Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»Chop : अनेर नदीत धाडसी उडी ओम पाटीलने वाचवले चौघांचे प्राण
    चोपडा

    Chop : अनेर नदीत धाडसी उडी ओम पाटीलने वाचवले चौघांचे प्राण

    saimatBy saimatMarch 24, 2026Updated:March 24, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘देवदूत’ ठरलेल्या ओमच्या शिक्षणाची जबाबदारी जैन इरिगेशनकडे

    साईमत / चोपडा / प्रतिनिधी

    अनेर नदीत बुडणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय १४) या धाडसी मुलाच्या कार्याला समाजातून मोठी दाद मिळत आहे. ओमच्या या अतुलनीय धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने त्याच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे.

    चोपडा तालुक्यातील गणपूर येथील चार मुलं अनेर नदीत आंघोळीसाठी उतरली होती. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. याचवेळी तेथून जात असलेल्या ओम पाटीलने क्षणाचाही विलंब न करता नदीतील डोहात उडी घेत चारही मुलांना सुरक्षित बाहेर काढले. स्वतःला पोहता येत नसतानाही दाखवलेल्या या अद्वितीय धाडसामुळे ओम त्या मुलांसाठी अक्षरशः ‘देवदूत’ ठरला.

    ओम हा गावातील विकास विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याचे शिक्षण सुरू आहे. त्याचे वडील रवींद्र पाटील व आई सारलाबाई हे शेतमजूर असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कष्टावर चालतो. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबात मोठा मुलगाही शिक्षण घेत आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येत असतानाच ओमच्या या धाडसाने त्याच्या आयुष्याला नवे वळण दिले आहे.

    माध्यमांमधून ओमच्या पराक्रमाची माहिती मिळताच जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी तत्काळ त्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. जैन इरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून ओमच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला जाणार असून त्याचा लवकरच सन्मानही करण्यात येणार आहे.

    यावेळी अशोक जैन म्हणाले की, “संपत्तीपेक्षा मनाच्या मोठेपणाची आज अधिक गरज आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

    ओम पाटीलच्या धाडसामुळे चार कुटुंबांवर आलेले संकट टळले असून त्याच्या या पराक्रमामुळे समाजात मानवतेचा जिवंत संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chop : घरगुती त्रासाचा फटका भावाने भावाचा दगडाने ठेचून खून केला

    March 22, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.