जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील इकरा शिक्षण संसथे चे अध्यक्ष आणि अल-फैज फाऊंडेशन जळगाव चे संस्थापक डॉ.अब्दुल करीम सालार यांना नुकतेच एका समारंभात “सिपास नामा” आणि “फखर ए खांदेश” पुरस्कार” प्रदान करण्यात आला. इकरा चे अध्यक्ष आणि अल-फैज फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. अब्दुल करीम सालार यांना मदिना कॉलनी, उस्मानिया पार्क, जळगाव येथील रहिवाशांनी एका कार्यक्रमात मानार्थ “सीपास नामा ” प्रदान केले. आभार पत्र सुप्रसिद्ध कवी आणि सूत्रसंचालक साबीर मुस्तफा आबादी यांच्या तर्फे हस्त लिखित मान पत्र, त्यांच्या शैक्षणिक सेवेचा गौरव म्हणून “फखर ए खानदेश ” पुरस्कार प्रदान करण्यात आला.शेख मसूद चाँद, फेरोज खान, अनसार खान, रझा सर, दानिश खान, जुनैद निशात यांच्या…
Author: saimat team
मुंबई : प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चुलत भावाच्या सह-मालकीच्या कंपनीची ईडीकडून 10.9 कोटी रुपयांच्या कथित पेमेंटची चौकशी सुरू आहे. अनेक कंपन्यांच्या माध्यमातून हे पैसे अनिल देखमुखांना पाठवण्यात आले होते, असा ईडीला संशय आहे. या कंपनीची चौकशी केली जात आहे. ही कंपनी सत्यजीत देशमुख यांच्या मालकीची आहे. सत्यजीत देशमुख हे अमेरिकास्थित लुईस बर्जरचे उपकंत्राटदार आहेत. तसेच ते वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार असून मुंंबई कोस्टल रोड आणि मुंंबई-नागपूर एक्स्प्रेस वे या दोन इतर हाय-प्रोफाइल प्रकल्पांसाठी देखील ते उपसल्लागार आहेत. सत्यजीत देशमुख यांंनी ईडीकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, इनोवेव्हने यापूर्वी कोणताही सल्लागार प्रकल्प केलेला नाही. तसेच सप्टेंबर…
नवीदिल्ली ः वृत्तसंस्था । गेल्या तीन वर्षांत सुमारे 10 हजार लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या असल्याची माहिती संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. केंद्र सरकारच्या या उत्तरानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलेच घेरले. दरम्यान, भाजपा खासदाराने गुरुवारी राज्यसभेत अंबानी आणि अदानी यांची पूजा करावी असे म्हटले आहे. कारण ते लोकांना नोकऱ्या देत आहेत. बेरोजगारीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये काल जोरदार वादावादी झाली. त्यावेळी भाजपा खासदार केजे अल्फोन्स यांंनी चर्चेत भाग घेत हे वक्तव्य केले आहे. “तुम्ही माझ्यावर भांंडवलदारांचे मुखपत्र असल्याचा आरोप करू शकता. मी अशा लोकांंची नावे घेतो ज्यांंनी या देशात नोकऱ्या निर्माण केल्या आहेत…
पुणे : वृत्तसंस्था । टीईटी पेपरफुटीप्रकरणी जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याला तब्बल 30 लाख रूपये दिले. शिवकुमारनेच ही माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे तुकाराम सुपे याच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. 2018 मध्येच हे प्रकरण उघडकीला आले असते पण सुपे याने ते दाबून टाकले, अशी माहिती शिवकुमारकडून बाहेर आली आहे. टीईटी पेपरफुटीप्रकरणी सुपे आणि परीक्षा घेणाऱ्या जीए कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुखचा एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना अटक करण्यात आली आहे. बनावट प्रमाणपत्र आल्यावर सुपेने कारवाई का केली नाही, प्रमाणपत्र मिळालेले ते 18 विद्यार्थी कोण, असे प्रश्न यातून उपस्थित करण्यात येत…
मुंबई ः प्रतिनिधी । कर्नाटकमधील हिजाब वादावरुन सध्या देशभरात वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटलं. यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण करणाऱ्या कंगना रणौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. कंगना रणौतने इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर केली असून यामध्ये तिने महिला स्विमिंग सूटमध्ये बीचवर बसल्याचा आणि बुरख्यातील असा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “इराण. 1973 आणि…
