मलकापूर : प्रतिनिधी – शहरातील सुभाषचंद्र बोस नगर मधील राहणाऱ्या रावणचवरे कुटूंबात झालेल्या वादातून मुलीने चुलत भावासोबत मिळून बापाचा पोटात चाकू खुपसून खुन केल्याची हृद्यद्रावक घटना काल रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. याघटनेमुळे परीसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान झालेल्या घटनेमागे अनैतिक संबंधांचा संशय व्यक्त करण्यात येत असून याबाबत परीसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. अधिक असे की, शहरातील सुभाषचंद्र बोस नगर मधील गुलाब यादव रावणचवरे आपल्या कुटूंबीयांसोबत रहिवासाला आहे. त्याच्या सोबत घरात त्याची एक विवाहीत मुलगी देखील एका वर्षापासुन कौटूंबीक वादामुळे माहेरीच राहत आहे. याबरोबर गुलाब यांचा पुतण्या प्रकाश रावणचवरे हा देखील त्यांच्याकडेच वास्तव्यास होता. काल रात्री मुलगी लक्ष्मी…
Author: saimat team
राजकीय स्वार्थासाठी पक्षांतरे करीत विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर बसलेल्या नीलम गोऱ्हे आता खुर्ची टिकविण्यासाठी ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्याची धडपड करत असून महिलांवरील अत्याचाराबाबत मात्र त्यांनी तोंडास कुलुप घातले आहे. स्त्री हक्काचा आधार घेत राजकीय बस्तान बसविणाऱ्या नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत, असा सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती स्मिता वाघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेस मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे पोटदुखी होऊन ठाकरे सरकारने त्यांना केलेल्या अटकेनंतर नीलम गोऱ्हे यांची जीभ घसरली, आणि त्यांनी राजकीय शेरेबाजी केली. आपली खुर्ची शाबूत राखण्यासाठी ठाकरे कुटुंबाची खुशामत करणे गरजेचे असल्याने तसे करताना…
मुंबई – प्रतिनिधी तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन हीरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. जेव्हा NIA केव्हाही अटक करु शकते अशी भीती निर्माण झाल्यावर परमवीरसिंग यांनी भाजपसोबत ‘डील’ केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद असल्याचे लक्षात आल्यानंतर परमवीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचे काम केले. त्या ‘डील’ मुळे NIA ने परमवीरसिंग यांना आरोपी केलेले नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र आता भाजप NIA ला अधिकार आहेत कुणाला आरोपी करायचं आणि कुणाला…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । स्टाफ सिलेक्शन कमिशननं कंबाइंड ग्रॅज्युएशन लेवल म्हणजेच सीजीएल 2020 च्या टीयर 1 च्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एसएससीनं बुधवारी एक नोटिफिकेशन जारी करुन सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षाचा निकाल 11 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याची घोषणा केली आहे. सीजीएल परीक्षा 2020 टियर 1 चं आयोजन 13 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल सीजीएल 2020 च्या टीयर 1 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. आयोगाकडून लवकरच अंतिम उत्तर तालिका जाहीर केली जाणार आहे. 11 डिसेंबरला टीयर 1 च्या निकालामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना टीयर 2 ची परीक्षा द्यावी, लागणार आहे.…
जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदा येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्यावतीने पोषण आहार अभियानाचा कार्यक्रम राबविण्यात आले आहे. वावडदा ता.जि.जळगाव येथे दि.८ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना मार्फत पोषण आहार अभियान कार्यक्रम राबविण्यात आले या वेळी सरपंच राजेंद्र वाडेकर. पर्यवेक्षिका अर्चना धामोरे यांनी महीला व बालकाना आरोग्य विषयी व एसटी बस बसस्थानक वरती दुकानदार लसीकरणाबाबत जनजागृतीसह मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी कोड क्र १०२४.१०२५. अगणवाडी सेविका प्रतिभा शिंपी, मीना पवार मदनीस किर्ती गवळे उपस्थित होते.
जळगाव:- प्रतिनिधी covid 19 पासून बचावासाठी प्रशासनातर्फे लसींचा पाठपुरावा वेळोवेळी केला जात असून जळगाव शहरात दिनांक 8 सप्टेंबर रोजी तब्बल चोवीस हजार लसींचा विक्रम करण्यात आला आहे. महापौर यांच्या पाठपुराव्याने शहरातील नऊ केंद्रांवर लसीकरण उपलब्ध झाले असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करण्याचे आवाहन महापौरांतर्फे करण्यात आले आहे. जळगाव शहरात 6062 लसी उपलब्ध झाल्या असून दिनांक 8 रोजी 24 हजार लसींचा विक्रम करण्यात आला आहे. शहरातील नऊ लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी लसी घेतल्या आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम लावलानी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने 9 लसीकरण केंद्रांवर सेवा बजावली. शहरातील काशीबाई उखाजी केंद्रावर सर्वाधिक 1640 लसीकरण झाले असून त्या खालोखाल शाहूनगर रुग्णालयात तब्बल…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य शिंदे उपस्थितीत राहणार – -उद्योगमंत्री सुभाष देसाई मुंबई – प्रतिनिधी कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. श्री. देसाई यांनी सांगितले, उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एम आय डी सी) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून या विमानतळाचे काम पूर्ण…
जळगाव:- या पदाचा अतिरिक्त कार्यभार 2020 पासून श्री प्रशांत मोरे यांच्या कडे होता,आता जलसंपदा विभागाने 08 Sep 2021 रोजी सदर जागी श्री य.का.भदाणे यांची नियुक्ती केली आहे,बदली चे आदेश आज संध्याकाळी उशिराने महामंडळ कार्यालयास प्राप्त झाले. जिल्ह्यातील अनेक निर्माणाधीन प्रकल्पांना गती मिळण्यासाठी ह्या ठिकाणी पूर्णवेळ नियमीत अधिकाऱ्याच्या नेमणुकीची नितांत गरज होती शासनाने आज आदेश काढून श्री भदाणे यांना नियुक्त केले आहे.
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल पत्रकार परिषद घेत ९ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती दिली. तसेच उद्घाटनाला मुख्यमंत्री असायला हवे असे काही नाही, संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार असल्याचे म्हणत, त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) डिवचले. यावरून शिवसेनेचे नेतेही आक्रमक झाले असून याबाबतचा निर्णय राणे घेऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे. दरम्यान, राणेंच्या या विधानाशी भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही फारकत घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा सन्मान राखला पाहिजे. त्यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलं पाहिजे. सोबतच चिपी विमानतळाशी विनायक राऊत (Vinayak Raut) आणि शिवसेनेचा काय संबंध?…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची धुळे येथे बदली झाली आहे. बदलीचे आदेश प्राप्त झाले असून जळगावचाही अतिरिक्त कार्यभार राहणार आहे. तसेच नंदुरबार जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांची पुणे येथे बदली झाली आहे. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी धुळे येथे यापूर्वीही काम पाहिले आहे.