Author: saimat team

करोनाचा धोका अजूनही पूर्णपणे कमी झालेला नाही. दररोज हजारो करोना बाधित होत आहेत. करोनाचा वाढता धोका लक्षत घेता अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा वर्क फ्रॉम होम करण्यासच सांगितलं आहे. तसेच, अनेक शाळा आणि महाविद्यालये देखील विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईनच घेत आहे. त्यामुळे भारतात ब्रॉडबँड सेवेची मागणी झपाट्याने वाढली आहे. ब्रॉडबँड सेवा प्रदात्यांनी युजर्सना हाय-स्पीड इंटरनेट ऍक्सेस प्रदान करण्यासाठी अनेक ब्रॉडबँड प्लान्सची नवीन श्रेणी देखील आणली आहे. तुम्हीही घरूनच काम करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांच्या ऑनलाइन क्लासेससाठी सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लान्स खरेदी करायचे असतील. तर ही ब्रॉडबँड प्लान्सची लिस्ट नक्की पाहा आणि तुमच्या गरजेनुसार यातील बेस्ट प्लान निवडा. यात बीएसएनएलचा ३९९…

Read More

गुणवत्ता ही खुल्या स्पर्धात्मक परीक्षेतील कामगिरीपुरती मर्यादित नसून, सामाजिक संदर्भही त्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी असलेल्या प्रक्रियेतील (NEET) अखिल भारतीय स्तरावरील जागांमधील (ऑल इंडिया कोटा) इतर मागासवर्गीयांसाठीचे (ओबीसी) २७ टक्के आरक्षण कायम ठेवले. करोना साथरोगाच्या सध्याच्या काळात प्रवेश प्रक्रिया लांबविणे योग्य नसल्याचे नमूद करीत न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) सध्या असलेले दहा टक्के आरक्षणही कायम ठेवले आहे. ‘परीक्षेत मिळालेले गुण हा गुणवत्ता ठरविण्याचा एकमेव आधार असू शकत नाही. दुर्बल घटकांना समानतेची संधी देण्यासाठी राज्यघटनेचे कलम १६ (४), १५ (४) आणि १५ (५) सरकारला अधिकार देते. समानतेसाठीचा अडथळा दूर करण्यासाठी आरक्षण हा एक उपाय…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी नगरातील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समीर रामदास बांदल रा. शिवाजीनगर हुडको जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. समीर बांदल हा शिवाजी नगरात वडील, पत्नी, भाऊ व दोन मुलींसह वास्तव्याला आहे. गेल्या दीड महिन्यांपुर्वीच समीर हा पुण्याला नोकरी लागली होती. मंगळवारी १८ जानेवारी रोजी समीरच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम असल्याने तो जळगावात घरी आला होता. दरम्यान २० जानेवारी रोजी सायंकाळ…

Read More

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. ‘प्रश्न विचारायला अक्कल लागते काय’ असे वक्तव्य महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर या वक्तव्यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यालाच अनुसरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यावेळी संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसमोरील वर्दळीच्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग दिसत नाहीत. त्यामुळे पायी चालणाऱ्यांचे हाल होत आहेत. याच मुद्द्यावरून संदीप देशपांडे यांनी ‘झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?’…

Read More

देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीसाठी आणि खास करून उद्धव ठाकरेंसाठी चांगली बातमी आहे. देशात टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचासमावेश आहे. एका सर्वेतून ही मोठी माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी व्होटरने ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर सर्वे केला. २०२२ हा अतिशय ताजा सर्वे आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? यातून समोर आले आहे. यात पहिल्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या…

Read More

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि पुन्हा एकदा शतक झळकावण्यापासून वंचित राहिला. या सामन्यात विराट खूपच चांगला दिसत होता आणि कर्णधारपदाचे दडपण दूर झाल्यानंतर कोहली मोठी खेळी खेळेल याची त्याच्या चाहत्यांना खात्री होती. विराटही तेच करण्याच्या मूडमध्ये होता, पण तबरेझ शम्सीचा एक चेंडू थोडा संथ राहिला आणि विराटचा येथेच पराभव झाला. तो बाद होताच संपूर्ण संघ कोलमडला आणि भारताचा सामना 31 धावांनी गमवावा लागला. विराटचे शेवटच्या पाच एकदिवसीय डावांमधील हे चौथे अर्धशतक होते. याआधी त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही अर्धशतके झळकावली आहेत, मात्र त्याला शतक…

