Author: saimat team

पुणे, वृत्तसंस्था । पुण्यातील शाळा, कॉलेज 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना लस घेणं बंधनकारक आहे. ‘शाळा, कॉलेजमध्ये लसीकरण करणार आहोत, असंही पवार यांनी सांगितलं. मंत्रिमंडळात मास्क मुक्तीबाबत चर्चा नाही. त्यामुळे मास्क घालणं बंधनकारक आहे. इयत्ता पहिली ते 8 वीपर्यंतची शाळा दुपारी 4 पर्यंतच सुरू राहिल. दुपारी विद्यार्थ्यांनी घरी जाऊनच जेवण घ्यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मास्क काढूच नये हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे. इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले. नववी…

Read More

रत्नागिरी, वृत्तसंस्था । कोकण रेल्वे मामार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचं पर्व सुरु झाला असून विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. पूर्वीची दादर -रत्नागिरी आणि आताची दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला. गेल्यावर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या. गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह धावली. रात्री पहिली ईलेक्ट्रीक लोकोसह धावणारी पहिली गाडी रत्नागिरी स्थानकावर येणार आहे. विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्राना…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । घराच्या बाहेर लावलेली ५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विद्या नगर परिसरात राहणारे दिपक वासुदेव फालक (वय-३५) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे नोकरीवर जाण्यायेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एजे ११०१ ) क्रमांकाची दुचाकी आहे. २३ जानेवारी रोजी रविवार असल्याने ते घरीच होते. त्यांनी त्यांची दुचाकी घराच्या समोर पार्किंग करून लावली होती. दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची ५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात दुचाकीचा शोधाशोध केला…

Read More

जळगाव : (दि. 29 जानेवारी) डॉ. सुभाष जनार्दन कोलते (वय 71) यांचे दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता निधन झाले. ते नेत्ररोगतज्ज्ञ व गोल्ड सीटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. विकास बोरोले यांचे मामा तर  नेत्ररोगतज्ज्ञ  डॉ. अंकुश कोलते व प्रफुल्ल  कोलते  यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Read More

नंदुरबार, प्रतिनिधी । नंदुरबार गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये मोठी आग लागली आहे. आग लागल्याने प्रवाशांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. नंदुरबार स्थानकाच्या जवळ ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.. गांधीनगरवरून पूरीकडे जाणाऱ्या गांधीधाम एक्स्प्रेसला नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ मोठी आग लागली आहे. पॅन्ट्री कार आणि एका एसी बोगीला ही आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नंदुरबार स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडे आग विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा सज्ज नसल्याने, आगीने रौद्र रुप धारण केले. सध्या नंदुरबार स्थानिक प्रशासनाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेल्या डब्यातील प्रवाशी वेळीच बाहेर पडले होते. परंतू त्यांच्या सामानाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पॅन्ट्री कारमध्ये असलेल्या गॅस…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । लग्नात हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना रामेश्वर कॉलनी येथे घडली. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेचा लग्नात हुंडा दिला नाही म्हणून मानसिक व शारिरीक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या पुनम कल्पेश घरटे यांचा विवाह नाशिक येथील कल्पेश सुभाष घरटे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या दोन महिन्यानंतर विवाहितेला लग्ना हुंडा व मानपान दिला नाही पती कल्पेश घरटे याने…

Read More

जामनेर- तालुक्यातील चिंचखेडा बु! येथील रहिवाशी व जामनेर शहरातील हिमालया अॅ ग्रोचे संचालक आप्पासो आत्माराम शंकर पाटील यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी आज दीं.२८ रोजी संध्या.७:१२ वाजता औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर आज दीं.२९ रोजी सकाळी १० वाजता चिंचखेडा बू! येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.ते चिंचखेडा बू! येथील माजी सरपंच पांडूरंग शंकर पाटील यांचे मोठे बंधू होत. त्यांच्या पच्य्यात पत्नी, भाऊ, दोन बहिणी,तीन मुले , दोन मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read More

             धानोरा तालुका चोपडा – भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग व क्रीडा विभाग अंतर्गत १५ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडणूक साक्षरता मंचाची स्थापना प्रत्येक विद्यालयात केली होती.राष्ट्रिय मतदार सप्ताह अंतर्गत मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात व तालुका स्तरावर तहसिलदार अनिल गावित यांनी विविध स्पर्धा अंतर्गत निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व आभासी पडद्यावर वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यांत आले होते.या स्पर्धेत धानोरा येथील झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा.पाटिल ज्युनिअर काँलेजातील इयत्ता ९ वीची विद्यार्थीनी कु.मैथलि अनिल साळुंके हिने जिल्हातुन घोषवाक्य स्पर्धेत प्रथम पटकविला तर तालुका स्तरीय…

Read More

फैजपूर:प्रतिनिधी येथील तडवी वाड्यातील रहिवासी जसुबाई नजीर तडवी (वय -९२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ममुलं, मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते येथील पत्रकार राजु तडवी यांच्या आई होत.

Read More