Author: saimat team

अमळनेर ः प्रतिनिधी तालुक्यात २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या ५२ गावातील शेतकर्‍यांना टप्प्याटप्प्याने न्याय मिळवून देण्यात यश मिळत असल्याचे समाधान असून आता पुन्हा लाभापासून वंचित जुलै ते ऑगस्ट २०१९ मधील बाधित १५ गावांतील शेतकर्‍यांना पीक कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सतत पाठपुरावा करून २ कोटी ४७ लाख ६३ हजार निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात फक्त अमळनेर आणि यावल या दोनच तालुक्यांना हा लाभ मिळाला असून या गावातील शेतकर्‍यांना खरीप हंगाम पीक कर्जापोटी एक हेक्टर मर्यादेपर्यंत कर्जाची रक्कम आणि ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत संपूर्ण व्याज शासन माफ करणार आहे. कर्जमाफीबाबत शासन आदेश नुकतेच प्राप्त…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी अंजोर प्रकाशन,औरंगाबादच्या वतीने खानदेशकन्या कवयित्री बहिणाबाईं चौधरी यांच्या १४० व्या जयंतीवर्षानिमित्त ‘गारुड’ हा हस्तलिखित डिजिटल विशेषांक काढण्यात आला असून वाचकांना त्याचे पीडीएफ व्हाँट्सअँपवर ९०४९६७९७९० या मोबाईल क्रमांकावरून उपलब्ध करून देण्यात येईल.या अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा नुकताच झाला.विशेष म्हणजे हा अंक कवयित्री व लेखिका कविता महाजन ह्यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आला आहे. प्रा.सुरेखा दंडारे वसेकर व अशोक दंडारे यांनी दीपप्रज्ज्वलन आणि बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला.चित्रलेखा मेढेकर यांनी शारदास्तवन तर अंकिता मुळे हिने सरस्वती कौतुकम हे नृत्य सादर केले.त्यानंतर बहिणाबाईंवरील स्वरचित कविता वाचन प्रतिभा धामणे व इतरांनी केले.प्रास्ताविक सुरेखा दंडारे वसेकर यांनी केले. कवयित्री बहिणाबाई…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी बीएचआरप्रकरणात पुण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेने जळगावातील खान्देश मील कॉम्प्लेक्समधील दोन गाळे सील केले होते.या गाळ्यांमध्ये इतर कंपन्यांचे कार्यालय असल्याने १५ जानेवारीपर्यंत गाळ्यांचे सील काढण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. खान्देश मिल कॉम्प्लेक्समध्ये शॉप क्रमांक ४२ आणि ४३ हे पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी सील केले आहे. बीएचआर प्रकरणाचा तपास करण्यासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे येथून घेऊन हे कार्यालय सील केले होते. यासंदर्भात या ठिकाणी कार्यालय असलेल्या सुरज सुनील झंवर, सालासर ट्रेडिंग कंपनी, दीपक श्रीपतराव शिंदे, सुनील श्यामलाल कलंत्री, युगश्री जयसाई वेअर हाऊस प्रा.लि. श्री साईबाबा कोल्डस्टोरेज, श्री साई मार्केटिंग अ‍ॅण्ड…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी गेले जवळपास वर्षभर कोविड-१९ म्हणजेच कोरोना विषाणूचे थैमान जगभर सुरु आहे.आपल्या देशातही हे संक्रमण भयंकर प्रमाणात फैलावले होते. भारत सरकारने केलेल्या लॉकडाऊन मध्ये डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस, मनपा कर्मचारी इत्यादी हे कार्यरत होते. त्याचप्रमाणे बँक कर्मचारी सुद्धा पहिल्या दिवसापासून जनतेच्या सेवेत कार्यरत होते.इतर कोरोना योध्दांप्रमाणे बँक कर्मचारीही आपली ग्राहक सेवेचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडत होते. दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेने कोरोना काळात दिलेल्या बँकींग सेवेबद्दल बँकेच्या एमजे कॉलेज शाखेचे ग्राहक शैला तुकाराम बिराजदार व तुकाराम श्रीपतराव बिराजदार यांनी एमजे कॉलेज शाखेचे शाखा व्यवस्थापक व कर्मचार्‍यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बँकेने दिलेल्या सेवेबद्दल सौ. व श्री. बिराजदार यांनी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील चौपदरी मार्ग नियमबाह्य व बेकायदेशीर होत असल्याबाबत जिल्हा मऩियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी पोलिस तक्रार दाखल केली असून रस्ता सुरक्षा सप्ताहात अपघात झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदाराविरुध्द रितसर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, शहरातून जात असलेल्या चौपदरी मार्गाबाबत अजिंठा चौक ते इच्छादेवी या दरम्यान होत असलेल्या अपघाताबाबत व त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्लीच्या मुख्य कार्यालयाच्या २७ जुलै २०१८च्या तपासणी अहवालाप्रमाणे काम होत नाही. यात स्थानिक गरजा, जागेवरील आवश्यकता,सुरक्षा, सर्विस रोड,अस्तित्वात असलेल्या रोड ड्रेनेज,रुंदी करून आवश्यक सेवा, अंडरपास व फुटवेअर ब्रिजचा समावेश असावा तसेच अस्तित्वातील असलेल्या ६० मीटर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटची “कोविशील्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस काल जळगाव शहरात पोहोचली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सकांना सोबत घेऊन ही लस ज्या ठिकाणी दिली जाणार आहे त्या जागेची बारकाईने पाहणी केली. पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात नऊ केंद्रांवर प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस दिली जाणार आहे. जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यावर “कोविशील्ड’ लसीची निमिर्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काल संध्याकाळी ६ वाजता पाहणी केली.…

