जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बंदचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देश बुडव्या धोरणाच्या विरोधात आज 27 सोमवार रोजी भारत बंद करण्याचे बुलंद हाक दिली आहे. राज्यात हा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिट पक्ष इत्यादी राजकीय पक्ष व सर्व पुरोगामी संघटनांनी बंदचे आवाहन केलेले आहे. जनविरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे ३ कृषी कायदे व ४ श्रम संहिता रद्द करा, विज दुरुस्ती विधेयक मागे घ्या; संपूर्ण उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव शेतकऱ्याना मिळावा यासाठी केंद्रीय कायदा करा; खाजगीकरणाचे धोरण बंद करा; डिझेल;पेट्रोल; गॅस इत्यादीचे भाव वाढ कमी करा;नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा;लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि देशाच्या संविधानाचे…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय मराठा महासंघांची जिल्हा कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, चिटणीस प्रमोद जाधव, राष्ट्रीय युवक प्रतिनिधी अतिष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्षपदी प्रा.मनोज पाटील, संपर्क प्रमुखपदी सुदर्शन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष चंदन पाटील, उपाध्यक्ष अतुल सोनवणे, उपाध्यक्ष राहुल पाटील, सरचिटणीस दिपक पाटील, जिल्हा संघटक गोपाल पाटील, युवक अध्यक्ष शुभम पवार, जिल्हा युवक कार्याध्यक्ष मंगेश पाटील, युवक उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, युवक सरचिटणीस पंजाब देशमुख, महानगर अध्यक्ष जयेश पाटील, महानगर उपाध्यक्ष विजय बांदल, महानगर युवक अध्यक्ष प्रदीप पाटील, महानगर युवक उपाध्यक्ष पंकज पाटील व तसेच जिल्हा भरातील…
चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील कन्नड घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली आहे. दरम्यान या घाटामधून कोणीही प्रवास करू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. चाळीसगाव परिसरासह इतर अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे डोंगर भागातील तितुर व डोंगरी नदीला मोठा पूर आला आहे. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कन्नड घाटामध्ये दरड कोसळून रस्ता खचला होता. त्यामुळे काही दिवसांसाठी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जिल्हाप्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून व पाहणी करून दुचाकी, हलक्या व छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला केला होता. अवजड वाहनांना अजूनही हा घाट प्रवासासाठी खुला करण्यात आलेला नव्हता. घाट खुला करून १० दिवस…
यावल, प्रतिनिधी । सावदा येथील कोथरूड खुर्द गावात विजेच्या खांबावरील तार तुटून अंगावर पडल्याने पाच बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घटनास्थळी सावदा पोलिस दाखल झाले. येथून जवळच असलेल्या कोचुर खुर्द गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील विजेचा खांबावरील तार तुटून पाच बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी बकऱ्यांना चारण्यासाठी नेत असतांना हा अपघात घडला असून संबधितांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कोचुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात विजेचा खांबावरील तार तुटून अचानक चरण्यासाठी जात असलेल्या ५ बकऱ्यांवर पडली. यात गौतम तायडे यांच्या मालकीच्या तीस हजार किमतीच्या तीन, युवराज तायडे यांच्या मालकीची सात हजार किमतीची १तर संतोष तायडे यांच्या मालकीची…
भुसावळ प्रतिनिधी | शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांची जळगाव येथील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रशासनाने झाडाझडतीस प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. पंचशीलनगरातील धम्मप्रिय सुरळकर या तरुणाचा २० सप्टेबर रोजी नशिराबाद उड्डाण पुलाच्या खाली खून झाल्याने खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड घडले असून यात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. समीरचा भाऊ मोहंमद कैफ याच्या खून खटल्यातील संशयित म्हणून धम्मप्रिय ११ महिन्यांपासून…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । भारतीय आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सातत्याने चढ-उतार होत असते. मागच्या आठवड्यात सोन्याचे भाव वधारले होते. मात्र या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घट होताना दिसत आहे. त्यामुळे या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये सोन्या-चांदीचा दर सर्वात कमी आहे. आज (शनिवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दर 45,240 रुपये आहे. तर चांदीची किॆमत (Silver Price) 60,600 रुपये प्रति किलो पोहचली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सलग घसरण झाली आहे. त्यामुळे या महिन्यात ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. त्यामुळे आतंरराष्ट्रीय सराफा बाजारातही सोन्याच्या…
मुंबई, वृत्तसंस्था । राज्यातील महाविकासआघाडी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार २२ ऑक्टोबर पासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. करोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली गेली आहे. राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर…
जळगाव, प्रतिनिधी । निराधारांच्या निस्वार्थ सेवेकरी यशस्विनी सामाजिक अभियान जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजनाताई पाटील यांना त्यांच्या निःश्वार्थ जनसेवा तथा विविध लोकाभिमुख उपक्रमशील योगदानाची दख़ल घेत आघाडीचे आंतरराष्ट्रिय दर्जा प्राप्त दैनिक दिव्यमराठी समुहाने जळगाव येथे नारीशक्ती पुरस्काराने समारंभपूर्वक जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक मा.प्रविणजी मुंडे, जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत, निवासी संपादक दिपकजी पटवे, यूनिट हेड संजीवजी पाटील, पत्रकार प्रतिनिधी सुनीलजी कासार यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितित गौरविण्यात आले. त्यानिमित्त सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.स्वप्निलजी पाटील, प्र.प्राचार्य मा.सरपंच बी.वाय.पाटील, डॉ.भरत एस.पाटील, प्रा.संजय तांबटकर, प्रा.भाऊसाहेब बोरसे, ई.एम.पाटील, वाय.ए.पाटील, नगरसेविका योजनाताई पाटील यांचे पुरस्कार प्रदान प्रतिनिधी विद्याताई पाटील, प्राचार्य डी.डी.पाटील सह मान्यवरांनी योजनाताई पाटील यांचे विशेष…
जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात तीन जणांना यश मिळाले आहे. परीक्षांची अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झालेली आहे. या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचे अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यात जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी यशस्वी झाले आहे. यात चोपडा येथील गौरव साळुंखे हा देशभरातून १८२व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. भुसावळ येथील श्रीराज मधुकर वाणी यांना ४३० वी रँक तर जळगाव येथील अक्षय साबद्रा यांना ४८०वी रँक मिळाली आहे. चोपडा येथील रहिवासी गौरव साळुंखे हा असून रवींद्र साळुंखे आणि सुरेखा साळुंखे यांचा चिरंजीव आहे रवींद्र साळुंखे व सुरेखा साळुंखे हे दोन्ही शिक्षक असून गौरवचे दहावीपर्यंतचे शिक्षण प्रताप विद्या मंदिर…
जळगाव प्रतिनिधी | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कैलास पाटील यांचे आज ना. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आपल्या समर्थकांसह प्रवेश घेतला आहे. माजी आमदार कैलासबापू पाटील यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीत तेव्हाचे विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांचा दणदणीत पराभव केला होता. एक जायंट किलर म्हणून त्यांचा राज्यभरात लौकीक झाला होता. यानंतर २००९ साली हा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे ते पुन्हा निवडणूक लढवू शकले नाहीत. यानंतर २०१४ च्या निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना निवडून आणण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. नंतर मात्र प्रा. सोनवणे आणि कैलासबापू यांच्यात दुरावा निर्माण झाला. पक्षविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. कैलास पाटील हे हातावर घड्याळ बांधणार…