Author: saimat team

चाळीसगाव, प्रतिनिधी । विजेचे बिल कमी करण्यासाठी महिलेकडे 5 हजार रुपयांची मागणी वायरमन ने केली असून अशी आपबीती महिलेने पत्रकाराकडे केली असून अशा वायरमन वर कारवाई ची मागणी केली आहे. शहरातील हिरापुर रोडवर गणेश मंगल कार्यालयाजवळ पिठाची गिरणी असून या गिरणी चालक महिलेला 10400 रुपयांचे वीज बिल आले एवढे बिल कसे आले याची विचारणा त्यांनी वायरमन भालचंद्र वाघ व अधिकारी यांच्याकडे केली असता तुम्ही वीजचोरी केली म्हणून आपणास 8500 रुपये दंड आला असल्याचे सांगण्यात आले बिल न भरल्यास मीटर कट केला जाईल आणि यातून मार्ग काढायचा असेल तर मला 5000 रुपये द्या असे वायरमन ने त्या महिलेला सांगितले असता मी…

Read More

यावल, प्रतिनिधी । गेल्या तीन महिन्यापूर्वी यावल नगरपालिकेतर्फे2कोटी84लाख 38हजार516रुपये किमतीचा अतिरिक्त साठवण तलाव बांधण्यात आला आहे तो अतिरिक्त साठवण तलाव कार्यान्वित करू नये अशी लेखी स्वरूपात नोटीस वकिलामार्फत शेतमालक शेतकऱ्याऱ्याने नगरपरिषदेला दिली. शेतकऱ्याच्या शेतात अनधिकृत अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या यावल नगरपरिषदेचा प्रताप आणि बौद्धिक दिवाळे नागरिकांच्या व प्रशासनाच्या समोर आले आहे. अतिरिक्त तलाव निर्मितीसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि.9/8/2020 रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती.त्यानुसार यावल नगरपरिषद तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सोलापूर येथील ठेकेदार अनिल शामराव पाटील यास दि.21जानेवारी2021रोजी 2 कोटी84लाख38हजार516 रुपयाचा कार्यादेश दिला आहे.(कार्यादेश सोलापूर येथील अनिल शामराव पाटील ठेकेदाराच्या नावाने असला तरी प्रत्यक्षात काम मात्र जळगाव येथील एका राजकीय…

Read More

चोपडा, प्रतिनिधी । चोपडा शहर व तालुका काँग्रेस तर्फे 27 सप्टेंबर 2021 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडाच्या दक्षिण गेट जवळील रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करून केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत चोपडा शहर आणि तालुका काँग्रेसतर्फे भारत बंदला या आंदोलनाद्वारे पाठिंबा देण्यात आला. या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने काँग्रेस पक्षातर्फे, जनतेचे आभार मानण्यात आले. केंद्र सरकारने केलेल्या तीन काळे कृषी कायदे त्वरित रद्द करावे, कामगार विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोदी सरकार विरुद्ध घोषणा देत शेतकर्‍यांच्या आंदोलनाला…

Read More

धरणगाव, प्रतिनिधी । शहरातील रमाई घरकुल योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा असे आश्वासन देवून सुध्दा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने मनसेने आज एक दिवशीय आंदोलन तहसील कार्यालयाजवळ केले. रस्ते साधन सुविधा व अस्थापणा यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव येथे रमाई घरकुल योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा असे आश्वासन देवून सुध्दा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात आले. म्हणुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक दिवसीय आंदोलन करून संबंधित कामचुकार अधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज 27 सोमवारी सकाळी 11:30 वाजता धरणगाव तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन व जाहीर निषेध करण्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Read More

