तेजस्विनी दुर्गोत्सव मंडळातील मुलींनी रांगोळी काढून रतन टाटा यांना वाहिली श्रद्धांजली साईमत/यावल/प्रतिनिधी येथील लहान मारोती देशमुखवाडा जवळील तेजस्विनी दुर्गोत्सव मंडळातर्फे विजयादशमीच्या दिवशी मुलींनी उत्कृष्ट आकर्षक रांगोळी काढून उद्योगपती स्व.रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ही रांगोळी वैष्णवी भोसले, अश्विनी ढाके, तेजस्विनी सोनार, मोहिनी भोसले, दिव्या भोसले, भाग्यश्री सोनार, लावण्या भोसले, नेहा भोसले यांनी साकारली. रांगोळीची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष किशोर माळी यांनी मांडली. कार्यक्रमास किशोर माळी, दत्तू पाटील, घनश्याम पाटील, दिनेश माळी, प्रकाश भोसले, यशवंत भोईटे, पंकज माळी, स्नेहल फिरके, बाळू सोनार, नितीन माळी, गुड्डू माळी, वैभव माळी, निलेश माळी, वाल्मीक भोसले, संजय फिरके यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. देशमुख वाडा,…
Author: saimat
१७ वर्षाची अखंड परंपरा कायम साईमत/यावल/प्रतिनिधी तालुक्यातील महेलखेडी गावात विजयादशमीनिमित्त एसटीबसची उत्कृष्ट लक्षवेधी सजावट करून पूजन करण्यात आले. ग्रामस्थ आणि राज्य परिवहन महामंडळातील यावल आगारातील संबंधित त्यादिवशी ड्युटीवर असलेल्या वाहन चालकांची कौतुकास्पद प्रेरणादायी प्रथा गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे. महेलखेडी गावात यावल एसटी आगारातील बसचे विजयादशमीनिमित्त पूजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे महेलखेडी गावात चालक व वाहक, ग्रामस्थ यांच्यावतीने हा कार्यक्रम राबविला जातो. यंदाही बस पूजनाचा मान चालक सुनील महाजन, छाया महाजन यांचा मुलगा भावेश महाजन यांची पत्नी भाग्यश्री महाजन, मोठा मुलगा काशिनाथ महाजन यांची पत्नी सपना महाजन, वाहक तुषार कपले, सोनल कपले यांचा मुलगा लक्षित पुनित या दाम्पत्याला मिळाला. त्यांच्या हस्ते…
भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख माजी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांचा स्वपक्षियांवर गंभीर आरोप साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण उद्घाटन करण्यात येत आहे. चौकास आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या नावाची संकल्पना देवून आपले नाव त्यावर प्रकाशित करुन आमदारांनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक, शिवप्रेमी संघटना तसेच चाळीसगाव शहरातील शिवभक्त जनतेचा आपण अनादर केला आहे, हे दुर्दैवी आहे. आ.मंगेश चव्हाण यांचे हे वागणे चाळीसगाव भाजपतील लोकशाही संपली असल्याचे विदारक सत्य असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख घृष्णेश्वर पाटील यांनी केला आहे.शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. ते पुढे…
शांतता समितीच्या बैठकीतील चर्चेतून उमटला सूर साईमत/यावल/प्रतिनिधी शहरासह तालुक्यात काही कार्यालयातील अधिकाऱ्यांना काही ठराविक पदाधिकारी आपल्या राजकीय आजी-माजी पदाचा, कार्याचा प्रभाव आणि दबाव टाकून अधिकाऱ्यांना हेतुपुरस्कर त्रास देत आहेत. त्यामुळे अधिकारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे खासदार, आमदार आणि राजकीय पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून आपल्या ‘त्या’ ठराविक पदाधिकाऱ्यांना समज देण्याची वेळ आली असल्याचे संपूर्ण अधिकारी, कर्मचारी, नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे. यावल शहरातील शांतता कमिटीत ९५ टक्के सदस्य चांगल्या वर्तुणुकीचे, चारित्र्यशील संपन्न तथा शहरात जातीय सलोखा अबाधित राहण्याकामी सक्रिय कामकाज करणारे आहेत. परंतु काही चार-पाच सदस्यांचे उद्योगधंदे आणि वागणूक चारित्र्य लक्षात घेता ते स्वतः कायदा…
पिंगळवाडे शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मानित साईमत/अमळनेर/प्रतिनिधी तालुक्यातील पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन जिल्ह्यातील जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशन संस्थेतर्फे दिला जाणारा 2024-25 या वर्षाचा जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक याप्रमाणे १४ शिक्षक व जामनेर तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक तसेच शिक्षण, कृषी, पोलीस, महसूल, आरोग्य आदी विभागातील प्रत्येकी एक अधिकारी-कर्मचारी याप्रमाणे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४६ पुरस्कारार्थींना सन्मान पदक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले. जामनेर येथील एकलव्य विद्यालयाच्या सावरकर सभागृहात…
नागलवाडी माध्यमिक विद्यालयातील मुलींना १८ सायकलींचे मोफत वाटप साईमत/चोपडा/प्रतिनिधी मानव विकास संसाधन अंतर्गत आठवीच्या मुलींना घरून शाळेत ये-जा करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चोपडा एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या सचिव माधुरी मयूर, संचालक भूपेंद्रभाई गुजराथी, ज्येष्ठ सभासद रमेश जैन, नागलवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन पाटील, महिला सदस्या लिलाबाई पाटील, ढिंगलीबाई बारेला, ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच धरमदास आण्णा, महाराणा पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पाटील, वि. का. सोसायटीचे व्हा.चेअरमन दीपक पाटील, नागलवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील, संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हासभाई गुजराथी, डी.टी महाजन, प्रताप विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय नागलवाडी शाळेचे आजी-माजी मुख्याध्यापक,…
क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था, शिंपी समाजाच्या मागणीला यश साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था व समस्त शिंपी समाजाची अनेक वर्षापासूनच्या मागणीला यश मिळाले आहे. मंत्रिमंडळच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने शिंपी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे ठरविले आहे. या मागणीसाठी शिंपी समाजातील सर्व पोटजातीतील संघटनांनी सरकारकडे अनेकदा निवेदन व पत्रव्यवहार केले होते. ६ सप्टेंबर २०२४ रोजी सागर बंगला, मुंबई येथे समस्त शिंपी समाजाच्या मेळाव्यात अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था व इतर संघटनांनी महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांजवळ श्री संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली होती. मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार, विश्वस्त…
उर्वरित इतर तांडे वस्तींनाही निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : आ.मंगेश चव्हाण साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी तालुक्यातील तळागळातील घटकांपर्यंत विकास कामांना पोहोचविण्याचे ध्येय घेऊन सुरू असलेल्या आ.मंगेश चव्हाण यांच्या विकास कामांच्या संकल्पाला यश मिळाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील ३२ तांड्यांना चा कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आ.मंगेश चव्हाण यांच्या कर्तुत्वाने तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे सुरू आहे. तळागळातील घटकांपर्यंत विकास कामे पोहचावी, यासाठी महायुतीचे सरकार तात्काळ निर्णय घेत आहेत. ९ ऑक्टोंबर रोजी संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृध्दी योजनेंतंर्गत चाळीसगाव तालुक्यातील ३२ तांड्यांना चार कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे शहर असो व मोठी गावे असो यात सुरू असलेली विकासकामे…
खंडोबाची आरती तळी भरून जल्लोषात साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी महाराष्ट्रातील तमाम गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून यावर्षी महाराष्ट्रातील ६५ गडकोटांवर गड पूजन करून दसरा साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमाअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगड येथे सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या दुर्गसेवकांनी मल्हारगड येथे दसरा साजरा केला. त्यात गड पूजन शस्त्र पूजन तसेच गडदेवता खंडोबाची आरती व तळी भरून मोठ्या जल्लोषात वाजत-गाजत दसरा महोत्सव साजरा केला. सर्वप्रथम सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी गडावरील हनुमान टेकडी येथे छत्रपती शिवरायांच्या पालखीची पूजा केली. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. वाजत-गाजत पालखी मिरवणूक गडावरील पुरातन पायऱ्या ज्या जमिनीखाली गाडल्या गेलेल्या होत्या, त्या सह्याद्री प्रतिष्ठानने मातीचा ढिगारा बाजूला करून…
पहुर कसबेतील ग्रामसभेत केंद्र सरकारसह पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव पारित साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव पारित करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी सरपंच शंकर जाधव होते. प्रारंभी उद्योजक तथा दानशूर व्यक्तिमत्व टाटा उद्योग समूहाचे आधारवड स्व.रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. ठरावाला सर्वानुमते संमती देण्यात आली. ऐतिहासिक आणि प्राचीन परंपरा लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मायबोलीचा सन्मान वाढला आहे, असे गौरवोद्गार कवी तथा उदयोन्मुख लेखक शंकर भामेरे यांनी काढले. परिसरातील वाढत्या…