युवकांनी जिजाऊ, स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे

0
4

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद हे केवळ हिंदुस्थानचे नव्हे तर समस्त जगाचे मार्गदर्शक आहेत. युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करावेत. आजच्या युवकांना आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी या महापुरुषांचे विचार निश्‍चित उपयोगी आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी केले. वाचनासंबंधीच्या जन-जागृतीसाठी कुऱ्हे पानाचे येथील स्वामी विवेकानंद वाचनालयातर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. जयंतीनिमित्त वाचन संस्कृतीच्या जागर करणाऱ्या ग्रंथ दिंडीला गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे व ग्रंथ-पुस्तकांचे पूजन जिल्हा परिषदेचे व नियोजन समितीचे माजी सदस्य विश्‍वनाथ पाटील यांच्या हस्ते पूजन करून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली. गावाच्या मुख्य राजमार्गावरून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. स्वामी विवेकानंद वाचनालय हे १४ वर्षांपासून गावात वाचन संस्कृती टिकविण्याचे कार्य करीत आहे. यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष प्रदीप धांडे, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव शिवाजी बरकले, खजिनदार युवराज पाटील, सदस्य बाळु महाजन, ज्ञानेश्‍वर पाटील, किशोर सोनवणे आदी परिश्रम घेत आहे. प्रास्ताविक खजिनदार युवराज पाटील, सूत्रसंचालन सचिव शिवाजी बरकले तर आभार अध्यक्ष प्रदीप धांडे यांनी मानले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार, ग्रा.पं.सदस्य प्रमोद उंबरकर, पिंटू नागपुरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कालिदास कळसकर, जी. के. पाटील, सुनील जैन, प्रा. अरविंद बावस्कर, भगवान जगताप, प्रमोद छाजेड, अशोक बडगुजर, संतोष रंदाळे, रामदास कोतवाल, गावातील श्री विठ्ठल भजनी मंडळ, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here