आधारे धुळे आणि इतर तीन जिल्हे मदत मिळण्यास सर्वाधिक पात्र असल्याचे आढळले. मिशन आयसीयू धुळे, बुलढाणा, नांदेड येथील जिल्हा रुग्णालयांना आणि सांगली उपजिल्हा रुग्णालयाला मदत करेल. उपजिल्हा रुग्णालये त्यांच्या कमी दृश्यमानतेमुळे बाहेरून सहाय्य मिळविण्यात अनेकदा अयशस्वी ठरतात. मिशन आयसीयू या उपक्रमाद्वारे ही दरी भरून काढण्याचे उद्दिष्ट ठेवते. दुसरीकडे, धुळे जिल्हा रूग्णालयाची एकूण क्षमता १०० खाटांची असून त्यापैकी फक्त २० खाटांना आयसीयू बेड म्हणून नियुक्त केले आहे. हॉस्पिटलने DCHC निकषांनुसार कोव्हीड दरम्यान रूग्ण हाताळल्याचा अहवाल देण्यात आला. रुग्णसंख्येच्या दरांमध्ये होणारी कोणतीही अनपेक्षित वाढ हाताळण्यासाठी तिसऱ्या लाटेच्या संकटादरम्यान हॉस्पिटलमध्ये अधिक बेड असणे महत्त्वाचे आहे. सर्वेक्षणादरम्यान गोळा केलेल्या आकडेवारीनुसार या जिल्हा रुग्णालयात एकूण सात अतिदक्षता, भूलतज्ज्ञ आणि फिजिशियन आहेत. धुळ्यातील आयसीयू च्या पायाभूत सुविधांच्या गरजेविषयी बोलताना जिल्हा रुग्णालय धुळे चे सिव्हिल सर्जन डॉ. संजय शिंदे,म्हणाले, “या साथीच्या आजारामध्ये आमच्या लक्षात आले की टियर 2 शहरांमध्ये संसाधनांच्या कमतरतेमुळे प्रत्येकजण गंभीर सेवांसाठी मेट्रो शहराकडे धाव घेत होता. आतापर्यंत, आमच्याकडे धुळे जिल्ह्यात फक्त एक शासकीय आयसीयू बॅक-अप सेट होता जो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहे आणि ते शहरापासून सुमारे 7 किमी अंतरावर आहे. मिशन आयसीयू च्या अभिनव उपक्रमाबद्दल आम्ही आपले आभार मानतो कारण सर्वोत्तम गुणवत्ता आणि मानकांची आयसीयू उपकरणे आता शहराच्या मध्यभागी, गरजूंना उपलब्ध होतील”. महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांमध्ये आयसीयू बेड बसवण्याचा एकूण खर्च सुमारे 1.6 कोटी इतका असेल ज्याला क्रिप्टो रिलीफ
जळगाव येथील विठ्ठल वाडी पवन बंगलो जुना निमखेडी रोड जळगाव येथील रहिवासी शैलाताई इंद्रराव पाटील (वय 66 )28/ 1/ 2022 रोजी दुखद निधन झाले त्यांच्या पश्चात पती ,एक मुलगा ,एक मुलगी ,नातवंडे, सुन, जावई जळगाव येथील उद्योगपती इंद्रराव पाटील हयांच्या त्या पत्नी होत्या, संदीप पाटील यांच्या आई होत्या.