Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । कान्हदेशाला संपन्न ऐतिहासीक परंपरा लाभली असून स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्त्वाचे योगदान कान्हदेशवासीयांचे आहे. स्वातंत्र्य संग्रामासाठी ऊर्जाशील ठरलेल्या या पावन भूमिमध्ये महात्मा गांधीजींनी भेट दिली. महात्मा गांधीजींच्या 1927 च्या जळगाव भेटीला 95 वर्ष पूर्ण होत आहे. यापार्श्वभूमीवर ‘कान्हदेशातील गांधी’ या विषयावर वेबिनाराचे आयोजन गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील महात्मा गांधी स्टडी अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यातर्फे केले आहे. दि. 11 फेब्रुवारी 2022, सकाळी 10.00 ते 11.15 वाजता ‘कान्हदेशात गांधी’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. विश्वास पाटील वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधीजींचे पणतू श्रीमान तुषार गांधी असतील. ऑनलाइन कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशनकरून सहभागी झालेल्यांना…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर सडकून टीका केली. यामुळे बिथरलेल्या काँग्रेसने राज्यात आंदोलनाचा इशारा दिलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात सगळ्या भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसच्यावतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे खबरदारी म्हणून मुंबईतील नरिमन पॉईंट, दादर येथील वसंत स्मृती या भाजप कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तर अमरावतीमध्ये भाजप आमदार आणि माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर आले तर त्याला झोडल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही. असा इशारा दिला आहे.

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती असाही गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान यामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकावले जात आहे, जेणेकरुन आपण राज्यसभेत मोकळेपणाने बोलू नये असाही आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत राज्यसभेचे खासदार असल्याने त्यांनी व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले असून काही खळबळजनक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्यावर आरोप होत…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शानबाग सभागृह येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगांव जिल्हातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात युवक जिल्हा अध्यक्षपदी अनिल (छोटू) शिंदे जामनेर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जळगांव तालुका अध्यक्षपदी दिलीप शालिग्राम जगताप रिधूर् तर जिल्हा सह कार्याध्यक्षपदी किशोर मधूकर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष सुमन गांगुर्डे, पल्लवी शिरसाठ भडगांव, सचिव माधवी निंबाळकर, सरचिटणीस संगीता पगारे, संपर्क प्रमुख सरला खोंडे, मीनाक्षी वखरे बोदवड, संघटक अनिता वाघीले, दिपाली इंगळे जामनेर, जोस्ना शिरसाठ पाचोरा, प्रसिध्द प्रमुखपदी ममता खोंडे तर जिल्हा कार्यकारणी सदस्य अलका सोनवणे, माधुरी बोरसे, उर्मिला सोनवणे, शितल बोरसे, प्रतिभा वाघ, जोष्ना शिरसाठ, योगिता सोनवणे, संगीता…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ रावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेना तसेच गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिराचे येथील महाश्वेरी मंगल कार्यालयात मध्ये आज सकाळी दहा वाजताआयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डोळ्याचे तपासणी हृदयरोग तपासणी नाक कान घसा तपासणी तसेच इतर आरोग्य वर सुद्धा तपासणी करण्यात आली या शिबिरात येथील 239 नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे या शिबिराचे उद्घाटन जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पी रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल शेंदुर्णी…

Read More

जळगाव, विशेष प्रतिनिधी । गेल्या 4 जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी स्वतः रस्त्यावर येत शहर आणि परिसरातील तब्बल 9 सट्टा व जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या होत्या.त्या कारवाईत 29 जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात येऊन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.एसपींच्या त्या कारवाईचे सर्वत्र कौतुक,अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले होते.शहरातूनच नव्हे ,तर जिल्ह्यातून आता अवैध धंदे हद्दपार होतील असा तेव्हा कयास लावला जात होता मात्र काही दिवसांनीच शहर व परिसरात सट्टा-जुगाराचे अड्डे नव्या जोमात सुरू झालेले दिसत आहेत.त्यावरून एसपी साहेबांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे व हे धंदे पुन्हा सुरू कसे ?असा प्रश्न जळगावकर विचारू लागले आहेत. वास्तविक जिल्हा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरूवार दि.10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरील पुढील लिंकवर पाहता येईल. राज्य सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याच्या ऊर्जा विभागाने गेल्या दोन वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली आहे. कृषीपंप जोडणी धोरण आणि अपारंपरिक ऊर्जा धोरणांची वैशिष्ट्ये, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊर्जा विभागाचे प्रयत्न, उद्योगांना दिलासा देण्यासाठी उचललेली पाऊले, निसर्ग चक्रीवादळ तसेच तोक्ते चक्रीवादळात ऊर्जा विभागाने…

Read More

यावल, प्रतिनिधी । आज बुधवार दि.९ रोजी यावल तालुक्यातील सांगावी बु.येथे डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांशी विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून भविष्यात आवश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणी अभियानाचे साहवे सत्रात हे पोहोचले आहे. सांगवी बु. ग्रामपंचायत जवळ या मोफत ई – श्रम कार्ड नोंदणीचे सत्र घेण्यात आले,याअभियानात गावातील एकूण385लाभार्थ्यांनी लाभ घेतला.याअभियानाच्या प्रमुख पदी श्रीकांत महाजन होते. अभियानाचे उदघाट्न जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत दादा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नारायण चौधरी, योगेश भंगाळे, डॉ. कुंदन फेगडे, रशीद तडवी (सरपंच), धनराज पाटील, दिनेश पाटील, योगेश भंगाळे, शरद तायडे, प्रशांत बेंडाळे, अभय…

Read More

अमरावती, वृत्तसंस्था । अमरावतीचे महापालिका आयक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईहल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आयुक्त आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकत त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. काही महिलांनी अचानक येत आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली. अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं आहे. 12 डिसेंबरला युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. पण त्यानंतर 16 डिसेंबरला तो पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. पुतळा का हटवला याचा जाब विचारत काही महिलांनी आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाई फेकली. पालिकेचे सुरक्षा रक्षक तात्काळ आष्टीकर यांच्या बचावासाठी धावले आणि प्रसंगावधान दाखवून शाईफेक करणाऱ्या महिलांना…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । सर्व संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या  भारताच्या गणकोकीळा स्व. लता मंगेशकर यांना ओजस्विनी कला महाविद्यालयाने ५०० किलो रांगोळीतुन साकारलेल्या प्रतिकृतीतुन आदरांजली अपूर्ण करण्यात आली. ४० बाय ४० या आकारात साकारलेल्या या भव्य रांगोळीच्या  प्रतिकृतीत पांढरा आणि काळ्या रंगाचा वापर केला आहे. लतादीदी या भारताचे भूषण असल्याने यात तिरंगा ध्वज देखील साकारण्यात आला आहे. तब्बल ५ शिक्षक आणि विद्यार्थी यांनी २४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही रांगोळी  पूर्णत्वास आली. रांगोळीची संकल्पना ओजस्विनी कला विभागाचे विभागप्रमुख प्रा. मिलन भामरे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ, प्रा. पियुष बडगुजर, प्रा. डिगंबर शिरसाळे, प्रा. राजेंद्र सरोदे यांची आहे. रांगोळी रेखाटण्यात भूषण पाटील, आयुषी जैन, लक्षिता जैन,…

Read More