मनपा आयुक्तांकडे मनसेची निवेदनाद्वारे मागणी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
स्व.पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या कार्याचा प्रेरणादायी ठसा जनमानसावर उमटावा, या उद्देशाने जळगाव शहरातील एका प्रमुख चौकाला त्यांचे नाव द्यावे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना नुकतेच दिले. निवेदन देतांना मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले, उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, ललित शर्मा, सतीश सैंदाणे, राजेंद्र निकम, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, प्रकाश जोशी, ॲड. सागर शिंपी, किशोर खलसे, ऐश्वर्या श्रीरामे उपस्थित होते.
निसर्गप्रेमी, साहित्यिक चितमपल्ली हे नामवंत पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक, लेखक व पर्यावरण कार्यकर्ते होते. २००९ मध्ये जळगाव शहरातील ‘वसुंधरा महोत्सवा’ला ते उपस्थित होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील एका प्रमुख चौकाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी मनसेने निवेदनातून केली आहे. जळगाव शहरात पर्यावरणाची जाणीव वाढवणे. नव्या पिढीला प्रेरणा देणारे नाव देणे ‘चितमपल्ली’ यांच्या कार्याचा गौरव करणे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पर्यावरणप्रेमी आणि संवेदनशील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ही मागणी करत आहे. मनपाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त केली आहे.