जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगरमधील दारफळ जवळ पावसामुळे एक कौलारू घर कोसळले. त्यात एक तरूण जखमी झाला. घर कोसळल्याने कुटुंबिय रस्त्यावर आले आहे. यावेळी तलाठी यांनी पंचनामा केला. शासनाकडून तातडीने मदत व्हावी अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर परिसरातील शिवमंदीराजवळ शुभम मोहनलाल पुरोहित यांचे कौलारूसह पत्र्याचे घर आहे. शुभम मोहनलाल पुरोहित हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. काल सोमवारी १३ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे आज १४ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कौलारू व पत्र्याचे असलेले घर कोसळले. यात शुभम किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी घटनास्थळी…
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरी नाकाजवळ असलेल्या अशोक हार्डवेअर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ९६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, जितू बलराम आहूजा (वय-३४) रा. नानक निवास नवजीवन सोसायटी सिंधी कॉलनी यांचे शहरातील नेरी नाकाजवळ असलेल्या मटनमार्केटच्या बाजूला अशोक हार्डवेअर नावाचे दुकान आहे. १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच ते साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या बाजूची खिडकीचा पत्रा वाकवून दुकानातून सुमारे ९६ हजार ५०० रुपये किमतीचे प्लॅनेट पॉवर कंपनीचे बोर मशीन, हॅमर मशीन, कटर मशीन आणि डोअरचे ३० किट असा…
चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील कॅप्टन कॉर्नर येथे राहणाऱ्या एका खासगी डॉक्टराच्या घरातील लोखंडी कपाटातून अज्ञात इसमाने २ लाख ६ हजार रुपये रोखड लंपास केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, विवेक बळवंतराव बोरसे (वय-४०) रा. कॅप्टन कॉर्नर चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून शहरातील चिरायू दवाखान्यात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान बोरसे हे नेहमीप्रमाणे ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. घराला कुलूप लावून दवाखान्यात निघून गेले. दवाखान्यातील काम आटोपल्यानंतर ते सायंकाळी ४:३० वाजता घरी परतले. घरातील सर्व जण मुंबई येथे गेलेले असल्याने त्यांना झोप लागली. सायंकाळी ७ वाजता बोरसे…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद ते माहिजी दरम्यान २२ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सागर गणेश खडसे (वय-२२) रा. दहीगाव संत ता. पाचोरा असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सागर गणेश खडसे (वय-२२) रा. दहीगाव संत ता. पाचोरा या तरूणाने म्हसावद ते माहेजी रेल्वे अपलाईन खंबा क्रमांक ३९४/११-१२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भुसावळ, प्रतिनिधी । राज्यस्तरीय बॉक्सींग चॅम्पियनशीप स्पर्धा नुकतीच बुलढाणा येथे झाली. या स्पर्धेत भुसावळ तालुका बॉक्सींग असोसिएशनच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने या खेळाडूंचा भुसावळात सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत भुसावळ तालुका बॉक्सींग असोसिएशनमार्फत 12 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. नागेश अर्जुन खरारे या स्पर्धकाने क्रीडा प्रबोधिनी, अकोला येथील बॉक्सरला नमवत सुवर्ण पदक पटकावल्याने त्याची कर्नाटक येथे होणार्या राष्ट्रीय एलिट मेन बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाल्याने खरारे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मो.साजीद, साकेत तायडे, शुभम निकम, मंगेश सावत, सिद्धार्थ सपकाळे, महेश खरात, चेतन आव्हाड, नागेश खरारे, अजय सपकाळे, शेख मोहम्मद जैद, अक्षय मोरे तसेच कोच अनिल सपकाळे, रोहित जंजाळे आदींचा…
जळगाव, प्रतिनिधी । ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेप्रसंगी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही जिल्हाध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी केली. आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल…
जळगाव, प्रतिनिधी । ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना अतिशय उत्तम असून देऊळवाडेकरांनी याच्या माध्यमातून एकजुटीचे दर्शन घडविले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून गावातील एकोप्याला चालना मिळत असल्याने इतर गावांनी देखील याचा आदर्श घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील देऊळवाडे येथील गणरायाची आरती केल्यानंतर बोलत होते. दरम्यान, पालकमंत्र्यांच्याच हस्ते गावातील विविध विकासकामांचे भूमिपुजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना देऊळवाडेत आधीच विकासकामे सुरू असून लवकरच उर्वरित कामांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.याबाबत वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील देऊळवाडे येथील ग्रामस्थांनी ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेच्या अंतर्गत गावामध्ये एकाच गणरायाची स्थापना केली आहे. पालकमंत्री…
जळगाव, प्रतिनिधी । भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, शिक्षण फी, परीक्षा व इतर शैक्षणिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृतीचे अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाइन पध्दतीने अभ्यासक्रम शिकवला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून शिष्यवृत्तीचे अर्ज…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना त्यांच्या या निर्णयामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. ई-किराणा व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा कंपनीने केल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. फूड डिलिव्हरीसह किराणा मालाची विक्रीही झोमॅटोने सुरु केली होती. झोमॅटोने नुकताच किराणा मालाची डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गौरव गुप्ता झोमॅटोचे पुरवठा प्रमुख होते. एक मेल पाठवत कंपनी सोडत असल्याचे गौरव गुप्ता यांनी जाहीर केल्याचे मनीकंट्रोलने आपल्या वृत्तात म्हटले आहे. कंपनीत सहा वर्षे टॉप एक्झिक्युटिव्ह म्हणून घालवल्यानंतर आता एक नवीन अध्याय सुरु करणार असल्याचे त्यांनी…
इस्लामाबाद, वृत्तसंस्था । पाकिस्तानमध्ये शालेय पातळीवर शिकवणाऱ्या शिक्षकांना जीन्स व टी शर्ट परिधान करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच शिक्षिकांनाही त्यांनी घट्ट कपडे परिधान करू नयेत असे आदेश जारी करण्यात आले आहेत. देशाच्या शिक्षण महासंचालकांनी या बाबतचे पत्र सर्व शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य यांना पाठवले आहे. पाकिस्तानमधील शाळांमध्ये शिकवण्याचे काम करणाऱ्या महिलांना जीन्स व टी शर्ट घालण्यात प्रतिबंध करण्यात आला आहेच शिवाय असे काम करणाऱ्या पुरुषांनाही शाळेत जीन्स व टी शर्ट घालता येणार नाहीत अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शिक्षकवर्गाने नियमित काळामध्ये केस कापणे दाढी करणे नखे कापणे आणि स्वछता राखणे आणि अत्तराचा वापर करणे अनिवार्य असल्याचेही…