लखनऊ, वृत्तसंस्था । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले असून मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे वृत्त आहे.राज्याच्या पश्चिम भागाच्या 11 जिल्ह्यांतील 58 मतदारसंंघात मतदान होत असून या 58 मतदारसंघातील प्रचार मंगळवारी थंंडावला होता. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वे राबवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारमधील श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंह, कपिलदेव अगरवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नारायण हे मंत्री पहिल्या टप्प्यात प्रमुख उमेदवार आहेत. या 58 मतदारसंघात एकूण 623 उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून दोन कोटी 27 लाख मतदार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । नोटबंदीनंतर देशात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. गेल्या दोन वर्षात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील वाढले असून नागरिकांना सजग करणे आवश्यक आहे. नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून आयोजित ‘डिजीटल बँक’ वेबिनारमध्ये बँक मित्र निलेश पाटील यांनी ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे सोपे मार्ग नागरिकांना समजावून सांगितले. ऑनलाईन व्यवहार गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात वाढले असून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. नागरिकांना जागरूक करण्यासाठी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे बुधवारी ‘डिजीटल बँक’ या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा स्वयंसेवक हेतल पाटील यांनी या वेबिनारचे आयोजन केले होते. वेबिनारसाठी अतुल चौधरी,…
कजगाव ता.भडगाव – येथुन जवळच असलेल्या तांदुळवाडी व भोरटेक शिवारातील शेत शिवारात गेल्या पंधरा दिवसापासून वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने पाण्याच्या मोटारी (पंप) चालत नसल्याने पीक ऊन धरू लागल्याने संतप्त शेतकरी दि.९ रोजी कजगाव वीज वितरण च्या कार्यालयात धडकले. तांदुळवाडी व भोरटेक शिवारातील तांदुळवाडी फाट्या वरील ट्रान्सफॉर्मर व भोरटेक शिवारातील तारसिंगी ट्रान्सफॉर्मर या दोघ ट्रान्सफॉर्मर वरून गेल्या पंधरा दिवसांपासून कमी दाबाचा विज पुरवठा होत असल्याने या ट्रान्सफॉर्मर वरील विद्युतपम्प चालत नसल्याने गहु, मका,ज्वारी सह फळ बागांना पाणी देता येत नसल्याने पीक ऊन धरत काहि पीक सुकु लागली आहे या बाबतीत या ट्रान्सफॉर्मर वरील शेतकऱ्यांनी अनेक वेळा कमी दाबाच्या विज पुरवठा…
भडगाव, प्रतिनिधी । कजगाव येथील बस स्थानक चौकात २५१५ या मुलभुत सुविधा अंतर्गत आमदार किशोर पाटील यांच्या निधीतून पाच लाख रुपये खर्चाचे फेव्हरब्लॉक बसविण्याच्या कामाचे उदघाटन दि.९ रोजी सम्पन्न झाले येथील बस स्थानक चौक सुशोभीकरण च्या दृष्टिकोनातून आमदार किशोर पाटील यांनी २५१५ या मुलभुत सुविधा या योजने अंतर्गत आमदार निधीतून पाच लाख रुपये चे फेव्हरब्लॉक बसविण्या साठीच्या खर्चाच्या कामास मंजुरात दिल्याने दि.९ रोजी या कामास मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवुन शुभारंभ करण्यात आले प्रसंगी राजु चव्हाण, अनिल महाजन,अनिल टेलर,आबा न्हावी,आशीष वाणी, बापु मोरे,दिनेश पाटील,आण्णा शिंदे,शहीद मण्यार,यतीन न्याती,बापु पाटील सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते
यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच यांचा मुलगा यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात यावल तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत मधील नमुना नंबर 8 व 9 चे वाचन करून शासकीय कामकाजाचा नवीन विक्रम केला असल्याची तक्रार दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दि.९ फेब्रुवारी २०२२ रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, यावल तालुक्यातील दुसखेडा येथील घरकुलाची “ड” यादी ही शासनाकडून मंजुर झाली आहे. मंजूर घरकुलांच्या यादीचे वाचन हे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन करावी लागते परंतु विद्यमान ग्रामसेवक हे आज…
मुक्ताईनगर, प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील ३१ वर्षीय नर्स तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवीत सलग पाच महिने अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत अमरावती जिल्ह्यातील ३१ वर्षीय नर्स तरुणीवर पाच महिने अत्याचार केल्याचा धक्कादायक बाब समोर आलीय. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने तरूणाविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती शहरातील ३१ वर्षीय तरुणी एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला आहे. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘हॅलो यू ॲप’च्या माध्यमातून तरूणीची मुक्ताईनगर येथील भूषण संजयराव तायडे (वय-३१) याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि मैत्रीनंतर प्रेमात रूपांतर झाले. याचा गैरफायदा घेत…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका भागातील राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेची राहत्या घरात सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील पिंप्राळा परिसरातील विजय नगरात राहणाऱ्या पल्लवी महेश पाटील (वय-२६) या विवाहितेने राहत्या घरात बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पल्लवी पाटील ह्या पती महेश हेमलाल पाटील यांच्यासह सासू-सासरे व पाच वर्षाची मुलगी यांच्यासह वास्तव्याला आहे. पती महेश पाटील हे शहरातील दाणाबाजार मार्केट मधील जळगाव पीपल्स बँकेत क्लार्क म्हणून नोकरीला आहे. तर…
जळगाव, प्रतिनिधी । कृषिपंपाचे वीजबिल आज भरू, उद्या भरू असे म्हणत महावितरणच्या कृषी वीज धोरणात 50 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ 50 दिवस उरले आहेत. येत्या 31 मार्चला 50 टक्के माफीची मुदत संपणार असून, एप्रिलपासून बिलात फक्त 30 टक्के माफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता अभियानात सहभागी होऊन आपल्या कृषिपंपाची थकबाकी तसेच चालू बिले भरून 50 टक्के माफी मिळवावी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरण जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे. जळगाव परिमंडलात कृषिपंप वीजबिल वसुलीस प्रतिसाद मिळत आहे. ज्या गावात वसुली, त्याच गावात काम असा निकष ठेवल्याने अनेक…
बंगळुरू : वृत्तसंस्था । कर्नाटकच्या कॉलेजमधील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत मुस्कान नावाची एक तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात करतो. यानंतर तरुणीदेखील त्यांना उत्तर देत ‘अल्लाहू अकबर’ ची घोषणा देते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण कर्नाटकच्या मांडयामधील आहे. या व्हायरल व्हिडीओवर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या मुलीच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी तरुणीला सलाम केला आहे. “मी या तरुणीच्या आई-वडिलांना सलाम करतो. या मुलीने एक उदाहरण ठेवले आहे”.…