यावल, तालुका प्रतिनिधी । ‘यावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली’ असे वृत्त सायंदैनिक ‘साईमत’ मध्ये आणि ऑनलाईन प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नगरपालिका कार्यक्षेत्रांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.कारण जळगाव जिल्ह्यात अनेक नगरपालिका कार्यक्षेत्रातील घनकचरा संकलन करून वाहतूक करण्याचे कोट्यवधी रुपयाचे ठेके एकाच मक्तेदाराने घेतले असल्याचे भ्रमणध्वनीवरून अनेकांनी सांगितले. तसेच हे घनकचरा संकलन करून वाहतुकीचे ठेके त्या मक्तेदाराने स्थानिक काही नगरसेवकांना हाताशी धरून चक्क घनकचरा वाहतूक मजूर बनवून त्यांना टक्केवारीची मजुरी देण्याचे निश्चित केले असल्याचे बोलले जात असल्याने जिल्हाधिकारी जळगाव यांनी जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकामधील घनकचरा संकलन व वाहतूक करणार्या ठेकेदारांचे कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यास जिल्ह्यातील अनेक नगरपालिकाचा घनकचर्यातील घोळ…
Author: saimat team
फैजपूर ता.यावल, प्रतिनिधी । यावल-रावेर तालुक्यात गुटखा माफियांचे भक्कम जाळे पसरले असून याकडे जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभाग ‘अर्थ’पूर्ण डोळेझाक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.शासनाची बंदी असताना मागेल त्याठिकाणी गल्लीबोळात गुटखा मिळत असल्याने गुटखाबंदीचा शासनाचा आदेश कुचकामी ठरला आहे.ही अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी असतानासुद्धा सरकार पक्षातर्फे फिर्यादी होऊन पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला आहे. काल ६ सप्टेंबर रोजी यावल-रावेर रस्त्यावरील जे. टी. महाजन इंजिनीरिंग कॉलेजसमोर फैजपूर पोलिसांनी तब्बल १५ लाख ७० हजार ८०० रुपये किंमतीचा गुटखा तसेच ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण १९ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. फैजपूर पोलीस स्टेशनला…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । विवाहाची नोंदणी करण्यासाठी यापूर्वी वधू-वर दोघांनाही विवाह नोंदणी कार्यालयात उपस्थित राहावे लागत होते मात्र आता केरळ न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार वधू-वर उपस्थित नसतानाही लग्नाची नोंदणी करता येणार आहे. विशेष विवाह अधिनियमानुसार एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत. दोन्ही पक्षांची ओळख पटवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असेही न्यायालयाने सुचवले आहे. न्यायमूर्ती महम्मद मुश्ताक आणि कौसर एडप्पागठ यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. पक्षकारांची ओळख पटवण्यासाठी फेशिअल रेकग्निशन आणि तत्सम अन्य तंत्रज्ञानाचा वापर कऱण्यासाठी केंद्र सरकारने आदेश द्यावेत असं न्यायालयाने म्हटलं आहेय बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर कऱण्यासंबंधीही न्यायालयाने सुचवले आहे. खंडपीठाने एकल पीठाचे न्यायाधीश पीबी सुरेश…
जळगाव, विशेष प्रतिनिधी । शहरात चोर्या, घरफोड्या ,चेन ओढून पळणे, मोबाईल हिसकावून पळणे आदी घटनांचा नित्यक्रम सुरूच असतांना गुन्हेगारी ,तलवार घेऊन दहशत माजविणे,गावठी पिस्तुल-रिव्हॉल्वर बाळगणे आदी घटना नित्यनेमाने घडत आहेत. त्यातच हद्दपारीची कारवाई करण्यात आलेले गुन्हेगार खुलेआम शहरात वावरत असल्याचेही सातत्याने समोर येत आहे.तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वेशीला टांगला गेला काय?त्याचबरोबर आपल्या विविध पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉडचे तसेच एलसीबीचे कार्यक्षम पोलीस करतात काय?असे प्रश्न उपस्थित होणे अगदी साहजिक आहे.आणि हे सारे घडत असल्याने आपले शहर गुन्हेगारी आणि गुन्हेगार मंडळींसाठी पोषक आहे अशी चर्चा रंगत आहे. अलीकडे पोलिसांकडून नागरिकांना सूचित व सावध करण्यात आले आहे. ते असे की,आपले किमती मोबाईल…
मुंबई, प्रतिनिधी । बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात, पुढचे २ ते ३ दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये त्याचा प्रभाव जास्त असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुन्हा पाणी भरण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दापोलीलाही पावसानं झोडपले आहे. केळसकरनाका येथे रात्री मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात, पुढील दोन ते…
जळगाव, प्रतिनिधी । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून धरणातील आवक सतत वाढत असल्याने सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे. त्यामुळे तापी नदी काठावरील गावातील नागरीकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील आवक ही वाढत आहे. सध्या धरणाचे 4 दरवाजे पूर्ण तर 2 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले असून यातून 27 हजार 828 क्युसेक तर कालव्यातून 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे.…
जळगाव प्रतिनिधी । कचरा टाकण्यासाठी बाहेर आलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोड्याची मंगलपोत अज्ञात चोरट्याने धूमस्टाईलने लंपास केल्याची घटना ६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील चैतन्य नगरातील भूपाळी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या प्रमिला बालकीसन सोमानी (वय-७२) आपल्या परिवारासह राहतात. सोमवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास घरातील पपईचे सालटे कचरा कुंडीत टाकण्यासाठी प्रमिला सोमानी ह्या अपार्टमेंच्या खाली आल्या. पपईचे सालटे टाकल्यानंतर त्या पुन्हा घराकडे जात असतांना मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून येवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केली. महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोघे दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी…
*राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची बैठक बुधवारी ;शरद पवार घेणार मतदारसंघाचा आढावा – नवाब मलिक* मुंबई – प्रतिनिधी २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढून विजयी झालेले व पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ही बैठक आदरणीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती मात्र पवारसाहेबांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार…
मुंबई – प्रतिनिधी लेखक व ज्येष्ठ कवी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तालिबानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन देशभरातील राजकीय वातावरण गरम आहे. यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना इशारा दिला आहे. जाहीरपणे चर्चा करा किंवा माफी मागा, असे आव्हान राणे यांनी दिले असून त्यासाठी अख्तर यांना आठवड्याचा कालावधी दिला आहे. अख्तर यांनी आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद सध्या देशभर उमटत आहेत. यावर नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना जाहीर पत्र लिहित ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. ट्विटमध्ये राणे म्हणतात, ‘मी तुम्हाला एका आठवड्याचा अल्टिमेटम…
जनतेचे आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती बिघडवू शकते मुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गत थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत…