Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील कारागृहात असलेल्या महिला कैदीचा आज पंख्याला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात अनिता चावरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता राजा चावरे वय ५० या महिलेेने जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये पंख्याला गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न केले तसेच तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात अनिता चावरे या न्यायालयीन कोठडीत आहेत. कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता चावरे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । टायगर ग्रुप जळगाव जिल्हा व टायगर जामनेर कडून चाळीसगाव येथे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. शहरातील तितुर व डोंगरी नदीला पूर आल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघडल्यावर आले आहेत या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून टायगर ग्रुप कडून नेहमी एक हात मदतीच्या मदतीच्या माध्यमातून धावून येणाऱ्या टायगर ग्रुप संघटना खानदेश विभाग यांच्याकडून मदत माध्यमातून दानशूर व्यक्तींना आव्हान करण्यात आले होते. त्यातून तात्काळ ही मदत पुरामुळे बाडीत कुटुंबातील व्यक्तींना येथील घरोघरी साहित्य वाटप करण्यात आले 400 किट व किराणा साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव ,व टायगर ग्रुप राष्ट्रीय…

Read More

धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील साळवे गावातील संत इंदिरानगरमधील रहिवाशी विकास,वसंत व मेघःश्‍याम बऱ्हाटे यांच्या खासगी मालमत्तेत इतर गटारींचे सांडपाणी सोडण्यात आल्यामुळे किंवा गटारी लिकेजमुळे गेल्या जुन महिन्यापासून त्रास होत आहे.याबाबत उपसरपंचांनी पाहणी करुन सरपंचांना माहिती दिली असली तरी अद्यापपावेतो चार महिने उलटले तरी कोणतीही दखल ग्रामपंचायतने घेतलेली नाही. यासंदर्भात बऱ्हाटे बंधूंनी 9 सप्टेंबर रोजी साळवे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकाऱ्यांसह सरपंच व उपसरपंच यांना लेखी स्वरुपात तक्रार अर्ज देऊन, योग्य ते काम करुन सांडपाण्याचा त्रास होणार नाही अशी व्यवस्था करावी,अशी मागणी केली आहे.

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार असलेल्या आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी जाऊन त्याला रंगेहाथ अटक केली आहे. नेम चाळीसगाव शहर पोलीस स्थानक सरकारतर्फे शैलेंद्र आत्माराम पाटील फिर्याद देतो की मी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गेल्या 02 वर्षापासुन नेमणुकीस आहे. आज दि.13 सप्टेंबी रोजी चाळीसगाव शहरात पोलीस निरीक्षक के.के पाटील यांच्या आदेशाप्रमाणे दिवसा गस्ती करण्याबाबत तोंडी आदेश दिल्याने सपोनि कापडनीस ,सफौ.2727 अनिल अहिरे, पो.काँ.2367 अमोल भोसले असे खाजगी वाहनाने रवाना झालो. त्यावेळी गोपनिय माहीती मिळाली की, चाळीसगांव शहरातुन हद्दपार करण्यात आलेला इसम अक्षय भानुदास पाटील हा चाळीसगांव शहरात बस स्टड चे पाठीमागे फिरत आहे त्यानुसार…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घृण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे. जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणेकरून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी असे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. मुंबईची एक सुरक्षित शहर अशी प्रतिमा आहे आणि या एका घटनेमुळे ती डागाळणार नाही याची काळजी घेण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. साकीनाका येथील घटनेबाबत…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोळी पेठेतील आंबेडकर नगर येथे सलग दुसऱ्या दिवशीही खून झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. शहरात एकच खळबळ उडाली आहे जळगाव शहरातील निमखेडी रोड परिसरात एकाचा खून झाल्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज शहरात पुन्हा एक नवीन खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील निमखेडी रोड परिसरात एका व्यक्तीला कौटुंबिक वादातून त्याच्याच दोन्ही मुलांनी संपवण्याची भयंकर घटना घडली होती. याप्रकरणी कालच दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. खुद्द जन्मदात्या बापाचा खून करण्याच्या या कृत्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान यानंतर आज शहरात पुन्हा एक खून झाला…

Read More

अमळनेर, प्रतिनिधी । शहरातील ढेकुरोडवरील एका ३४ वर्षीय विवाहितेने घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहरातील ढेकूरोडवरील एका तरुण विवाहित महिलेने घरात आेढणी व दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना १२ रोजी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास आनंद कॉलनीत घडली. सोनिया घन:श्याम काटे (वय ३४) असे त्या महिलेचे नाव आहे. सोनिया यांचे पती घन:श्याम मुरलीधर काटे हे मंगळग्रह मंदिरात रात्र पाळीला ड्युटीला गेले असता सोनियाने घरात गळफास घेतला. ती मानसिक रुग्ण होती. धुळे येथील डॉ. गौतम शहा यांच्याकडे उपचार सुरू होते, अशी माहिती पती घन:श्याम…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने अबलेची रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. त्यावरून, विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात कायद्याचा धाक उरला नसल्याचंही भाजपाने म्हटले आहे. त्यामुळे, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात असे कायद्याचेच राज्य आहे. विरोधकांनी साकीनाका बलात्कारप्रकरणी कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही. विरोधी पक्षनेते सांगतात, त्याप्रमाणे त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईल. कोणत्या विषयाचे…

Read More

नवी दिल्ली, प्रतिनिधी । सरकारी तेल कंपन्यांनी आजसाठी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) साठी नवे दर जारी केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज (सोमवार) म्हणजेच, 13 सप्टेंबर रोजी पेट्रोल-डीझेल दोन्ही इंधनांच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डीझेलच्या किमती स्थिर आहेत. देशभरात आजही पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक उंचीवर आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलच्या किमती 88.62 रुपये प्रति लिटरवर स्थित आहेत. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.19 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. घरगुती बाजारात इंधनाच्या किमतींमध्ये आज कोणताही बदल झालेला नसला…

Read More

यवतमाळ, प्रतिनिधी । पोलिस म्हणजे चोवीस तास जनतेच्या सेवेत तत्परतेने हजर असलेला कर्मचारी. ऊन-वारा-पाऊस काहीही असो, तो कर्तव्यावर हजर दिसणारच. िशवाय पोलिसांची सेवा हीच मुळात चोवीस तास सेवा मानली जाते. हे कर्तव्य बजावताना त्यांना आलेला थकवा आणि इतर अडचणी कर्तव्यापुढे गौण ठरतात. अशा या जनतेच्या सेवकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. किमान साप्ताहिक सुटीचा पुरेपूर आनंद या पोलिसांना आता उपभोगता येईल. कारण, साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी या पोलिसांना आता रात्रपाळीची ड्यूटी दिली जाणार नाही. रजा असो वा सुटी, अत्यावश्यक सेवा म्हणून कोणत्याही क्षणी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश आले की पोलिसांना हजर राहावेच लागते. शिवाय साप्ताहिक सुटीचा दिवस कसाबसा तणावाविना जाईल म्हटले…

Read More