Author: saimat team

अमृतसर, वृत्तसंस्था । आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये चरणजितसिंग चन्नी हे पंजाबमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, असं राहुल गांधी यांनी रविवारी दुपारी जाहीर केल. .यामुळे नवज्योत सिंग सिद्धू या पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. परंतु सत्ता आल्यावर त्यांचं महत्त्वाचं स्थान असेल असे संकेतही मिळाले आहेत. चन्नी यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर लगेचच त्यांनी सिद्धू यांच्या पाया पडल्याचं दिसून आलं. त्यानंतर लगेचच सिद्धू यांनी चन्नी यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे चन्नी एक हात वर उंचावून विजेत्याप्रमाणे अभिवादन केले.त्यानंतर राहुल गांधी, नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणजितसिंग चन्नी या तिघांनीही एकमेकांना मिठी मारत अभिवादन केलं आणि आपले हात उंचावून एकीचा संदेश देत पक्षात कटुता असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मुख्यमंत्री…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये 15 जून 2020 रोजी चीनसोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेले बिहारचे नाईक दीपक सिंह यांची 23 वर्षीय पत्नी रेखा देवी यांनीही आपल्या पतीच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रेखा देवी या मूळच्या मध्य प्रदेशातील रीवा येथील असून त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्या लष्करात अधिकारी म्हणून काम करणार आहेत. शहीद दीपक सिंह बिहार रेजिमेंटच्या 16 व्या बटालियनमध्ये होते. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांना हुसकावून लावताना ते शहीद झाले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले होते. दीपक सिंह यांच्या पत्नी रेखा…

Read More

अरुणाचल प्रदेश, वृत्तसंस्था । अरुणाचल प्रदेशच्या कामेंग सेक्टरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अतिउंचीवर असलेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे 7 जवान अडकले गेल्याचं वृत्त आहे. हिमस्खलनाची एक मोठी घटना घडली आहे. हिमस्खलनाचा तडाखा बसलेल्या लष्कराच्या गस्ती दलाला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचं भारतीय लष्करानं सांगितलं आहे. बचाव कार्यात मदत करण्यासाठी विशेष पथके विमानातून पाठवण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यानं वातावरणात बिघाड झाला आहे. हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, मनाली-लेह महामार्गावर हिमस्खलन झाल्याची बातमी आहे. यानंतर सुट्टीवर गेलेल्या पर्यटकांना विशेषतः सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.…

Read More

अमळनेर, प्रतिनिधी । बाटलीमध्ये पेट्रोल भरून दिले नाही म्हणून तीन जणांनी पंपावर काम करणाऱ्या ऑपरेटर ला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिव पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून ऑपरेटरला तिघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिव पेट्रोल पंप येथे शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पेट्रोल पंप ऑपरेटर पंकज सुरसिंग वानखेडे रा. झाडी ता. अमळनेर हा कामावर असतांना त्याठिकाणी उमेश पाटील, यश पाटील आणि बाबू भगवान (पुर्ण नाव माहित…

Read More

श्रीनगर, वृत्तसंस्था । संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भाषणावर उत्तर देणारं भाषण करणार आहेत तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यसभेमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज सकाळी राज्यसभेमध्ये तर दुपारीलोकसभेमध्ये ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबारासंदर्भात माहिती देणार आहेत. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर 3 फेब्रवारी रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा दावा ओवैसी यांनी केला होता. या हल्ल्याच्या घटेनंतर ओवैसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. आमदार राम कदम यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. भारताच्या महान गायिका लता दीदींवर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच शिवाजी पार्क मैदानावर लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारण्यात यावे अशी मागणी संपूर्ण देशाची नव्हे तर जगातील कोट्यावधी संगीत प्रेमी अन लता दीदीच्या चाहत्यांची आहे. लताजींचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्यामुळे त्यांचे स्मृतीस्थळ उभारल्यास त्यांचे चाहते येथे येऊन त्यांचे स्मरण करतील, त्यांना आदरांजली वाहतील. लतादीदींच्या चाहत्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्या ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत मोलाची भूमिका निभावलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चक्क राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काल संतप्त टीकाबाण सोडले. राऊत यांनी आघाडीच्या या दोन्ही बड्या नेत्यांना बिनबुडाचे राजकारणी संबोधले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातील रोखठोक स्तंभात राऊत यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत, आघाडी सरकारचे इतर मंत्री लवकरच गजाआड होतील, असा विरोधकांकडून इशारा दिला जात आहे, हे सारे राज्य सरकार कसे सहन करते, असा राऊतांचा सवाल आहे. दीव-दमणचे भाजप खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. याप्रकरणी भाजपचे प्रफुल्ल खोडा यांच्यावर गुन्हा दाखल…

Read More

नागपूर, वृत्तसंस्था । धर्मसंसदेच्या कार्यक्रमांमध्ये कथितपणे केल्या जाणाऱ्या हिंदुत्वासंबंधी वादग्रस्त वक्तव्यांवर सरसंघघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. मोहन भागवत यांनी या वक्तव्यांवर असहमती व्यक्त केली असून हे कार्यक्रम हिंदू विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. धर्मसंसदेतून आलेल्या गोष्टी हिंदू आणि हिंदुत्वाच्या व्याख्येला अनुसरुन नसल्याचंही ते म्हणाले आहेत. नागपुरातील एका वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता’ या व्याख्यानाला संबोधित करत असताना मोहन भागवतांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी धर्मसंसदेत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर नाराजी जाहीर करत सांगितले की, “धर्मसंसदेच्या कार्यक्रमातून जे काही समोर येत आहे ते हिंदू शब्द, हिंदू कर्म किंवा हिंदू मन नाही”. गतवर्षी डिसेंबर महिन्यात हरिद्वार…

Read More

चोपडा, प्रतिनिधी । तालुक्यातील ४८ वर्षीय बिडगाव येथील शिक्षकाचा चोपडा – शिरपूर मार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र रामचंद्र वाघ (48) असे मयताचे नाव आहे. शहरातील शिव कॉलनीमधील रहिवासी व बिडगाव येथील ओं.गो.पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक राजेंद्र रामचंद्र वाघ (48) हे पत्नीसह 5 रोजी सायंकाळी जुना हरेश्वर रस्त्याने पायी फिरायला गेले होते. संस्कार मंडपम या मंगल कार्यालयाजवळून घराकडे परत येत असताना अरुंद पुलाजवळ त्यांना चोपड्याकडे येणार्‍या एका अज्ञात दुचाकी चालकाने त्यांना मागून जबर धडक दिली. या अपघातात जबर जखमी झाल्यामुळे त्यांना तत्काळ उपचारार्थ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु…

Read More