साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कांचन नगरातील भैय्याची वखारजवळील आगीतील नुकसानग्रस्तांना आदिवासी कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेेने सामाजिक बांधीलकी जोपासत मदतीचा हात पुढे केला आहे. नुकसानग्रस्त सुभाष भाऊलाल बाविस्कर आणि महिला परिवाराला आदिवासी कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे ११ हजाराची रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भारत सपकाळे, समाज सेवक भिकन नन्नवरे, भरत महाराज सपकाळे, रोहन सोनवणे, अनिल कोळी, रवी पाटील, गोकुळ सूर्यवंशी, जितू सोनवणे, अक्षय सोनवणे, रवी कोळी, नारायण सपकाळे, मनोज सपकाळे, आनंद सपकाळे, रामचंद्र तायडे, संजय बाविस्कर, रमाकांत सोनवणे, भगवान जैतकर, समाधान नन्नवरे, शिवाजी सूर्यवंशी, आप्पा नन्नवरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.