जळगांव, प्रतिनिधी । कोविडचे सावट पूर्ण गेले नसतांनाही पाणी पुरवठा व स्वच्छता खात्यातील निधीला कोणतीही कात्री लागली नाही. या अनुषंगाने जिल्ह्यात यंदा तब्बल ४०० कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील रिंगणगाव, सावदा आणि पिंपळकोठा येथे विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण केल्यानंतर बोलत होते. एरंडोल हा आपला जुना मतदारसंघ असून इतर तालुक्यांप्रमाणेच यावर आपले विशेष प्रेम असल्याचेही पालकमंत्र्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चिमणआबा पाटील होते तर विशेष उपस्थिती जि. प. अध्यक्षा रंजनाताई पाटील यांची होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव, सावदा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । दाम्पत्याची छेड काढल्याने रोडरोमियोंना नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी नागरिकांनी त्या तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. जळगाव शहरात मुळात फिरायला काही मनोरंजनाची ठिकाणे नाही. मेहरूण तलाव, कोल्हे हिल्स परिसर, भाऊंचे उद्यान, गांधी उद्यान सोडले तर इतर काहीही नाही. आरएमएस कॉलनी परिसरात राहणारे एक दाम्पत्य पत्नीचा वाढदिवस असल्याने सहज फेरफटका मारायला सायंकाळी ४ च्या सुमारास गेले होते. कोल्हे हिल्स परिसरात दाम्पत्य बसलेले असताना दोन टवाळखोर तरुणांनी त्यांच्याकडे पाहून शिट्ट्या वाजवल्या आणि शेरोशायरी केली. वाद नको म्हणून दाम्पत्य तिथून निघाले आणि खाली आले. टवाळखोर अधिकच शिरजोर होत त्यांनी दाम्पत्याच्या दिशेने दगड मारून फेकला. दाम्पत्याने जाब…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । खान्देशात कवयित्री बहिणाबाई चौधरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या अनेक कर्तृत्त्ववान महिला घडल्या. जिल्हा मार्केटींग सोसायटीच्या चेअरमन शैलजादेवी दिलीपराव निकम यांचेही राजकारण, समाजकारण, सहकार, कृषी आदी क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य आहे. अशा नारीशक्तीचा सन्मान करणे, हे आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले. राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे शैलजादेवी निकम यांना नारीरत्न पुरस्कार २०२०-२१ चे वितरण महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दुपारी व.वा.वाचनालयाच्या अग्रवाल सभागृहात झाला. याप्रसंगी अरुणभाई गुजराथी बोलत होते. व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, सत्कारमूर्ती शैलजादेवी निकम, संस्थेच्या अध्यक्षा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरामध्ये प्रभाग क्रं १५ मधील महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते एलईडी लाईट्स उभारण्यात आले. शहरातील मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये माननीय नामदार गुलाबरावजी पाटील त्यांनी डीपीडीसी मधील नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना 2020 21 अंतर्गत नऊ मीटर 21 नगर साडेबारा मीटर तिचे दोन नग चे हायमास्ट व मिनी हायमास्ट उभे करणे या कामासाठी सोडा लक्ष रुपये दिले होते. सदर कार्यक्रमास महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक, सलमान खाटीक, अनिल सोनवणे, ठेकेदार सत्यम इलेक्ट्रिकलचे मयूर चौधरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । अनेक दात्यांनी आपल्या घरच्या जुन्या सायकली भरारी फाऊंडेशनला हाकेला प्रतिसाद देत उपलब्ध करून दिल्या. भरारी संस्थेने त्या सायकली दुरुस्त करून घेतल्या. जिल्हाभरातील गरीब, गरजू व होतकरू अशा पंधरा विद्यार्थ्यांना शोधून त्यांना सायकली उपलब्ध करून दिल्या. अनेक विद्यार्थ्यांना बस, रिक्षाचा खर्च परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये हा यामागचा हेतू आहे. दोन गरजू, मजूर व्यक्तीही या उपक्रमाच्या लाभार्थी ठरल्या. त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. भरारी फाऊंडेशनला या उपक्रमात लक्ष्मीनारायण मनियार यानी दोन नवीन साइकल उपलब्ध करुन दिल्या.दिलीप चोपड़ा,गजानन मालपुरे,बाळासाहेब सूर्यवंशी,कृष्णा श्रीवास्तव, संजय सालुंखे,अर्चना जाधव,अभय मुथा, बाली वर्मा,नीलेश ललवानी,संगीता धनगर,ज्योति राजपूत यानी प्रत्येकी एक साइकल उपलब्ध…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरापासून दोन रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे, तसेच सहा रुग्ण आता उपचार घेत असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जळगाव शहर आणि चोपडा तालुक्यातील प्रत्येक एक असे एकुण दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ७३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १५६ रूग्ण बरे होवून घरी परतले. आता सध्या सहा संक्रमित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Read More