रावेर, प्रतिनिधी । शहरात नगर पालिकेच्या हद्दीत मर्कज मशिदीजवळ सुरू असलेले काँक्रिटीकरण व गटार बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे हाेत असून ही कामे त्वरित थांबवण्यात येऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मेहमूद शेख यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने निधी वाया जाण्याची शक्यता आहे. मर्कज मशिदीजवळ काँक्रिटीकरण करताना बांधकामाच्या नियमांना डावलून ठेकेदार जमिनीवर खडी पसरवून त्यावर केवळ काँक्रीट टाकत आहे. याबाबत ठेकेदाराला जाब विचारला असता तुम्हाला जे करायचे ते करा, हे काम असेच होईल, असे उत्तर दिले जात आहे. तर मदिना कॉलनीतील गटारीचे बांधकाम व काँक्रिटीकरणाचे कामही याच पद्धतीने पूर्ण केले आहे. ईदगाह…
Author: saimat team
भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचा एक नवीन रुग्ण आढळला. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या चारवरुन पाचवर पोहोचली आहे. दरम्यान, विभागातील यावल, रावेर, मुक्ताईनगर व बोदवड या चार तालुक्यात मात्र एकही नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला. शहरात बाजारपेठेसह गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन हाेत नसल्याने पुन्हा काेराेना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली अाहे. त्याची अाता दखल न घेतल्यास रुग्णसंख्या बेसुमार वाढण्याचा धाेका अाहे. नगर पालिका, पाेलिस दलातर्फे नागरिकांना काेराेना प्रतिबंधासाठी शासनाने केलेल्या नियमांचा विसर पडला असून त्यांना जाणीव करून देणे गरजेचे अाहे.
जळगाव, प्रतिनिधी । खान्देश बारी समाज आयोजित ११ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विवाह इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. राज्यस्तरीय बारी समाजाचा उपवर वधू-वर परिचय मेळावा शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सुचनेनुसार व आदेशानुसार होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने बारी समाज उपवर वधू-वर सूची-२०२१ मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी आपले फॉर्म मयुरेश टाईम्स् , आनंदा बारी (तेली चौक विठ्ठल पेठ जुने जळगाव), विजय बारी (बालाजी फोटो), अतुल डेअरी प्रिंप्राळा, भुषण बारी ह.वि नगर व समस्त बारी पंच मंडळ अथवा युवक मंडळांकडे दि.३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंतच जमा करावे असे आवाहन…
जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील सात वैद्यकीय अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून याचे आदेश आरोग्य खात्यातर्फे पारीत करण्यात आल्या आहे. आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रातील गट-अ या संवर्गातील २८० वैद्यकीय अधिकार्यांच्या बदलीचे आदेश काल पारित झाले. यात जळगाव जिल्ह्यातील सात अधिकार्यांचा समावेश आहे. सहा बदल्या या जिल्ह्यात तर एकच बदली ही जिल्ह्याबाहेर झाली आहे. यात येवती (ता. बोदवड) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजय सपकाळ यांची धामणगाव येथे, साकळी (ता. यावल) येथील डॉ. सागर पाटील यांची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात, उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील डॉ. विशाल पाटील यांची जळगाव जिल्हा क्षयरोग केंद्र येथे, मुक्ताईनगर येथील डॉ. नीलेश पाटील यांची मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात, रावेर येथील डॉ. एन.…
जळगाव प्रतिनिधी | अखील भारतीय विद्यार्थी परिषदेची महानगर तसेच तीन नगर कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव छात्रनेता संमेलन कार्यक्रमामध्ये जळगाव महानगर व तिन्ही नगर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या निवडीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविप जळगाव विभाग प्रमुख प्रा.डॉ. मनीष जोशी यांनी काम पाहिले. नूतन कार्यकारिणीत जळगाव महानगराध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. अमरदीप पाटील, उपाध्यक्ष प्रा. गौरव खोडपे, महानगर मंत्री रितेश महाजन, महानगर सहमंत्री प्रज्वल पाटील, पौर्णिमा देशमुख, कवियत्री बहिणाबाई नगर अध्यक्ष प्रा. डॉ. मुझाईद हुसेन, उपाध्यक्ष प्रा. पवित्रा पाटील, नगर मंत्री आकाश पाटील, नगर सहमंत्री श्रद्धा सोनार, नितेश अग्रवाल, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर अध्यक्ष डॉ. प्रा.…