फऱीदाबाद : वृत्तसंस्था । उंच इमारतींच्या गॅलरींमधून लहान मुलं खाली पडल्याच्या अनेक दुर्दैवी घटना आपण आजपर्यंत वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण एखाद्या आईनेच आपल्या मुलाला इमारतीच्या 10 व्या माळ्यावरुन लटकवल्याचे तुम्ही कधी ऐकले किंवा पाहिले नसे परंतु अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये महिलेने चक्क आपल्या मुलालाच उंच इमारतीच्या गॅलरीतून खाली उतरण्यास भाग पाडले. फरिदाबादमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिला आपल्या मुलाला नवव्या माळ्यावरील गॅलरीत उतरवताना दिसत असून नंतर बेडशीटच्या सहाय्याने वरती खेचत असल्याचे दिसत आहे. पण असं करण्यामागचं कारण काय? कारण ऐकून तुमचाही संताप होईल. कारण…
अहमदाबाद ः वृत्तसंस्था । मालिका विजयाने फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला आता विंंडीजविरुद्ध क्लीन स्वीपची संधी आहे. भारत आणि विंडीज यांच्यात आज शुक्रवारी मालिकेतील शेवटचा तिसरा वनडे सामना होणार आहे. सलगचे दोन सामने जिकूंन यजमान टीम इंडियाने मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. पूर्ण वेळ कर्णधाराच्या भूमिकेेत रोहित शर्मानेे आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला पहिला मालिका विजय मिळवून दिल आहे. आता घरच्या मैदानावर विंडीज टीमचा धुव्वा उडवण्याचा त्याचा मानस आहे. यासह त्याला आपल्या नेतृत्वात घवघवीत यशासह विक्रमाला गवसणी घालण्याची मोठी संधी आहे. भारतीय संघाने अद्याप मालिकेत विंडीज संघाला अद्याप क्लीन स्वीप दिले नाही. भारताने 2019 मध्ये विंडीज दौऱ्यात तीन वनडे सामन्यांची…
जळगाव ः प्रतिनिधी । तालुक्यातील रायपूर येथे शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या घरकूल योजनेसाठी (पंतप्रधान आवास योजना) गरजू लाभार्थ्यांसाठी जाहीर झालेल्या ‘ड’ पत्रक यादीचा सर्व्हे करण्यात आला. यात सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सावळा गोंधळ उडाला आहे. यावेळी सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काही बोगस लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देवून यादी घोषित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, यामुळे खरे लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिले आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि वंचित लाभार्थ्यांतर्फे पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात येऊन पं.स.सभापतींना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांच्या या भोंगळ प्रकारामुळे खऱ्या लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काही लाभार्थ्यांना पुन्हा दिला घरकुलाचा लाभ खरे लाभार्थी मात्र घरकुलापासून वंचित निवेदनात…
जळगाव ः प्रतिनिधी । शहरातील खडके चाळीतील सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचे तीन तेरा या मथळ्याखाली सायंदैनिक साईमतने काल वृत्त प्रकाशित केली.या वृत्ताची मनपा प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन काल सायंकाळी व आज सकाळी या सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करण्यात आली आहे. ही कार्यवाही तातडीने होताच खडके चाळ परिसरातील नागरिकांनी ‘साईमत’ला धन्यवाद दिले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील खडके चाळ या वस्तीसाठी त्यामागील बाजूला शहर महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालय बनविले आहे परंतु गेल्या 15 ते 20 दिवसापासून महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांंनी येथे स्वच्छताच केली नाही. त्यामुळे येथे नेहमी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत काही नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना ही समस्या कथन केली परंतु…
पुणे, वृत्तसंस्था । महाराष्ट्र परीक्षांच्या भरती घोटाळ्यात पुरता अडकून गेला आहे. म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा आणि सर्वात मोठा घोटाळा तो म्हणजे शिक्षक भरती घोटाळा. या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी उमेदवारांना पोस्टानं पाठवलेली तीनशे बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 7 हजार 900 जणांना पात्र केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सविस्तर अहवाल तयार करुन सरकारला सादर केला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामुळे आता बोगस शिक्षकांची जेलची हवा पक्की झाली आहे. बोगस 7 हजार 900 शिक्षकांंची यादी पत्त्यांसह तयार…