Read More

पाचोरा/चाळीसगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील १९ वर्षीय तरुणीचा घरात एकटी असतांना तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तर चाळीसगाव शहरात एका विवाहाच्या कार्यक्रमास आली असता ४२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील १९ वर्षीय तरुणी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरात एकटी असतांना घरात कुणीही नसल्याचा फायदा उचलत संशयीत आरोपी गजानन माणिक पाटील (रा.शिंदाड, ता.पाचोरा) याने मद्यधुंद अवस्थेत घरात घुसत पिडीत तरुणीचा उजवा हात पकडत अलिंगन देत पिडीतीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन पिंपळगाव-हरेश्‍वर पोलीस स्थानकात गजानन माणिक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जिल्हा परिषद कॉलनीतील जिल्हा क्रिडा निवासस्थानात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या रोकडसह सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून एका अधिकार्‍याच्या घरीच चोरट्यांनी डल्ला मारत पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद कॉलनीत जिल्हा क्रिडा अधिकारी सुजाता चव्हाण (वय ५२) यांचे निवासस्थान आहे. काल मंगळवार दुपारी मु.जे. महाविद्यालयात युवा सप्ताह अंतर्गत युवा दिनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या. याच सुमारास त्यांच्या निवासस्थानात बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रोकडसह दोन लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. सुजाता…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात मंगळवारी टॉक शो झाला. यात अयोध्यानगरीतील भव्य श्रीराम मंदिर निर्माणातील विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी (मुंबई) म्हणाले की, रामजन्म भूमीमुक्तीचा लढा हा १५२८ पासूनचा आहे. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. या वेळी महासभेकडून अयोध्येतही राममंदिर उभारण्याचा प्रश्न पुढे करण्यात आला व समिती स्थापन झाली. हे आंदोलन कुण्या पक्षाची मक्तेदारी नव्हती. राजकीय दृष्ट्या या चळवळीला कोण्या पक्षाच लेबल लावता येणार नाही. सन १९९० पासून या आंदोलनाला राजकीय रंग चढवला, असे भंडारी म्हणले. ऍड. सुशील अत्रे सूत्रसंचालन केले. सामाजिक वैचारिक भिन्नता दूर करण्याचे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील आकाशवाणी चौफुलीनजिकच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद यांचे जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस. महाजन सर यांनी प्रास्ताविकात मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील व लहान बालकांनी मॉंसाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत दोघांचे प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ऍड. भैय्यासाहेब यांनी या दोघंही महान विभूतींच्या कार्याबद्दल आपले मनोगतातून सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी वाय.एस. महाजन सर, स्वप्निल नेमाडे, महिला जिल्हाध्य्क्षा कल्पनाताई पाटील, मंगलाताई पाटील, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्‍वरी, सुनिल माळी, किरण राजपूत, ऍड. राजेय गोयर, राजु भंगाळे, चंद्रकांत…

Read More