जळगाव, प्रतिनिधी । महापालिका हद्दीतील सावखेडा शिवारातील गिरणापंपींग स्टेशन व निमखेडी शिवार गिरणा नदीपात्रात श्री गणेश विसर्जन करू नये असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.सावखेडा शिवारातील गिरणापंपींग स्टेशन व निमखेडी शिवार गिरणा नदीपात्र येथे धोकादायक परिस्थीती निर्माण झलेली आहे. याकरीता मागील ४ -५ वर्षा पासून या ठिकाणी श्री गणपती विसर्जनास प्रशासनाकडुन बंदी घालण्यात आलेली आहे. आज देखील या दोन्ही भागात तशीच धोकादायक परिस्थिती असल्याने यावर्षी सुध्दा या ठिकाणी श्रीगणेश विसर्जनास बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तरी या दोन्ही ठिकाणी कोठलेही सार्वजनिक गणेश मंडळाचे, घरगुती श्री.गणपती विसर्जन करु नये असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । एकाने काहीही कारण नसतांना तरुणाला मारहाण केल्याची घटना १६ रोजी सकाळच्या सुमारास घडली, याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात बिस्मिल्ला चौकात शेख सादिक शेख सलीम (वय-३४) हे वास्तव्यास आहेत. मिस्तरी काम करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवतात. गुरुवारी सकाळी ते त्यांच्या घरासमोर उभे असताना टिपू ऊर्फ भैय्या शेख सलीम रा. बिस्मिल्ला चौक याने काहीही कारण नसताना शेख सादिक यांना काठीने हातावर तसेच पाठीवर मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी शेख सादिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण हे करीत आहेत.
जळगाव, प्रतिनिधी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज सकाळपासून जळगाव शहरात लेवा भवन येथे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महिला आघाडी प्रमुख दिप्ती चिरमाडे, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ धर्मेंद्र पाटील यांच्यासह आदी उपस्थीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे. जळगाव भारतीय जनता पाटील आणि जळगाव महापालिकेच्या वतीने शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात नागरीकांच्या सोईसाठी आज…
रावेर प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील पाल येथे घडली. याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० वर्षीय तरूणीमध्यप्रदेशातील एका गावात राहणारी आहे. तालुक्यातील पाल येथील गुलाम रसुल नवाज तडवी (वय-२५) याची ओळख नाशिक येथे मजूरीसाठी आले असता त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर एकमेकांशी मोबाईलवर संपर्क झाला. तीन महिन्यापुर्वी गुलाम तडवी याने पिडीत मुलीला ०२ जून २०२१ रोजी भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार मुलगी रावेर येथे भेटण्यासाठी आली. गुलाम तडवी याने मुलीला दुचाकीवर बसवून पाल येथील त्याच्या घरी घेवून गेला. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. ही गोष्ट घरच्यांना सांगितली…
जळगाव, प्रतिनिधी । श्रींची विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये. विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग व महापालिका, पोलिस प्रशासन यांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
जळगाव, प्रतिनिधी । एका तरुणाने १४ वर्षीय मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. यामध्ये ती मुलगी गर्भवती झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुभाष पवार (वय २८) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना मे-जून २०२१ दरम्यान जळगाव तालुक्यात घडली आहे. दीपक याच्या नात्यात असलेल्या १४ वर्षीय मुलीच्या घरी कोणी नसताना त्याने घरात प्रवेश केला. यानंतर मुलीच्या तोंडाला रुमाल लावून तिचे हातपाय साडीने बांधले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केले. ही बाब कोणास सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने कोणाला काहीच सांगितले नाही.…
जळगाव, प्रतिनिधी । आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना बुधवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लाॅरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात जिल्ह्यातील जळगाव खुर्द येथील उपकेंद्रातील परिचारिका प्रेमलता संजय पाटील यांचाही समावेश आहे. १२ मे रोजी फ्लाॅरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोना महामारीची साथ मागील वर्षापासून सुरू असल्यामुळे यावर्षी १२ मे रोजी हा कार्यक्रम होऊ शकला नाही. बुधवारी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वर्ष २०२०चे राष्ट्रीय फ्लाॅरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळा झाला. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.…
रतलाम, वृत्तसंस्था । केंद्र सरकार लवकरच एक कायदा तयार करणार आहे, त्यानुसार बाइक आणि स्कूटरसहित इतर दुचाकी वाहने फक्त इथेनॉलवर चालतील. त्यामुळे महाग इंधनाच्या समस्येपासून सुटका होईल. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले की,‘मी लवकरच कायदा बनवणार आहे. त्यानंतर स्कूटर, बाइक, ऑटोरिक्षा आदी पेट्रोलवर चालणार नाहीत. ही वाहने ११० रुपयांच्या पेट्रोलच्या ऐवजी ६५ रुपये लिटरच्या १०० टक्के इथेनॉलवर चालतील. त्यामुळे पैसेही वाचतील आणि प्रदूषणही कमी होईल.’ गडकरींनी राजस्थानच्या दौसात ही घोषणा केली. ते दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या दोन दिवसांच्या निरीक्षण दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी हरियाणाच्या सोहना, दौसा आणि मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्या वेळी ते म्हणाले,‘एक्स्प्रेस-वेच्या बांधकामात…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । गुगलच्या माध्यमातून या आठवडय़ापासून हिंदुस्थानातील 13 हजारांहून अधिक ठिकाणी नागरिकांना कोरोना लसीच्या उपलब्धतेविषयी आणि लसीकरणाच्या अपॉइंटमेंट्सविषयी माहिती उपलब्ध होणार आहे. ही माहिती कोविन अॅप्सच्या रीअल-टाइम डेटाच्या मदतीने मिळणार असून यात प्रत्येक लसीकरण केंद्रामधील अपॉइंटमेंट्सची उपलब्धता, दिल्या जाणाऱ्या लसी आणि कोणत्या डोससाठी लसीकरण सुरू आहे, लसीकरणाचे शुल्क आणि अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी कोविन वेबसाइटची लिंक गोष्टींचा समावेश असेल. गुगल सर्चच्या डायरेक्टर हेमा बुडाराजू म्हणाल्या, ‘साथीच्या काळात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांना अधिकाधिक माहितीची गरज भासू लागली आहे. त्यांना अचूक माहिती मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’
डेहराडून, वृत्तसंस्था । कोरोना साथीमुळे चारधाम यात्रेवर घातलेली बंदी उत्तराखंड उच्च न्यायालयाने गुरुवारी उठविली आहे. त्याबरोबरच प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची अटही न्यायालयाने घातली आहे. यंदा चारधाम यात्रेमध्ये दरदिवशी केदारनाथ येथे ८००, बद्रीनाथ येथे १२००, गंगोत्री येथे ६०० व यमुनोत्री येथे ४०० भाविकांनाच जाता येणार आहे. न्यायालयाने बंदी उठविल्यामुळे आता लवकरच चारधाम यात्रा सुरू केली जाईल, असे उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी उत्तराखंड सरकारने पुरेशी पूर्वतयारी केली नसल्याचे मत व्यक्त करीत उत्तराखंड उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. चामोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी जिल्ह्यातील रहिवाशांसाठी १ जुलैपासून चारधाम यात्रा सुरू करण्याच्या उत्तराखंड सरकारच्या निर्णयाला…