सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिमा भेट

0
3

जळगाव ः प्रतिनिधी

संस्कृती मंत्रालय वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभर उत्सव ठरायला हवा याच अनुषंगाने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे शहरासह नागरिकांचा सहभागाचे संयोजक जिल्हाधिकारी अभिजित राऊत ‘हर घर तिरंगा’ अभियानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते सागर कुटुंबळे, रोहित कुटुंबळे, ललित कोतवाल यांच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ फ्रेम देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी वेदांत नाईक, तन्मय राणे, निरंजन राणे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या वतीने आवाहन करण्यात आले की , आपल्या शहरामध्ये आपण ज्या घरामध्ये वास्तव्य करत आहात अशा आपल्या घरावर दिनांक 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा उभारून भारताच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेमध्ये आपण स्वयंस्फूर्ती ने सहभागी व्हावे व इतरांनी देखील या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यासाठी यासाठी आपण ज्या – ज्या ग्रूप मध्ये सहभागी आहात आशा सर्व ग्रूप मध्ये वरील व शेअर करून ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाबाबत जनजागृती करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here