जळगाव, प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून ठरवून विरोध होत आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी लज्जास्पद असा गनीमी कावा करीत रांगोळी टाकून विरोध केला व घोषणाबाजी केली. निषेध व्यक्त करण्याची ही कोणती पद्धत? लोकशाहीला काळीमा फासणारी तसेच राज्यातील शांततेचे भंग करणारे सदर कृत्य दिसून येते. रात्री बेरात्री अयोग्य वेळी कुणाच्या निजी निवासस्थानी जाऊन असे करणे समाजातील शांतता भंग करण्यासाठीचा ठरवून केल्याचा प्रकार दिसून येतो. एका राष्ट्रीय पक्षाच्या युवा मोर्चाला या…
Author: saimat team
सोयगाव, प्रतिनिधी । सतरा जागांसाठी झालेल्या दोन टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची मोजणी बुधवारी सकाळी दहा वाजता सुरु हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी तब्बल तीन टेबल साठी ३५ कर्मचारी तैनात करण्यात आली असून मतमोजणीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली आहे.५२ उमेदवारांचा बुधवारी फैसला होणार असून तीन टेबल साठी मतमोजणीची सहा फेऱ्यांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली असून दुपारी बारा वाजेपुर्वी निकाल बाहेर येणे अपेक्षित आहे.
सावदा,. प्रतिनिधी । वाढता कोरोना संसर्ग व संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता 15 ते 18 वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला शहरात सुरूवात करण्यात आली. सावदा शहरात (sawada city) हे लसीकरण (coronavirus vaccine) सुरू करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी (suraj pardesi) यांनी केली होती व या मागणीला यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे. सावद्यात लसीकरणामुळे समाधान सावदा हे तालुक्यातील मोठे शहर असल्याने 15 ते 18 वयोगटातील युवकांचे लसीकरण येथे देखील होणे आवश्यक असल्याने ते त्वरीत सुरू करावे, अशी मागणी शिवसेना सावदा शहरप्रमुख सुरज परदेशी यांनी आमदार चंद्रकांत पाटील व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली होती. सावदा ग्रामीण रुग्णालयात 15 ते 18…
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एकुलती येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष अरुण पाटील यांनी आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या राजगड निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी शिवबंधन धागा बांधून भगवा रुमाल टाकून शिवसेनेत सत्कार केला याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील मुकेश जाधव अभिषेक पाटील शुभम वारके आदी मान्यवर उपस्थित होते संतोष पाटील यांचे शिवसेनेत प्रवेश केला म्हणून विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील शिवसेना प्रवक्ता गणेशराव पांढरे संजय तायडे उपतालुकाप्रमुख अशोक जाधव सुकलाल बारी जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्या गुजर आदींनी अभिनंदन केले आहे
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण ४०९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर १८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी दिली आहे. जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात दिवसभरात ४०९ रूग्ण आढळून आले आहे. तर १८० रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. यात जळगाव शहर-१५९, जळगाव ग्रामीण-१८, भुसावळ १०६, अमळनेर-५, चोपडा-४३, पाचोरा-९, भडगाव-१३, धरणगाव-६, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-४, पारोळा-९, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-२० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४०९ बाधित रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार ७८५ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ७२६ रूग्ण…
मुंबई, प्रतिनिधी। सातवीनंतर शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने अल्पसंख्याक समाजामध्ये विशेषत: मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जेथे सातवीपर्यंत शाळा आहेत त्या संस्थांमधील शाळांची १२ वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अल्पसंख्याक विकास समितीच्या काही सदस्यांनी सूचना केल्यानुसार याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जेथे तातडीने मान्यता देणे शक्य आहे, अशा शाळांमधील वर्गवाढीस मंजूरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्व संबंधितांची…
मुंबई, वृत्तसंस्था । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होतांना दिसत आहे. देशमुखांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. डिफॉल्ट जामीनासाठी देशमुखांनी हा अर्ज दाखल केला होता. विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश आर.एन. रोडके यांच्यापुढे आजची सुनावणी पार पडली. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची कोर्टानं वेळेत दखल न घेतल्याचा दावा नाकारण्यात आला आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. तर राज्य सरकारने परमबीर यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना…
जळगाव, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील रहिवासी तरुण शेतमजुराने नैराश्यातून विषप्राशन करीत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. अत्यंत गंभीर अवस्थेत त्याला पाचोरा येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या जगण्याची शक्यता मावळली होतीच, मात्र वैद्यकीय पथकाने हार न मानता त्याला २० दिवस अतिदक्षता विभागात ठेऊन त्याचे प्राण वाचविले. मंगळवारी दि. १८ जानेवारी रोजी त्याला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. मूळचा वठाण ता. सोयगाव येथील रहिवासी असलेला आणि पाचोरा तालुक्यातील रहिवासी चेतन (वय २३, नाव बदलले आहे) याने नैराश्यातून शेतात घातक विषारी औषध प्राशन केले होते. त्याच्या कुटुंबियांना तो रेल्वेरुळाजवळ मिळून आला…
रावेर, प्रतिनिधी । बीले पास करण्यासाठी १ लाख १५ हजार रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या वन परिक्षेत्रीय अधिकारी याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून ते शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वनविभागकडून रावेर तालुक्यात ए.एन.आर. रोपवन अंतर्गत त्यांनी चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई-टेन्डरींगच्या पध्दतीने घेतले होते. यापैकी त्यांनी दोन काम पुर्ण केले होते. कामाचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता. धनादेशाच्या मोबदल्यान वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन (वय-४५) रा. रावेर ता.जि.जळगाव यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० हजार रूपयांची मागणी केली.…
वर्धा, वृत्तसंस्था । पीडितेच्या आईमुळेच झाला अवैध गर्भपाताचा पर्दाफाश आर्वी येथील गर्भपात प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. या प्रकरणात धाडस करून तक्रार करणाऱ्या त्या मातेला सलाम करावा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिने संपूर्ण प्रकरण उघडकीस आणून पोलिसांना साद दिल्याने जलदगतीने तपास होऊन अवैध गर्भपाताचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे; अन्यथा आणखी किती कोवळे जीव बळी पडले असते कोणास ठाऊक. आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय मिळण्याची मागणी पीडितेच्या आईने पोलिसांकडे केलेली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा अनेक घटना कधी उजेडातच येत नाहीत. मुलीचे कसे होणार, समाज काय म्हणेल, आपली बदनामी होईल, या भीतीने अनेक गुन्हे दडविले जातात आणि…