काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी भंडारा जिल्ह्यात मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठय़ा राजकीय वादाला तोंड फोडले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. पण राज्यामधील राजकारण पटोले यांच्या या वक्तव्यानंतर चांगलेच तापले आहे. मंगळवारी राज्यातील अनेक ठिकाणी भाजपने आंदोलने, निदर्शने करुन नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला. अनेक ठिकाणी नाना पटोलेंच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्याला एक लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा करत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी केले आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव सुजीत जोगस असे असून ते जालना भाजपा युवा…
Author: saimat team
नगर : सर्व राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कर्जत नगरपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे . या निवडणुकीत 17 पैकी 12 जागा जिंकून राष्ट्रवादीने या नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपच्या पदरात दोन जागा पडल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाळेल्या दणदणीत विजयाने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. कर्जत नगरपंचायतीवर भाजपची (BJP) सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी व्यक्त केला आहे. मात्र शिंदे यांचा हा दावा फोल ठरला आहे. निवडणुकीपूर्वी शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर सडकून टीका केली. दबाव, दडपशाही,…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी जरंडी,निंबायती परिसरात तीन दिवसापासून भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असतांना सोमवारी रात्री जरंडी गावालगतच्या शेतात वेचणी करून ठेवलेला कापूस आणि निंबायती भागात तीन वीजपंप चोरी झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.पोलिसांची रात्रीची गस्त वाढलेली असतांना देखील चोरटे मात्र पोलिसांच्या हातांवर तुरी देवून डल्ला मारत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. जरंडी आणि निंबायती परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे एकाच रात्री शेतकऱ्याचा वेचणी करून ठेवलेल्या कपाशी सह तीन वीजपंप चोरी झाले आहे जरंडी गावालगत असलेल्या शेतात शेतकरी दिलीप पाटील यांनी वेचणी करून ठेवलेला दोन क्विंटल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे कापसाची चोरी करतांना बाजूच्या शेतातील…
चाळीसगाव प्रतिनिधी – नागपूर जिल्हयातील कळमेश्वर तालुक्यातील पत्रकार योगेश नानाजी कोरडे यांना कर्करोगाने ग्रासले आहे.गत 6 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांना डीफ्यूज लार्ज बी सेल लिंफोमा हा कर्करोग झाला आहे.आधी त्यांच्यावर नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कॅन्सर रूग्णालयात उपचार सुरू होते.आता त्यांच्यावर जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टियूट येथे उपचार सुरू आहेत.उपचाराचा खर्च अधिक असल्यामुळे त्यांनी डिस्चार्च करून घेतला.त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. घरचा एकमेव कर्ता योगेश हा कोरोनाच्या काळात कर्करोगाशी झुंज देत आहे. त्यामुळे योगेशच्या मदतीसाठी समाजाने मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन पत्रकार संघटनेच्या वतीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत चाळीसगाव…
चोपडा – महाराष्ट्र नाभिक महामंडळ चोपडा शाखेमार्फत वीर जिवा महाले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सर्व पदाधिकारी व नाभिक समाजबांधवांनी वीर जिवा महाले यांच्या प्रतिमापूजन व माल्यार्पण करीत विनम्र अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत निकम, चोपडा तालुकाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, शहराध्यक्ष सोपान बाविस्कर, देविदास बाविस्कर, माजी शहराध्यक्ष मनोहर सोनगिरे, राजेंद्र येशी, शत्रुघ्न सोनवणे, बाला निकम, धनराज पगारे, गणेश खोंडे, लक्ष्मण बाविस्कर, अनिल पगारे, अनिल सैंदाणे, मानव सैंदाणे,भूषण जगताप, गोकुळ सोनवणे, निंबा वाघ, प्रमोद सोनगिरे, हिरालाल सोनवणे, राहुल निकम आदिंसह इतर समाजबांधवांची उपस्थिती होती.
