जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी मिळालेले ५ कोटी रुपये ३१ मार्चपूर्वी खर्च न केल्यामुळे हा निधी शासनाला परत गेला आहे. या निधीतून ७ आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम करण्यात येणार होते. दरम्यान, प्रशासनाने टेंडर प्रक्रिया आणि तांत्रिक कामे वेळेत न केल्याने ही अडचण निर्माण झाल्याचा आरोप करीत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या वेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, सर्व विषय समित्यांचे सभापती, सदस्य नानाभाऊ महाजन, शशिकांत साळुंखे, रावसाहेब पाटील, मधुकर काटे, अमित देशमुख, पवन सोनवणे…
Author: saimat team
महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मात्र ज्या राज्यांत निवडणुका आहेत अशा राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढताना कसे दिसत नाहीत, अशी शंका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उपस्थित केली आहे. मुंबई: राज्यात करोनाच उद्रेक झाला असून दिवसेंदिवस नव्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशातील राज्यांच्या विचार केल्यास सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असून करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना ज्या राज्यात निवडणुका आहेत अशा राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढताना कसे दिसत नाहीत, अशी शंका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उपस्थित केली आहे. केवळ महाराष्ट्रातच करोनाचे रुग्ण का वाढत आहेत आणि जेथे निवडणूक आहे अशा राज्यांमध्ये रुग्ण का वाढत नाहीत, याचा अभ्यास…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाउन लागू करावा का, तो ८ दिवसांचा असावा की १४ दिवसांचा असावा, याबाबत चर्चा केली जात आहे. मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्सची बैठक (task force meeting) सुरू झाली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाउन लागू करावा का, तो ८ दिवसांचा असावा की १४ दिवसांचा असावा, याबाबत विचारविनिमय केला जात आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला राज्यातील प्रसिद्ध डॉक्टर्स उपस्थित…
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके लावणे आणि मनसुख हिरेनच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करताना मुंबई पोलिसांना (Mumbai Police) अडचणी येत आहेत. या प्रकरणात सचिन वाझे न्यायालयीन कोठडीत आहे, तर त्याचा साथीदार रियाज काझी यालाही १६ एप्रिलपर्यंत NIA कोठडी देण्यात आली आहे. स्फोटकेप्रकरण आणि हत्या यात अडचणी वाढू लागताच संबंधित पोलिसांचे वरिष्ठांकडून निलंबन होणे आणि काही दिवसांनंतर त्यांना अटक होणे, असे चक्र सुरू आहे. आधी API पदावरुन सचिन वाझे निलंबन झाले. नंतर त्याला एनआयएने १३ मार्च रोजी अटक केली. अटक केल्यापासून पाच वेळा एनआयएने वाझेची कोठडी वाढवून घेतली. अखेर २७ दिवसांच्या एनआयए कोठडीनंतर सचिन वाझे याची १४…
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले आहे. उद्या त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले आहे. उद्या त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शरद पवार यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार आज त्याला ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात…
जळगाव ः प्रतिनिधी शहराला लागून असलेल्या वाघनगर आणि परिसरातील जनतेसाठी वाघूर धरणावरून पाणीपुरवठा करण्याची योजना पूर्ण झाली आहे. शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. योजना कार्यान्वित झाल्याने परिसरातील ३० हजार नागरिकांची भटकंती थांबणार आहे. वाघनगरसह परिसरातील कॉलन्या या महापालिका हद्दीत असल्या तरी त्यांचा समावेश जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होतो. सावखेडा ग्रामपंचायतीच्या या भागासाठी वाघूर धरणावरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या या योजनेची दोन दिवसांपूर्वी चाचणी यशस्वी झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ही योजना कार्यन्वित करण्यात आली. गेल्या निवडणुकीत ही योजना पूर्ण करण्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते. वाघूर धरणातल्या…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता नागरीकांची अडवणूक होवू नये,याकरीता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जळगावच्या कार्यक्षेत्रात खाजगी कामानिमित्त येणार्या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर वाहनाचा प्रकार, सरासरी धाव, चालकाचा भत्ता, घसारा व ग्राहक निर्देशांक विचारात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निश्चित केला आहे. मारुती व्हॅन, मारुती इको (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत पंधराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी दहा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे. टाटा सुमो व जीपसदृश बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सहाशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत बाराशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत अठराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बारा रुपये…
भुसावळ : प्रतिनिधी येथील श्रीनगर मधील रहिवासी नलिनी दिवाकर भोकरडोळे(वय ८१) यांचे काल ९ एप्रिल रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तापी नदीकाठी वैकुंठधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या सायंदैनिक साईमतचे लेखापाल हेमंत भोकरडोळे यांच्या मातोश्री होत. भोकरडोळे परिवारावर कोसळलेल्या दुःखात साईमत परिवार सहभागी आहे.
जळगाव ः प्रतिनिधी मनपातील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा बुधवारी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे सादर केला. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून आता नवीन स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. आगामी अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी शिवसेना संघटना व पराभूत उमेदवारांपैकी कोणाला संधी मिळते हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. शिवसेनेसोबत अनेक वर्ष काम करणार्या अन्य सदस्यांना संधी देण्यासाठी काही दिवसांपासून स्वीकृत सदस्य बदलाच्या हालचाली सुरू होत्या.दरम्यान, संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी जैन यांना राजीनामा देण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते. त्यानुसार सोमवारी अमर जैन हे राजीनामा देण्यासाठी गेले होते. परंतु, आयुक्त सतीश कुलकर्णी नसल्याने ते माघारी परतले होते. दरम्यान,…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेतील आपल्याच एकेकाळच्या समर्थक पदाधिकार्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेनासे झाल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिथे सत्तांतर घडवून आणण्याच्या हालचाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते,माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सुरू केल्या आहेत.शुक्रवारी सायंकाळी त्या अनुशंगाने खडसे यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे गटनेते या बैठकीला उपस्थित होते. जळगाव महानगरपालिकेत नुकतेच शिवसेनेने सत्तांतर घडवून आणले. त्यात खडसे यांचे काहीच योगदान नव्हते, असा प्रचार या सत्तांतराच्या वेळी करण्याचा प्रयत्न काही बंडखोर नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत एकहाती सत्तांतर घडवून आणण्याच्या तयारीला खडसे लागले आहेत, असे सांगण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या या बैठकीकडे पाहिले…