Author: saimat team

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यातील महाविकासआघाडी सरकारकडून महिला पोलिसांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करण्यात आले असून, त्यांना आता १२ ऐवजी ८ तासांची ड्युटी असणार आहे. महाराष्ट्र सरकारने महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तास करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे डीजीपी संजय पांडे यांनी दिली आहे. Maharashtra govt has decided to reduce the working hours of women police personnel from 12 hours to 8 hours: Maharashtra DGP Sanjay Pandey (File pic) pic.twitter.com/boa7jUJVtY — ANI (@ANI) September 24, 2021 कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । दिल्ली कोर्टात मोस्ट वॉण्टेड गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या; पोलिसांकडून हल्लेखोरांचा एन्काऊंटर रोहिणी कोर्ट नंबर २ मध्ये जितेंद्रला हजर केलं असता वकिलांच्या वेषात आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली दिल्लीतला मोस्ट वाण्टेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याची रोहिणी कोर्टात गोळी झाडून हत्या करण्यात आली. रोहिणी कोर्ट नंबर २ मध्ये जितेंद्रला हजर केलं असता वकिलांच्या वेषात आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली. जितेंद्रचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी शूटआऊट करत हल्ला करणाऱ्या दोघांना ठार केलं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून हा एन्काऊंटर करण्यात आला. हल्ला करणारे विरोधी गटातील होते असं सांगितलं जात आहे. शूटआऊटमध्ये एकूण चौघे ठार…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषद अंतर्गत नवीन वस्तीत केलेल्या पाईपलाईनचे काम करण्यात आलेले आहे या कामाच्या मंजुरी आदेशानुसार आपल्या स्तरावरून केलेल्या सदर कामाचे इस्टिमेट,एम.बी.रेकॉर्ड व ठेकेदाराला अदा केलेले बिल याचे प्रमाणित प्रती तसेच सदरच्या कामाबाबतचे संपूर्ण कागदपत्राची संचिका अवलोकनार्थ यावल तहसील कार्यालयात तात्काळ सादर करावे असे लेखी पत्र यावल तहसीलदार यांनी दि.14/9/ 2021रोजी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले आहे. परंतु संबंधित माहिती अधिकारी बडे यांनी यावल तहसीलदार यांचे पत्रास कचराकुंडी दाखवित तहसीलदारांना माहिती देणे संदर्भात कर्तव्यात कसूर करून शिस्तभंग करीत असल्याने आणि इतर कारणांनी सुद्धा यावल नगरपरिषद राज्य जन माहिती अधिकारी बडे यांच्याविरुद्ध लवकरच लेखी तक्रार दाखल करण्यात येणार आहे.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । रितेश अशोक भाटिया यांचे आज दीर्घ आजाराने दुपारी 2.15 वा.दुःखद निधन झाले. मा अशापुरा सेवा केंद्राचे संचालक तसेच सरचिटणीस जळगाव जिल्हा पत्रकार संघ व गुजराथी समजाचे कार्यकर्ते, जीवनसाथी परिचय संमेलनाचे आधारस्तंभ, भाटिया सामजाचे कार्यकर्ते व आण्णासाहेब जमनदास भाटिया v सौ.ज्योती भाटिया यांचे लाडके पुतणे होते. सर्व समाजात त्यांच्या ओळखी व परिचय होता तसेच लाकडी गणपती मंदिर मोरया परिवारातील आधारस्तंभ होते.त्यांचा पश्यात पत्नी दोन मुली आई वडील दोन मोठे काका एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे .त्याची अंत यात्रा राहते घरून बळीराम पेठ येथून नेरी नाका वैकुंठ धाम येथे संध्याकली ६.०० वाजता निघेल .

Read More

जळगाव, प्रतिनिधी । सेवा समर्पण अभिमान अंतर्गत मा पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या १७ सप्टेंबर वाढदिवसा पासून तर २ ऑक्टोबर पर्यंत सेवा समर्पण अभियान भाजपतर्फे राबविण्यात येत असुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर, गरीबजन कल्याणकारी, अंतर्गत अन्न वाटप, युवा मोर्चा तर्फे रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, केंद्र सरकारचे जन कल्याण कारी योजना ची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविने आदी अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम दिनांक २५ सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी १० वाजता भा ज पा कार्यालय वसंत स्मृति येथे भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारपन जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) आ सुरेश भोळे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईचे अंतर्धान स्थळ असुन वारकरी संप्रदायात आदिशक्ती मुक्ताईला मानाचे स्थान आहे.श्री क्षेत्र कोथळी येथे वर्षभर भाविक भक्तांचा राबता असतो. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने सदर तीर्थ स्थळाला “ब” दर्जा मिळाला असून एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने मुक्ताई अंतर्धान स्थळी असलेल्या मुक्ताई मंदिर जिर्णोद्धाराचे काम शासनाच्या ग्रामविकास विभाग कडुन तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत सुरू आहे. यात मुक्ताई मंदिराला प्राचीन हेमाडपंथी लुक देण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असुन आतापर्यंत ९ कोटी ९७ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. मिळालेल्या निधीतून आतापर्यंत मंदिरातील गाभारा, सभामंडप, दुमजली दर्शनबारी, पहिला मजला मंदिराचे…

Read More

नाशिक, वृत्तसंस्था । आज सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने इंपिरिकल डाटा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीसाठी आता चार आठवड्याची वेळ दिली आहे.ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले आहे.केंद्राने इंपिरिकल डाटा दिल्यास सर्वच प्रश्न मार्गी लागू शकतात, मात्र केंद्राची नकारात्मक भूमिका ओबीसींना अडचणीत आणणारी असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. आज नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की २०११ ला आम्ही ओबीसींच्या जनगणनेची मागणी केली होती. त्यानुसार जनगणना झाली आणि त्याचा डाटा हा २०१६ ला तयार करण्यात आला. त्यावर सुधारणा करण्यासाठी अरविंद पनगाडीया…

Read More

नाशिक, प्रतिनिधी । कोरोनाच्या परिस्थितीवर पूर्णपणे मात करून सशक्त नाशिक जिल्हा करणे हे आपले पहिले उद्दिष्ट असणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची भूमिका अतिशय महत्वाची असेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. घोटी ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, सरपंच अलका जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडखे, संदीप गुळवे, बाळासाहेब गाढवे, आरोग्य उपसंचालक पी.डी. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी आतापासूनच वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे. मदान यांनी सांगितले की, राज्यभरातील महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात मोठ्याप्रमाणावर निवडणुका होणार आहेत. संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी प्रथमत: जात…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । युवासेना कोअर कमिटी सदस्य व मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ.शीतल ताई देवरुखकर- शेठ दोन दिवसाच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून शुक्रवार व शनिवारी जळगावात असणार आहे. युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्र स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन युवासेना व शिवसेनेतर्फे रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड जळगाव येथे करण्यात आले असून स्पर्धेचे उदघाटन व बक्षिक वितरण समारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे मुलं व मुलींचे १० संघ सहभागी होणार असून स्पर्धेला जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सहकार्य लाभणार आहे. या वेळी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, महिला जिल्हाप्रमुख…

Read More