Author: saimat team

जम्मू, वृत्तसंस्था । भारतीय रेल्वे जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधत आहे. चिनाब पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल यावर्षी डिसेंबरपर्यंत रेल्वे वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा सुमारे 35 मीटर उंच असून त्याची लांबी सुमारे 1.3 किलोमीटर इतकी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या पुलाचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ढगांमध्ये दिसणारा जगातील सर्वात उंच कमान असलेला चिनाब पूल.’ अतिशय सुंदर दिसणारे हे चित्र एखाद्या पेंटिंगपेक्षा कमी नाही. हा पूल एवढा उंच आहे की, त्याच्या काही फूटखाली ढगही दिसत असल्याचे चित्रात दिसतेय. चिनाब नदीपात्रापासून सुमारे 359…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । प्रभाग क्र. 12 मधील विकास कामांचे फलक फाडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी, ह्याबाबतचे निवेदन युवा सेना जळगाव महानगरतर्फे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रभर विकास कामे झपाट्याने करीत आहे. जळगाव शहरात सुद्धा राज्यसरकारचे नगरविकास मंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जळगाव शहरातील विविध प्रभागात विकास कामे सुरू आहेत. सदर विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या अनुषंगाने प्रभाग क्र. 12 मधील शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते अनंत जोशी व ज्येष्ठ नगरसेवक नितीनजी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने किराणा दुकान सुपर मार्केट व मॉलमधून “वाइन” विक्रीचा निर्णय घेतला आहे तो निर्णय महाराष्ट्र सरकारने तातडीने रद्द करावा अशी मागणी करणारे निवेदन समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा यांच्यातर्फे जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दि.8 फेब्रुवारी2022 रोजी देण्यात आले. सदरचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांना दिले आहे या निवेदनामध्ये नवीन युवा पिढी,सामान्य जनता व्यसनाधीन होण्याचे वाढते प्रमाण झाल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे त्यामुळे राज्य शासनाने रद्द करावा अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्ह्याच्या वतीने तालुका आणि जिल्हा स्तरावर विविध प्रकारचे…

Read More

भडगाव, प्रतिनिधी । कजगाव तालुका भडगाव जळगाव चांदवड महामार्गावरील अपूर्ण काम अपघाताला आमंत्रण देत आहे, भोरटेक गावजवळ , वळणावर थांबलेल्या कामा मुळे बरेच अपघात होत असतात , जळगाव चांदवड महामार्गाचे बरेच काम पूर्ण झाले आहेत, मात्र वळणावरील सारे कामे अपूर्ण असून बंद पडली आहेत. या खराब रस्त्यावर वळणावर अनेक अपघात झाले आहेत व बरेच मोटरसायकल स्वराना मोठी दुखापत झाली आहे , मात्र दोन ते तीन वर्षा पासून ही कामे रखडली आहे , अजून पूर्ण झाले नाही, रस्त्याच्या वळणावर खडी वर आल्याने बरेच अपघात होत असतात, जेथे काम थांबले आहे तेथे साधी डॉग जूगी ही होत नाही हे मात्र दुर्दैव, भोरटेक…

Read More

जळगाव, , प्रतिनिधी । ज्येष्ठ गायिका व भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना रायसोनी महाविध्यालयातर्फे सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. बिजनेस मॅनेजमेंट विभागाच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातील म्युझिक क्लबच्या वतीने दिवसभर लता मंगेशकर यांची गाणी सुरू ठेवून महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले कि, ‘‘प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींसाठी त्यांनी गाणं गायले. स्वातंत्र्यदिन असो की, सकाळी उठल्यावर देवाची आरती, मंदिरात गेल्यावर कानावर पडणारे सुर असो त्यांनी त्याला शब्दबद्ध करत गायले. तसेच…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । पहूर जवळ असलेल्या पिंपळगाव बुद्रुक या परिसरात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, शेतातून मोटार पंप,केबल वायर,व पाईप, यांचे चोरीचे प्रमाण वाढत असून गावठी दारूचे प्रमाणही वाढत आहे गेल्या काही दिवसापूर्वी पहूर पोलिस स्टेशनला पो.नि . अरुण धनवडे साहेब असताना अवैध धंदे गावठी दारू सट्टा पत्ता आणि चोरीचे प्रमाण बंद झाले होते, अरुण धनवडे साहेब यांची राजकीय पुढाऱ्यांच्या हातून त्यांची बदली झाल्याचे समजते, धनवडे साहेब पहूर येथून बदली होतास अवैध धंदे, सट्टा, पत्ता, आणि चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, अवैध धंद्या वरती आणि गावठी दारू सट्टा पत्ता यांचे प्रमाण वाढले असून ते बंद होईल का, यांच्याकडे सर्व…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । येथील पी ई तात्या पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये कार्यरत शिक्षक व गेंदालाल मिल मधील रहिवासी तथा मनियार बिरादरीचे सदस्य मोहम्मद आसिफ शेख रहीम यांनी नुकत्याच झालेल्या उर्दू सेट परीक्षेत ओबीसी कैटेगिरीतून महाराष्ट्र राज्यातून फक्त ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन जळगाव जिल्ह्याचे व मनियार बिरादरीचे नाव अजरामर केल्या बाबत त्यांचा गौरव जळगाव जिल्हा मनियार बिरादरी च्या रथ चौक येथील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनियार बिरादरीचे महानगर अध्यक्ष सय्यद चाँद तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष फारुक शेख होते यावेळी बिरादरीचे सलीम मोहम्मद, तय्यब शेख, अब्दुल बारी, एजाज सैयद,अल्ताफ शेख हारून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (बुरखा) घालण्यास बंदी घातली गेली त्याविरोधात मुस्लिम विद्यार्थिनींनी आंदोलन केले असता ती बंदी कही अंशी उठवण्यात आली परंतु ज्या विद्यार्थिनी हिजाब घालून येतील त्या विद्यार्थिनींना वेगळ्या क्लास रूम( वर्ग खोली) मध्ये बसवण्यात येईल असे ठरले त्यावरही विद्यार्थिनीनी आपली सहमती दर्शवली असता आज विद्यार्थिनी आपल्या शिक्षणासाठी महाविद्यालयात येतांना त्यांना काही भगवा मफलर (पट्टा) धारण केलेले तरुण युवकांनी महाविद्यालयात येण्यास मज्जाव केला. या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील हिंदू- मुस्लिम महिला यांनी प्रतिसाद देत जिल्हाअधिकारी कार्यलय गाठुन…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्राप्त तक्रारीची जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांची उपस्थिती होती. रुपाली चाकणकर म्हणाल्या कि, राज्य शासन महिला आयोगातर्फे अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी समिती कार्यरत आहे, जिल्ह्यात कोविड संसर्ग काळात विधवा, एकल महिलांच्या तसेच पालकत्व गमावलेल्या 20 मुलांना 5 लाख रुपये शासन स्तरावरून मदत देण्यात आली. 569 महिलांना लाभ देण्यात आला आहे. तसेच अन्य निराधार महिलांना शिलाई मशीन, रेशन लाभ, वृद्धापकाळ पेन्शन आदी लाभ देण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यात 20 बालविवाह रोखण्यासाठी कारवाई देखील…

Read More