मलकापूर : प्रतिनिधी येथे नाफेड जिल्हा पनण महासंघ. तसेच पृथाशक्ती फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड अहमदनगर यांच्या संयुक्त मका खरेदीची सुरुवात डाॅ.अरविंद कोलते मुख्यप्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर अँड. साहेबराव मोरे जेष्ठ नेते काँग्रेस कमीटी याच्या हस्ते शेतकरी बाळुभाऊ जाधव यांचा शाल व श्रीफळ देवुन खरेदी करण्यात आले. भरड धान्याचे दुसरे सेंटर सुरु झाल्याने मलकापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मका. ज्वारी. बाजरी .तुर .हरभरा (चना) उडीद .मुग .सोयाबीन हमीभावात विकने सोईचे झाले असे मत डाॅ.अरविंद कोलते यांनी मांडले. तालुक्यातील शेतकर्यांना शेतमाल विकणे सोईचे व्हावेत यासाठी आमदार राजेशजी एकडे यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे असे काँग्रेस चे…
मलकापूर :प्रतिनिधी येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खालच्या पातळीवर शिवीगाळ करून टिका केली याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा मलकापूर यांच्या वतीने तहसील चौकात नाना पटोले यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नाना येशी, युवा मोर्चा शहराध्यक्ष शुभम बोबडे, अमोल टप, दुर्गेशभाऊ राजापुरे,अजय नांदुरकर, युवा मोर्चा SC सेल जिल्हा उपाध्यक्ष कुणाल ढोलकर, रवि भाऊ वानखेडे , आशिष जुनाडे,देवेन टाक,अतुल जाधव,सागर बेलोकार, साहेबराव खराटे, स्वप्नील पाटील ,गोलू मापारी, रोशन करांगळे, अमर वैद्य, आकाश सातव ,दिनेश तायडे, प्रशांत दाते, स्वप्निल पोलाखरे, सागर पठ्ठे, इत्यादी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते…
पहुर / प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील एकुलती येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष अरुण पाटील यांनी आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या राजगड निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी शिवबंधन धागा बांधून भगवा रुमाल टाकून शिवसेनेत सत्कार केला याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील मुकेश जाधव अभिषेक पाटील शुभम वारके आदी मान्यवर उपस्थित होते संतोष पाटील यांचे शिवसेनेत प्रवेश केला म्हणून विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील शिवसेना प्रवक्ता गणेशराव पांढरे संजय तायडे उपतालुकाप्रमुख अशोक जाधव सुकलाल बारी जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्या गुजर आदींनी अभिनंदन केले आहे
जामनेर (प्रतिनिधी): – जळगाव मार्गावरील नेरी येथील वाघूर नदीवरील नवीन पुल सुरू होण्याची प्रतीक्षा होत असताना या पुलाचे काम सहा महिन्यांपासून किरकोळ बाबींसाठी रखडले आहे सध्या वापरात असलेल्या जुन्या पुलाची अवस्था बिकट झाली असून त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते.तसेच नवीन पुलाच्या अपूर्ण कामामुळे ही नागरिकासह वाहनचालकांच्या त्रासात भर पडली आहे त्यामुळे रखडलेले काम लवकर पूर्ण करून नवीन पुल सुरू करावा अशी मागणी होत आहे नेरी येथील वाघूर नदीवरील नवीन पुलाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे.रस्त्यावर निर्माण होणाऱ्या धुळीमुळे पायी जाणाऱ्या व्यक्ती दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेले व्यवसायिक दुकानदार ग्रामस्थ यांना रोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने…
“प्रत्येक ठिकाणी शासन व प्रशासनाद्वारे जनतेच्या मुलभूत सुविधा व गरजा भागवण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करून नवीन विकासाच्या दृष्टिकोनातून शहर सुशोभीकरण,गटारी,रस्ते, पथदिवे,व्यापारी संकुलन,बगीचे, सार्वजनिक शौचालय, जलवाहिनी सह विविध योजनेअंतर्गत होणारे कामांच्या दर्जाबाबत सातत्याने जागृत जनतेतून होणारी ओरड व तक्रारींमध्ये तथ्य असले तरी यात संबंधित अधिकाऱ्यांनी वारंवार घेतलेली धृतराष्ट्राची भूमिका बरेच काही सांगून जात आहे.हे मात्र खरे.” सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा न.पा.हद्दीत समाविष्ट सोमेश्वरनगरात लाखों रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या गटारींचे काम दर्जात्मक न होता.त्यात मातीमिश्रीत वाळूचा सर्रास वापर केला जात असून गटारिच्या भुतळात थेट कच्चे मुरुमचा वापरला जात आहे.यामुळे गटारींचे काम निकृष्ट होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.…