मुंबई, वृत्तसंस्था । जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना व घरगुती नळ जोडणीची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.राज्यातील जलजीवन मिशन अंमलबजावणीचा आढावा मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणीची कामे मार्च २०२२ अखेरपर्यंत तसेच नवीन योजनांची कार्यवाही ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कालबध्द कार्यक्रम आखावा व यावर्षीचे निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे.सर्व मुख्य अभियंत्यांनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही यंत्रणांच्या नियमित बैठका घेवून कामांची प्रगती राखावी असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले. जलजीवन मिशन अंतर्गत घरगुती…
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचन नगरात राहणाऱ्या तरुणाने गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्याला आज दुपारच्या सुमारास अटक करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून फिरणाऱ्या तरूणाला पोलीसांनी पाठलाग करून वाल्मिक नगरातून दुपारी अटक केली आहे. त्याच्याकडील गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंखे (वय-२६) रा. कांचन नगर हा तरूण वाल्मिक नगरातील बगीचाच्या परिसरात गावठी बनवटीचे पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय गोपनिय माहिती मिळाली. शनीपेठ पोलीस…
चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील राहणारा १७ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्तळी जाऊन पंचनामा तयार करण्यात आला. तालुक्यातील बोढरे येथील १७ वर्षीय तरूणाचा विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी समोर आली असून पंचनामा करण्यात आला. अनिल शिवाजी राठोड (वय-१७, रा. बोढरे) या तरूणाचा शिवारातील एकाच्या विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला. अनिल राठोड याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान,…
जळगाव, प्रतिनिधी । शहरात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हास्तरीय बैठक पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या अध्यक्षस्थानी आयोजित करण्यात आली होती. बैठकीत येत्या २२ ऑक्टोंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा जळगाव जिल्हा दौरा असून त्या अनुषंगाने तसेच पक्षात सभासद मोहीम गाव तिथे शाखा, जिल्हा बॅक निवडणूकीत आरपीआयला अनुसूचित जाति जनजातिमधून जागा द्यावी विषयी चर्चा करण्यात आली. आरपीआय आठवले गट हा भाजपाचा मित्र पक्ष असल्याने भाजपकडे जिल्हा बँक निवडणुकीत अनुसूचित जाति जनजातीसाठी राखीव असणारी जागा द्यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांनी…
जळगाव, प्रतिनिधी । उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील चारचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच-19/डीव्ही-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 23 सप्टेंबर, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी 15 सप्टेंबर, 2021 पासून अर्ज सादर करावेत. अर्ज दुपारी चार वाजेपर्यंत स्वीकारले जातील. या अर्जासोबत शासकीय शुल्काचा धनादेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा. विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करुन आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. ही मालिका चालू असतांना वाहन-4 प्रणाली कार्यान्वीत झाल्यानंतर बंद…
जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शुक्रवार, दि. 17 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 10.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून पंचायत समिती कार्यालय, धरणगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता. पंचायत समिती, धरणगाव येथे आगमन व पंचायत समिती कार्यालय धरणगाव येथे शासकीय योजनांची आढावा बैठक. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.45 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व…
जळगाव, प्रतिनिधी । देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा जळगाव जिल्हा व महानगरतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत भव्य कोरोना लसीकरण शिबिर सरदार वल्लभभाई पटेल हॉल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटसमोर नागरिकांसाठी भव्य कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात येणार आहे, असे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी सांगितले. लसीकरणाचा लाभ सर्व सामान्य लोकांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेज भाजपा महानगरातील मंडल अध्यक्ष, नगसेवक, आघाडीचे अध्यक्ष, व कार्यकर्ते यांनी आपआपल्या, मंडलातील, प्रभागातील नागरिकांना भव्य लसीकरणाचा लाभ मिळुन द्यावा असेही सुचित केले आहे.…
जळगाव, प्रतिनिधी । भाजपा महिला मोर्चा जळगाव महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात उद्धव ठाकरे महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी देवो.. श्रीगणेशाची आरती करून साकडे करण्यात आले. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तर्फे येथे नंदनवन कॉलनी मित्र मंडळ येथे श्री गणपती ची आरती महिला आघाडीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, मा महापौर सीमाताई भोळे, जिल्हाध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, सरचिटणीस रेखाताई वर्मा, यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्हा पदाधिकारी वंदना पाटील, रेखाताई पाटील, ज्योती ताई निंभोरे, पूजाताई चौधरी, नगरसेविका प्रतिभाताई कापसे, दीपमाळा ताई काळे, महिला आघाडी चे छाया सारस्वत, तृप्ती पाटील, व इतर महिला पदाधिकारी सहभाग नोंदविला. https://www.youtube.com/watch?v=2qLjVsGgsNA
मुंबई, वृत्तसंस्था । गेल्या सात महिन्यातपासून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळून देण्यासाठी कृषि मंत्री यांच्या दालनात अनेक बैठका घेऊन ही विमा कंपनी विम्याचे पैसे देत नसल्याने भाजपचे माजी मंत्री संजय कुठे यांनी मंत्रालयात आंदोलन केले. यावेळी संजय कुटेनी सांगितले की, माझ्या मतदार सांगतील शेतकरी आर्थिक संकटात आहे. यासाठी राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे अनेक वेळा बैठक झाल्या 65 कोटी रुपये हे फक्त माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांचे विमा कंपनी कडे घेणे आहेत. मात्र वारंवार बैठक घेऊन ही विमा कंपनी हे पैसे देत नाही. कंपनी सांगते की अगोदर सरकारने आम्हाला आमचे २०० कोटी द्यावेत त्यानंतर आम्ही तुम्हाला विमाची रक्कम देऊ आणि सरकार म्हणते आहे.…
मुंबई, वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. या निमित्त विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या अभियानाचे प्रमुख राज पुरोहित व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश सचिव संदीप लेले , दिव्या ढोले, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील , उत्तर भारतीय मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय पांडे, महिला मोर्चा सरचिटणीस दीपाली मोकाशी यावेळी उपस्थित होते. या अभियानानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान…