केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची माहिती साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार २०२३-२४ मधील फळ पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार ऑक्टोबर ते मार्च कालावधीमध्ये जळगाव जिल्ह्यातील ८४ महसूल मंडळात सलग पाच दिवस तापमान ४५ डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे नुकसान भरपाई मंजूर होणार आहे. तसेच यापूर्वी जानेवारी महिन्यात सलग तीन दिवस कमी तापमानामुळे विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. असे कमी व जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसान भरपाईची ३२७ कोटी ५५ लाख एवढी एकत्रित रक्कम लाभ काही दिवसात जळगाव जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या…
Author: saimat
‘पंटरला’ अभय देणारा एक अधिकारीही अडचणीत येणार साईमत/यावल/प्रतिनिधी तालुक्यातील ‘अधिकाऱ्यांना काही पदाधिकाऱ्यांकडून दिला जातोय हेतू पुरस्कार त्रास शांतता समितीच्या बैठकीतील चर्चेतून उमटला सूर; अधिकाऱ्यांतर्फे चौकशी करून पक्षांतर्गत कारवाईची गरज’ असे वस्तुस्थितीजन्य वृत्त दैनिक ‘साईमत’मध्ये प्रसिद्ध होताच एका अधिकाऱ्याच्या पंटरने, दलालाने आणि व त्याच्या अन्य ॲडमिन साथीदारांनी व्हाॅट्सॲप ग्रुपमधून ज्ञानाची सूचना केली. हे ज्ञान लक्षात घेता तो ॲडमिनही घरात घुसतांना ज्ञानाचा वापर करतो का…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे ‘त्या’ ॲडमिनच्या मुळावर आघात झाल्याने तसेच एका व्यवसायातून माजी नगराध्यक्षांनी हकालपट्टी केल्याने तसेच शांतता समितीच्या बैठकीत सर्वांसमक्ष दोन सदस्यांनी दलालाचा पान उतारा केल्याने ‘त्या’ ॲडमिनचा संताप अनावर झाला आहे.…
‘मशाल’ चिन्हाची रांगोळी काढून दिला संदेश साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवारावर असलेली निष्ठा, श्रद्धा हीच आहे की, ठाकरे परिवार हाच आपला पक्ष…ठाकरे परिवार हीच आपली निशाणी…. हाच संदेश ‘मशाल’ चिन्हाची रांगोळी काढून दिला आहे. आज अन् उद्याही शेवटपर्यंत आम्ही ठाकरे परिवारासोबत आहोत, असे रांगोळीतून दर्शविण्याचे काम चाळीसगाव शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सविताताई किशोर कुमावत यांनी केले आहे. त्यांच्या माध्यमातून हा संदेश सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना दसऱ्यानिमित्त रांगोळीतून ‘मशाल’ चिन्ह सर्व मतदारांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम आणि संदेश चिन्ह काढून दर्शविला आहे. ‘मशाल’ चिन्ह कॉलनीतील सर्व मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम सविताताईंनी केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत…
उपमुख्यमंत्र्यांकडे माजी आ.चैनसुख संचेती यांची पत्राद्वारे मागणी साईमत/मलकापूर/विशेष प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. मात्र, नदीला प्रचंड पूर येऊन नदीकाठच्या गावातील घरांसह शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त लोकांच्या घरांचा व शेतीचा तात्काळ सर्व्हे करून त्यांना शासनाकडून सानुग्रह मदत देण्यात यावी, बाधितांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशा आशयाची मागणी माजी आमदार चैनसुख संचेती यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री जिल्ह्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे मोताळा तालुक्यातील धरण ओव्हरफलो झाले.त्यामुळे नळगंगा धरणाचे दरवाजे २ ते ३…
समाजातर्फे फटाके फोडून एकमेकांना पेढे देऊन आनंद साजरा साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी लाडशाखीय वाणी समाजासाठी राज्य सरकारने ‘लाडशाखीय वाणी समाज सोळा कुलस्वामिनी महामंडळ’ ह्या नावाने राज्य सरकारच्या गुरुवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याबद्दल येथील समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाणी मंगल कार्यालयासमोर फटाके फोडून एकमेकांना पेढे देऊन आनंद साजरा केला. चाळीसगाव येथे गेल्या महिन्यात अल्प कालावधीत आयोजित केलेल्या “लाडशाखीय वाणी समाजाचा महामेळाव्याचे” हे यश आहे. तसेच समाजाची एकजूट काय असते, हे सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींच्या लक्षात आले असे मेळाव्याचे आयोजक पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश पाटे, वाणी समाजाचे सचिव सी. सी. वाणी, पत्रकार भिकन वाणी, युवा कार्यकर्ते अमोल नानकर यांनी सांगितले. याप्रसंगी मेहुणबारे येथील माजी सरपंच…
नाशिक विभागीय स्पर्धेसाठी सुमित चिंचोले, राजकुमार जोशी, क्रॉस कंट्री संघ ठरला पात्र साईमत/जामनेर/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा-युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद-जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा जळगावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील वयोगट १९ वर्षाच्याआतील खेळाडूंनी मैदानी स्पर्धेत विजयी घोडदौड केली आहे. सर्व विजयी खेळाडूंचा राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारार्थी किशोर चौधरी, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे संचालक तथा जिल्हा सचिव राजेश जाधव, कार्याध्यक्ष डॉ.विजय पाटील, जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, प्रा.इक्बाल मिर्झा,…
पहुरच्या शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत यश, पाच खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्ही. एस.नाईक महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत पहुर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा तायक्वांदो पटुंनी सहभाग घेऊन तीन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य तर एक कांस्य पदक प्राप्त केले आहे. शेंदुर्णी येथील आ. र .भा.गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या गौरी विजय कुमावत, लोचना श्रीकृष्ण चौधरी, साहील बेग यांनी सुवर्ण पदकावर मोहोर उमटविली तर दिनेश वासुदेव राऊत याने रौप्य पदक तर हर्षल संतोष उदमले याने कांस्य पदक पटकाविले. जामनेर येथील सुरेशदादा…
पहुर शिवारात कपाशीचे नुकसान, पावसाचा बसतोय फटका साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पहुर शिवारात कपाशीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. ऐन वेचणीवर आलेला कापूस पावसामुळे ओला झाल्याने गुणवत्ता खालावत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. काही प्रमाणात मका पिकाचेही नुकसान झाले आहे. कापून ठेवलेला कडबा खराब झाल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
सा. बां. मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे काय? संतप्त नागरिकांमधून उमटतोय सूर साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी शेंदुर्णी मार्गावरील पहुरजवळ जीवघेणे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थट्टा केली जात आहे. ग्रामीण रुग्णालयापासून श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत दोन किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर झाले आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. दुभाजकाचे कामही अपूर्णावस्थेत आहे. खरंतरचौपदरीकरणात संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ जिथे खड्डे आहे, तिथेच डांबरीकरण करून खड्डे बुजवत थट्टा केली जात आहे. जीवघेण्या खड्ड्यांमधील डांबरीकरण करण्यासाठी अत्यंत विलंब लागत असल्याने पहुर पोलीस ठाणे, आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय परिसरात खड्डे…
हिंदू सनातन संस्कृतीत कन्या पूजनाचे विशेष महत्त्व : महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज साईमत/फैजपूर/प्रतिनिधी भारतीय आर्य हिंदू सनातन संस्कृतीत कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे.कन्या पूजनाचे महत्त्व नवरात्रीनिमित्त सीमित नसून वर्षभर शुभ कार्य करतेवेळी कुवारिका कन्या पूजनाने ते करावे, तिचा सन्मान करावा, प्रणाम करावा, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. वढोदा येथील निष्कलंक धाम तुलसी हेल्थ केअर सेंटरमध्ये परिसरातील सर्व जाती-धर्माच्या कुवारीका कन्यांचे पूजन करून त्यांना पोटभर स्वादिष्ट भोजन देण्यात आले. भोजनानंतर प्रत्येक कन्येला स्कूल बॅग शालेय साहित्य, चुनरी व श्रृंगार अशा विविध वस्तू व प्रत्येकी दक्षिणा म्हणून रोख रक्कम देण्यात आली. प्रत्येक कन्येच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.…