Author: saimat team

जामनेर, प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील लखिंपुर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटना विरोधात आज महाराष्ट्रातील महा विकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्यानुसार आज शहरासह जामनेर तालुक्यात पहुर शेंदुर्णी पाळधी नेरी वाकडी फत्तेपुर वाकोद आदी गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपले दुकाने व प्रतिष्ठाने सर्व दुकानदार यांनी बंद ठेवले होते सर पूर्ण जामनेर तालुक्यात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला सर पूर्ण पाठिंबा व प्रतिसाद मिळाला. शहरातील नगरपालिका चौकात महा विकास आघाडीतर्फे काहीवेळा रस्ता रोको आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला याप्रसंगी महा विकास आघाडीतर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी नियोजन मंडळ सदस्य संजय गरुड युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील…

Read More

धानोरा ता. चोपडा, वार्ताहर ।  सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी येथे काल दि १० रविवार रोजी सुटीचा दिवस असल्याने मनुदेवी च्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर चिंचोली मनुदेवी रस्ता खासगी  वाहनांनी  भरून गेला होता. भाविक मिळेल त्या वाहनांनी तर काही खासगी रिक्षा मोटरसायकल तसेच बसेस मधुन जाताना दिसुन येत होते. आज नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस असल्याने भाविकांची आता शेवटचे चार दिवस मोठी गर्दी दर्शनासाठी होणार असल्याने मनुदेवी संस्था व यावल पोलीस स्टेशनला नवरात्रोत्सव शांततेत व कोरोना नियमावलीत मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. काल रविवार असल्याने भाविकांची गर्दी चा कल पाहाता मनुदेवी संस्थानने भाविकांच्या खासगी वाहनांना मानापुरी पासुन मनुदेवी मंदिर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज दि. 9 ऑक्टोबर रोजी नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, समाज कल्याण अधिकारी दिव्यांग विभाग जिल्हा परिषद भरत चौधरी, सेवाधर्म संस्था अध्यक्ष चंद्रशेखर नेवे, सेवारत परिवार डॉक्टर रितेश पाटील, भरारी फाउंडेशन अध्यक्ष दीपक परदेशी व नारीशक्ती ग्रुप अध्यक्ष मनीषा पाटील, नारीशक्ती ग्रुपच्या महिला सखी यांच्या शुभहस्ते शिलाई मशीन वाटप करण्यात आली. सर्व मान्यवरांचे नारीशक्ती ग्रुपतर्फे गुलाबाचे रोप देऊन पर्यावरण वाचवा हा संदेश देत स्वागत करण्यात आले. गरजूंसाठी झटणाऱ्या उपेक्षितांना मदत करणाऱ्या पीडितांचे अश्रू पुसणाऱ्या अनाथ निर्वासितांना…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. शेतकरी हे उत्पादकाबरोबरच ते विक्रेते असल्याने ते आमचे व्यवसाय बंधूच आहेत. त्यामुळे सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बंदमध्ये आम्ही सहभागी न होता काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध नोंदवणार आहोत, अशी भूमिका पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे घेण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. कोरोना काळात व्यापार बंद राहिल्याने खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे व्यवसाय बंद ठेवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. परंतु, शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना ठार मारण्याच्या प्रकाराचा संघटनेच्या वतीने आम्ही निषेध करतो आहोत. शेतकरी…

Read More

ठाणे, वृत्तसंस्था । पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकून महिलेवरील बलात्कार प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आठ पैकी दोन दरोडेखोरांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. हा दरोडा सुनियोजित नसला तरी आरोपी हे सराईत गुन्हेगार मानसिकतेचे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नेमकं प्रकरण काय? 8 ऑक्टोबरच्या रात्री साडेसात वाजता लखनऊ सीएसटी पुष्पक एक्सप्रेसमध्ये डी टू या बोगीत दरोडा टाकण्यात आला. आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल रोकड लूटली होती. मारहाणीत सहा प्रवासी जखमी झाले होते. नऊ प्रवाशांचे मोबाईल आणि सहा प्रवाशांची रोकड आणि एका महिलेवर दोन आरोपींनी लैगिंक अत्याचार केला होता. पोलिसांनी तपास…

Read More

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील एक प्रमुख समस्या असणाऱ्या स्टेशन रोडवरील बँक ऑफ बडोदा समोरील गेल्या काही दशकांपासून साफ न झालेली गटार तसेच मोठ्या प्रमाणात पाणी तुंबणाऱ्या व खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती नुकतीच आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने करून घेतली. या समस्येचा येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांसह आजूबाजूच्या व्यापारी बांधवांच्या व्यवसायावर देखील मोठा परिणाम होत होता. आज स्टेशन रोडवरील सर्व व्यापारी बांधवानी आमदार मंगेश चव्हाण यांची त्यांच्या जनसेवा कार्यालयात भेट घेतली व समस्या मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी कापड आणि रेडिमेड असोसिएश व पुष्पराज गारमेंट्सचे संचालक प्रीतेश भाऊ कटारिया, करवा प्रोव्हिजन चे राहुल भाऊ करवा, जैन प्रोव्हिजनचे हरीशभाऊ जैन, सौराष्ट्र…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ ही मोहीम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेतंर्गत जिल्हा प्रशासनातर्फे वार्डासह गल्ली, प्रभागात सर्वसामान्य नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५ लाख २८ हजार १३४ पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात १९ लाख ३ हजार १८७ नागरिकांना पहिला तर ६ लाख २४ हजार ८६४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणास पात्र लोकसंख्येनुसार जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर येथील स्थानिक इयत्ता बारावी शाखेमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने पब्जी खेळाच्या नादात स्वतः आत्महत्या केली. तशी सुसाईड नोट या मुलीने लिहून ठेवली आहे . याबाबत मिळालेली माहिती अशी की कुमारी नम्रता पद्माकर खोडके [मूळ राहणार भराडी] हल्ली मुक्काम जामनेर या 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने आज पब्जी खेळाच्या नादात एका स्टेपवर आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. नम्रता चे वडील हे स्थानिक डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम पाहतात .तरुण मुलगी गेल्यामुळे आई-वडिलांवर आभाळ कोसळले . वडील हे डॉक्टर के. एम .जैन यांच्याकडे सहाय्यक म्हणून कार्य करतात…

Read More

पिंपरी-चिंचवड, वृत्तसंस्था । विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याचे नमूद करून महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या खोट्या सहीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद ठोंबरे या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. खराळवाडी (पिंपरी) येथे २५ सप्टेंबरला हा प्रकार उघडकीस आला. अजीज नवाब शेख यांनी या प्रकरणी शुक्रवारी फिर्याद दिली. ठोंबरे हा फिर्यादी अजीज शेख यांच्याकडे चालक म्हणून कामास होता. त्याने फिर्यादी अजीज शेख यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याचे पत्र संगणकावर तयार करुन त्यावर राज्यपालांची खोटी सही केली

Read More

लखनऊ, वृत्तसंस्था । लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा याची एसआयटीच्या पथकाकडून सुमारे १२ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सहकार्य केले नाही, तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली नाहीत असे अटकेनंतर पोलिसांनी सांगितले आहे. या हिंसाचारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशिष शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकासमोर हजर झाला होता. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने त्याची चौकशी केली.

Read More