Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड ; शाळकरी मुलांना रस्त्याचा त्रास !
    मुंबई

    मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड ; शाळकरी मुलांना रस्त्याचा त्रास !

    SaimatBy SaimatJuly 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळचे साताऱ्याचे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या गावात दोन हेलिपॅड बनवले. (Helipad in CM’s village)परंतु शाळकरी मुलांना कोयना धरणातून जीवघेणा प्रवास करत अनेक अडचणींवर मात देऊन शाळेत जावे लागते. त्यासाठी रस्त्याचे काम करायला पाहिजे, असे उच्च न्यायालयाने (High Court)गुरुवारी (१४ जुलै) म्हटले. सातारा जिल्ह्यातील खिरवंडी गावातील मुलींचा शिक्षणासाठी सुरु असलेला जीवघेणा प्रवास थांबवावा , शाळकरी मुलांना शिक्षण पूर्ण करता यावे. मुलांना कोणत्याही अडचणींविना शाळा किंवा महाविद्यालयात जाता यावे. यासाठी रस्ते व्यवस्थित बनवायला हवेत हीच आमची अपेक्षा आहे, असे न्यायालयाने म्हटले आणि तुरंत समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश दिले.

    मुख्य सचिवांनी संबंधित विभागाच्या सचिवांशी बैठक घेतली. बैठकीनंतर मुख्य सचिव उपस्थित प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा अहवाल तयार करतील. अहवाल तयार झाल्यानंतर ३० ऑगस्टपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी सुनावणी झाली.

    सातारा जिल्ह्यात शिक्षणासाठी मुली जीवघेणा प्रवास करत आहे , हे वृत्त न्यायालयांनी संकेतस्थळावर बघितले. कोणीही तक्रार करण्यासाठी न्यायालयात न जाता न्यायालयाने स्वतः या बातमीची दखल घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलावीत आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. शाळेत जाण्यासाठी खिरवंडी गावातील मुली शिक्षणासाठी स्वतः होडी चालवून कोयना धरण पार करतात. त्यानंतर, घनदाट जंगल ओलांडून शाळेत पोहचतात. कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद होत्या. परंतु , या गावातील मुली दररोज शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करतात. या समस्येची दखल घेऊन याप्रकरणी याचिका दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Mumbai : महापालिका निवडणूक नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षण; गट एकत्र येण्याची शक्यता

    January 17, 2026

    Mumbai : ४६ पैकी ४६”चा पराक्रम आमदार राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांची शाबासकी,

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.