Read More

   चोपडा   – शहरात दुचाकी वाहन धारकांची संख्या कमालीची वाढली असून, दुचाकी वाहनांमध्ये मॉडिफिकेशन करून, जास्त ‌आवाजाचे सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न बसवून चोपडा शहरात सुसाट वेगात फेरफटका मारण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सर व हाॕर्नमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते, शिवाय अनेकांना विनाकारण त्रासही होतो. बुलेटवरून हवा करत फिरणाऱ्या अशाच अतिउत्साही युवकांची हवा काढण्याची कारवाई चोपडा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी करावी हिच सर्वसामान्यांची अपेक्षा.आता तर चक्क तहसील कार्यालय व शहर तसेच ग्रामीण पोलिस स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावरच या गाड्या फेरफटका मारत असतात. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या पोलीस चौकीसमोरुन जात…

Read More

जामनेर (प्रतिनिधी) येथील नगरपालीकेने पाच टक्के अनुदानातुन शहरातील  दिव्यांगाना मदत वाटपास सुरुवात केली आहे. दी.२०रोजी नगराध्यक्षा सौ. साधना महाजन यांच्या हस्ते प्रातिनीधीक स्वरुपात काहीं दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आले. नगरपालीका दरवर्षी दिव्यांगांना पाच हजाराची मदत करत असते. आज प्रणाली झाल्टे, सना कौसर अब्दुल, आफरीन बी अशफाक शाह, कल्पेश काटोले व अजिंक्य टहाकळे यांना नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.या वेळी गटनेते डॉ प्रशांत भोंडे, उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील,  नगरसेवक बाबुराव हिवराळे, अतीष झाल्टे,जितू पाटील, उल्हास पाटील , भगवान सोनवणे यांच्या सह नगरसेवक मुख्याधीकारी चंद्रकांत भोसले , उपमुख्य अधिकारी दुर्गेश सोनवणे अपंग संघटनेचे पदाधीकारी व डिव्यांग…

Read More

चाळीसगाव , चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी  चे बी. पी. आर्टस , एस. एम. ए. सायन्स अेॅड के. के. सी. काॅमर्स काॅलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर काॅलेज, चाळीसगाव येथे मराठी विभागाच्यावतीने दि.१९/१/२०२२ रोजी. सायं.५:००वा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  अेॅानलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेलनाचे उद्घाटन मा.नारायणभाऊ अग्रवाल ( चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या, मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन.) यांच्या हस्ते करण्यात आले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी  मराठीतल सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार या होत्या. या कविसंमेलनात प्रसिद्ध कवयित्री तथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मा.मीनाक्षी पाटील, मुंबई. प्रसिद्ध कवी , चित्रपट गीतकार डॉ.दासू वैद्य (अैारंगाबाद) प्रसिद्ध कवी, प्रा. डॉ.पी. विठ्ठल ( नांदेड) ख्वाडा…

Read More

पहुर / प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील खर्चना गावी शेतीशाळा व शेतकरी दिन साजरा करण्यात आला जामनेर तालुका कृषी विभागातर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा अंतर्गत शेती शाळा व शेतकरी दिन निमित्त महिला शेतकरी तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांची शेतीशाळा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार गणेश पांढरे ग्रामपंचायत सदस्य योगेश भडांगे प्रकाश पाटील किरण खैरनार पोलीस पाटील सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते जामनेर तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक महाजन आत्मा समन्वयक राकेश पाटील कृषी सहाय्यक गायकवाड किशोर पाटील पी पी पवार सचिन सानप रुपेश बिराडे आदी कृषी अधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांना कपाशी मका केळी…

Read More