जळगाव, : जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाहनांच्या ताफ्यात आता आणखी एक नव्याने ब्राऊझर मशिनरूपी वाहन दाखल झाले आहे. या ब्राऊझर मशिनचे आज शुक्रवार, दि.21 जानेवारी 2021 रोजी सकाळी गोदावरी पीठगिरणी भागात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. यानंतर त्यांच्या उपस्थितीतच महानगरपालिकेतर्फे गोदावरी पीठगिरणी भागातील कॉलनींतर्गत रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना सुरूवात करण्यात आली. यामुळे या परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणासह आता कॉलनी, उपनगरांतर्गत असलेले छोटे-छोटे रस्ते की ज्यांच्यावर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे तेथील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह त्यावर डांबरीकरण करण्याच्या कामांनाही सुरूवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून आज चर्चच्या पाठीमागे…
Author: saimat team
नाशिक: टाटा स्टारबक्स प्रायव्हेट लिमिटेडने आज शहरामध्ये पहिल्या स्टोअरच्या उद्घाटनासह नाशिकमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली. नाशिक हे स्टारबक्ससाठी महाराष्ट्रातील ४थे शहर, तर भारतातील २३वे शहर आहे. ज्यामुळे भारतीय ग्राहकांना अस्सल स्टारबक्स अनुभव देण्याचा लक्ष केंद्रित करत देशभरातील ब्रॅण्डची उपस्थिती अधिक प्रबळ झाली आहे. हे नवीन स्टोअर ग्राहकांना स्टारबक्स सिग्नेचर बेव्हरेजस्, तसेच फूड पर्यायांचा अनुभव देण्यासोबत सर्वांसाठी स्वागतार्ह थर्ड प्लेसची निर्मिती करेल. हे नवीन स्टोअर नाशिकच्या प्रमुख हाय-स्ट्रीट भागातील स्टेटस बिल्डिंग, श्रीजी स्टेटस, सिटी सेंटर मॉलच्यासमोर, उंटवाडी रोड येथे स्थित आहे. ”हे टाटा स्टारबक्सचे भारतातील १०वे वर्ष आहे आणि आम्हाला विश्वासार्ह व सर्वोत्तम संस्कृतीची निर्मिती करत २३ शहरांमधील २४६ स्टोअर्ससह देशभरातील…
नाविन्यपूर्ण योजनेच्या कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक जळगाव : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २२-२3 करिता ३५७ कोटी ४९ लक्ष रूपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त ६७ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी ४२५ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, या संदर्भात आज ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे…
गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेला आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा जोतिराव फुले ही योजना राज्यात एकत्रित राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेचा लाभ 36 हजार 328 रुग्णांनी घेतल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. दिपेश कुमार शर्मा यांनी दिली. ही योजना गरीबांसाठी वरदान ठरत आहे. दुर्धर आजारांचा समावेश 1 एप्रिल 2020 पासून महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत अनेक दुर्धर आजारांचा आणि शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा दिली जाते. लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयात…
राजधानी दिल्लीतील इंडिया गेटची (India Gate) ५० वर्षांपासून ओळख बनलेली अमर जवान ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी येथून हलवली जात आहे. आता ही ज्योत इंडिया गेट ऐवजी राष्ट्रीय युद्ध स्मारक (नॅशनल वॉर मेमोरियल) येथे विलीन होऊन ती प्रज्वलित करण्यात येणार आहे. ही ज्योत आज दुपारी ३.३० वाजता युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन होणार आहे. अमर जवान ज्योतीची मशाल आज दुपारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात आणली जाईल. तेथे एका समारंभात दोन्ही ज्योत विलीन होतील. एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या ३,८४३ भारतीय जवानांच्या स्मरणार्थ ही इंडिया गेट बांधले गेले. तिथे प्रथम…
फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू असून तो उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी संपणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, गॅजेट्ससह अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. सेलमध्ये वायरलेस नेकबँड इअरफोन्स देखील सवलतीसह उपलब्ध असून फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेजमध्ये स्टायलिश नेकबँड्स मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करता येतील. सेलमध्ये तुम्हाला एक हजार रुपयांच्या आत मस्त नेकबँड मिळेल. Ubon, Vingajoy, Mivi, Noise नेकबँड्सबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि तुमच्यासाठी बेस्ट नेकबँड्स खरेदी करा. Ubon वायरलेस नेकबँड इअरफोन: Ubon Wireless Neckband Earphone ची लाँच किंमत १,९९९ रुपये आहे. पण सेलमध्ये ते फक्त ४९९ रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच नेकबँडवर ७५ % सूट दिली…
विविध विचार, स्वभाव आणि बरीच कारणे आपल्या चिंतेचे मूळ कारण असतात. एकंदरीत या चिंतेचे तणावात रुपांतर होते. तणाव दूर (stress free) व्हावा म्हणून वेळोवेळी घेतली जाणारी औषधी, आहारातील बदल यांचा तणाव किंवा चिंता कमी करण्यास फायदा होत नाही तर उलट शारीरिक समस्यात (physical problems) वाढ होते. चिंता वाढण्यामागचे नेमका कारण काय? आपल्याला नेमका कोणत्या गोष्टीमुळे त्रास होत आहे, याचे कारण शोधणे आवश्यक आहे. त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्यामागची सगळी कारणे शोधून तोडगा काढणे आवश्यक आहे. आपण तणावात असाल तेव्हा काही वेळ डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला तर मनावरील ताण काही क्षणांत निश्चितपणे हलका होऊ शकतो. कमी वेळेत तणाव कमी करण्यासाठी…
धानोरा ता. चोपडा : चिंचोली ता. यावल येथील बाबूलाल प्रभाकर साठे यांच्या पत्नी बेबाबाई बाबुलाल साठे वय ७२ यांचे दि. १९रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले , त्यांची अंत्ययात्रा २० रोजी सकाळी 0९ वाजता चिंचोली येथील राहत्या घरून निघनार आहे . त्यांच्या पश्नांत पती, मुले, सुना, मुली,जावाई, नातवंडे असा परिवार ते सामाजिक कार्यकर्ते संजय साठे यांच्या आई होत.
विजय चौधरी-सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यात आज 512 जणांना (मनपा 338, ग्रामीण 174) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 924 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार 149 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 58 हजार 941 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 671 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6 हजार 346 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मनपा (758) घाटी परिसर 6, कॅन्सर हॉस्पीटल परिसर 1, आर्मी कॅम्प छावणी परिसर 7, संजय नगर 1, भावसिंगपुरा 1, नंदनवन कॉलनी 5, उस्मानपूरा 6,…
मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता पाणीपट्टीच्या मूळ मुद्दलावरील विलंब आकार/शुल्क माफीच्या सवलतीची अभय योजना जाहीर झाली असून ही योजना आजपासून राज्यात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. याबाबतचे शासन परिपत्रकही पाणीपुरवठा विभागाकडून निर्गमित करण्यात आले आहे. पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात आजपासून अभय योजनेला सुरुवात होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता पाणीपट्टीच्या मूळ मुद्दलावरील विलंबाचा आकार, दंड, व्याज यात पाणीपुरवठा विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सूट देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी टप्प्या-टप्प्याने पैसे भरावे. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान पाणीपुरवठा केंद्राच्या मागणीच्या आधारावर ही योजना आजपासून…