Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»आमदार चित्रा वाघांशी रोहिणी खडसे यांचीही जुंपली
    कृषी

    आमदार चित्रा वाघांशी रोहिणी खडसे यांचीही जुंपली

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 22, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आमदार चित्रा वाघांशी
    रोहिणी खडसे यांचीही जुंपली

    मुक्ताईनगर ( प्रतिनिधी)-

    आमदार चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत केलेल्या भाषणावरून रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला यातून या दोन्ही महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.

    भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत आक्रमक पवित्रा घेतला. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी त्यांना संजय राठोड यांच्या मुद्द्यावरून डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आमदार वाघ यांनी विधानपरिषदेत त्यांना प्रत्युत्तर दिले. यावरून सोशल मीडियात चर्चा सुरू असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावर तिखट भाष्य केले आहे.

    रोहिणी खडसे म्हणाल्या की, चित्रा वाघ यांचे वक्तव्य बघितल्यानंतर मला बिग बॉसची सिरीयलची आठवण झाली. यामध्ये एकमेकांची उणीदुणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा टीआरपी वाढतो बिग बॉस खुश होतो. म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्यातरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का ? असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या की विधानपरिषदेचे सभागृह हे राज्याचं श्रेष्ठ सभागृह असून याची गरिमा आहे. तिथे सुसंस्कृत भाषा अपेक्षित आहे. त्या सभागृहामध्ये असे वक्तव्य केले जात असेल, एकमेकांची उणीदुणी काढण्याची ही पद्धत असेल तर सभागृहाच्या गरिमेला ठेस लागण्याचं काम होत असल्याची टीका त्यांनी केली.

    रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, जिथे विरोधी पक्षातील नेते शेतीमालाला भावासंदर्भात बोलायला जातात, महिलांच्या अत्याचारासंदर्भामध्ये बोलायला जातात आणि कापसाला भाव मिळावा म्हणून बोलायला जातात तेव्हा सभापती त्यांना हवा तेवढा वेळ त्यांना देऊ शकत नाहीत आणि दिला जात नाही मग अशा उणेदुणे काढणाऱ्या लोकांना वेळ तरी कसा दिला जातो ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    MahaVitaran Employees : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक स्नेहसंमेलनामुळे ‍मिळाली नवी ऊर्जा

    December 19, 2025

    Chalisgaon : औट्रम घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    December 19, 2025

    Jamner : चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन कडुन गरजूंना ब्लॅकेट वाटप.

    December 19, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.