Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»115 crore for compensation : अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी ११५ कोटींची अपेक्षित मागणी
    कृषी

    115 crore for compensation : अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी ११५ कोटींची अपेक्षित मागणी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुख्यमंत्र्यांना नुकसानीची माहिती आकडेवारीसह सादर करुन जिल्हाधिकाऱ्यांची मागणी

    साईमत/जळगाव/ विशेष प्रतिनिधी : 

    जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या एकूण नुकसानीची माहिती आकडेवारीसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यासह नुकसान भरपाईसाठी ११५ कोटींची मागणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे.

    मुख्यमंत्री फडणवीस धुळे येथे कार्यक्रमासाठी जाण्यासाठी मुंबईने विमानाने जळगाव विमानतळावर शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी आले होते.त्यावेळी श्री. प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालात ६५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे नमूद करून ५१८ गावे बाधित असल्याचे म्हटले आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या एक लाख ५२१ असल्याचे अहवालात नमूद केले आहे. मनुष्यहानीत पाच व्यक्तींचा मृत्यू झाला असून पाचोरा तीन मृत्यू, भुसावळ आणि मुक्ताईनगर प्रत्येकी एक मृत्यू. अतिवृष्टी व पुरामुळे एक हजार ९२२ पशुधनाचा मृत्यू, घरांच्या पडझडीत एक हजार ६८ घरे नष्ट झाली तर ६८७ घरात पाणी शिरले. त्यात पाचोरा ५९२, एरंडोल ८० आणि मुक्ताईनगर १५.

    दरम्यान, काही बाधित शेतकरी, दुकानदार आणि मुख्यमंत्र्यांना विमानतळावर भेटले. मुख्यमंत्र्यांनीही बाधितांचे म्हणणे ऐकून घेतले. सुमारे २० मिनिटे एवढा वेळ देत मुख्यमंत्र्यांनी बाधित शेतकरी तसेच अधिकारी वर्गाशीही संवाद साधल्याचे दिसून आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026

    Jalgaon : जळगावमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

    February 1, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.