धुळे, प्रतिनिधी । येथील महापालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम राखले असून महापौरपदी ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप कर्पे यांची निवड झाली. जळगावची पुनरावृत्ती धुळ्यात करण्याचा विरोधकांचा दावा फोल ठरला. शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पडली. महापालिकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता ऑनलाइन सभा झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा अध्यक्षस्थानी होते. सभेत सर्व ७३ नगरसेवक सहभागी झाले. महापौर पदाची निवड बिनविरोध होऊ नये यासाठी विरोधी पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली होती. या शिवाय एमआयएमनेही उमेदवारी अर्ज भरला होता. यात भाजपच्या प्रदीप कर्पे यांना सर्वच्या सर्व ५० नगरसेवकांनी मतदान केले. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या तथा काँग्रेसच्या नगरसेविका मदिना पिंजारी यांना केवळ १७…
जळगाव, प्रतिनिधी । कर्मचारी संघटनांच्या आक्रमक दबावानंतर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांचा पदभार काढून घेतल्यानंतर दीड महिन्यातच त्यांच्याकडे हा पदभार पुन्हा सोपविण्यात आला आहे. शुक्रवारी प्रभारी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी हा पदभार त्यांच्याकडे पुन्हा सुपूर्द केला. तत्कालीन प्रभारी कुलसचिव प्रा. ए. बी. चौधरी यांनी राजीनामा दिल्याने हा बदल करण्यात आला आहे. डॉ. भादलीकर यांनी सायंकाळी पदभार स्वीकारला. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती शिक्षण संचालकांकडे पाठवल्याच्या मुद्यावरून कर्मचारी संघटनांनी डॉ. भादलीकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलने सुरू केली होती. तीन ते चार दिवस कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन…
मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा दहशतवादी जान मोहम्मद अली शेख याच्या अटकेवरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं एकूण ६ जणांना उत्तर भारतात विविध ठिकाणांहून अटक केली असून त्यात जान मोहम्मदचा देखील समावेश आहे. जान मोहम्मद धारावीत राहत असूनही राज्यातील तपास यंत्रणांना त्याची माहिती नव्हती का? असा सवाल करत विरोधकांनी टीका केली असताना आज पहाटे महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकासोबत केलेल्या या कारवाईत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात एटीएसला यश आलं आहे. या संशयित दहशतवाद्याचं नाव झाकिर असल्याचं सांगितलं जात आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र…
पुणे, वृत्तसंस्था । ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. टी. पद्मनाभन (६४) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. प्रा. पद्मनाभन हे पुण्यातील आयुका या संस्थेत मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर), केंब्रिज येथील खगोलशास्त्र संस्था व पुण्यातील आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) या संस्थांमधून त्यांनी चार दशकांहून अधिक काळ संशोधन केले. गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र, खगोल भौतिकशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. या विषयांमधील मूलभूत योगदानासाठी जगभर ते ओळखले जात. भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र विषयांतील त्यांचे सुमारे ३०० रिसर्च पेपर नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले होते. पद्मनाभन यांनी लिहिलेल्या क्रमिक आणि तांत्रिक पुस्तकांचा समावेश जगभरातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये झाला…
पुणे : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासोबत त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आकुर्डी येथील डी.वाय.पाटील ज्ञानशांती शाळेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री तथा डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष सतेज पाटील, अध्यक्ष संजय पाटील, आमदार ऋतूराज पाटील, डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.प्रभात रंजन, डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त तेजस पाटील, संकुल संचालक डॉ.नीरज व्यवहारे, ज्ञानशांती शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पिल्ले आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, समाजातील सर्व घटकांना प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉ. डी. वाय. पाटील यांनी शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. त्यांचा हाच…