साईमत, चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील गुळ मध्यम प्रकल्पातून आ.लता सोनवणे यांच्या हस्ते आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुळ नदी परिसरातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुनर्भरणासाठी फायदा व्हावा म्हणून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उजव्या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करुन त्यातही लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबत संबंधितांना सूचना केली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, मंगला पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, उपअभियंता सुनील अमृतकर, बांधकाम विभागाचे विरेंद्र राजपूत, शाखा अभियंता राहुल भालकर, बाजार समितीचे संचालक गोपाल पाटील, शिवराज पाटील, विजय पाटील, किरण देवराज, राजेंद्र पाटील, प्रताप पाटील, ए. के. गंभीर, गोपाल चौधरी, कुणाल पाटील, गुलाब ठाकरे, वसंत पाटील, भागवत कोळी, नंदु पाटील, उदयभान इंगळे, संजय सोनवणे, गजेंद्र पाटील, सतीलाल धनगर, अमोल शेटे, उमाकांत कोळी, मंगल इंगळे , शिवाजी लक्ष्मण पाटील, पद्माकर पाटील, विकास माळी, श्रीकांत पाटील, विद्याधर पाटील, बबलू पाटील, सोमनाथ पाटील, गजानन बाविस्कर, शुभम कोळी, रामलाल बारेला, विलास बेलदार, सुनील सपकाळे, ईश्वर कोळी, गुलाब पावरा आदी उपस्थित होते.