जळगाव, प्रतिनिधी । सोमवारी मध्यरात्रीपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून धरणांचा साठा वाढला आहे. बोरी धरणाचे १२ दरवाजे उघडून मंगळवारी विसर्ग करण्यात आला. सध्या बोरी धरणाची पाणी पातळी २६७.१० मीटर असून, मंगळवारी दुपारी १ वाजता धरणाचे १२ दरवाजे .०१५ मीटरने उघडून ५४१२ क्युसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे बोरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारपर्यंत तालुक्यात ९०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बहादरपूर, शिरसोदे, महालपूर या गावांना जोडणाऱ्या फरशी पुलावर पाणी वाहत असल्याने मंगळवारी या गावांचा संपर्क तुटला होता. परिणामी या परिसरातील नागरिकांना दळवेल, मुकटीमार्गे पारोळा येथे यावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाचे मोठे…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । कोरोना ओसरत असल्याने थाळीचा भाव पूर्वपदावर कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये गरीब व गरजू लोकांना जेवणाची सोय व्हावी या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध करून दिली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवभोजन थाळी दर पूर्वीप्रमाणे दहा रुपये प्रतिथाळी इतका करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून थाळीसाठी दहा रुपये मोजावे लागणार आहेत. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. अनेकांचे रोजगार गेले होते. परगावी राहणाऱ्या तसेच हातावर पोट असलेल्या अनेक लोकांचे खाण्याचे हाल होत होते. याच काळात महाराष्ट्रातून लाखो परप्रांतीय मजुरांनी पायी आपल्या गावाची वाट धरली होती. त्या वेळी…
मुंबई, वृत्तसंस्था । अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयातील सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली करण्यात आली आहे. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील प्रकरणे सध्या मुंबईचे कार्यालय हाताळत असताना ही बदली करण्यात आली आहे. सत्यव्रत कुमार हे ईडीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाने कार्मिक विभागाकडे पाठविला होता. त्यास मंजुरी देण्यापूर्वी केंद्रीय दक्षता आयोगाची मान्यता घ्यावी लागते. केंद्रीय दक्षता आयोगाच्या अध्यक्षांच्या समितीने हा प्रस्ताव अमान्य केला. त्यामुळे दीर्घकाळ मुंबईत राहिलेले सत्यव्रत कुमार हे त्यांच्या मूळ विभागात (कस्टम आणि केंद्रीय अबकारी) परत जातील. सत्यव्रत कुमार यांना सहसंचालक पदावर कायम ठेवत सहा महिन्यांपूर्वी दिल्लीत ईडी संचालकांचे सल्लागार ही जबाबदारी देण्यात आली…
मुंबई, वृत्तसंस्था । आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी सरकार आणि बँकांकडून सातत्याने नियमांमध्ये बदल केले जात असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात अगदी दर महिन्याला आर्थिक व्यवहारांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या नियमांत बदल होत असतो. येत्या 1 ऑक्टोबरपासून आर्थिक व्यवहारांबाबत असेच काही बदल होऊ घातले आहेत. * 1 ऑक्टोबरपासून एटीएम/डेबिट कार्ड वार्षिक देखभाल शुल्क 125 रुपये अधिक जीएसटी असेल. हे शुल्क 1 ऑक्टोबर 2021 आणि 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी लागू असतील. याशिवाय, पोस्टाकडून आता आपल्या डेबिट कार्डधारक ग्राहकांकडून एसएमएस अलर्टसाठी 12 रुपये (जीएसटीसह) आकारले जातील. हे शुल्क डेबिट कार्डधारकांना पाठविलेल्या एसएमएस अलर्टसाठी वार्षिक शुल्क असेल. * तुम्ही पोस्टाचे एटीएम…
यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेतर्फे ठेकेदाराने गेल्या तीन महिन्यापूर्वी अतिरिक्त साठवण तलावाचे जे बांधकाम केले त्या कामात सुमारे1कोटी80 लाख रुपयाचा भ्रष्टाचार,गैरप्रकार झाल्याबाबतची तक्रार यावल नगरपरिषद अध्यक्षा आणि इतर काही नगरसेवकांनी केल्याने यावल नगरपालिकेतील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि.27सप्टेंबर2021 रोजी दिलेल्या तक्रार अर्जात यावल नगरपरिषद अध्यक्षा सौ.नोशाद तडवी,नगरसेवक मनोहर बाबुराव सोनवणे,सैय्यद युनूस सैय्यद युसुब,नगरसेविका रजीयाबी गुलाम रसूल,शेख सईदाबी हारून,खान शमशाद बेगम महंमद खान यांनी दिलेल्या लेखी तक्रार अर्जात म्हटले आहे की नवीन साठवण तलाव यावल हा एकूण तांत्रिक मंजुरी रक्कम3कोटी51लाख56 हजार रुपयाचा मंजूर होऊन निविदा रक्कम2कोटी84लाख38हजार 516 असून सदर कामात सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराचे नियोजन करत सुमारे1कोटी80 लाख रूपये…
यावल, प्रतिनिधी । हजारो नागरिकांचे आणि दादा भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीचा श्राध्द सोहळा कार्यक्रम गुरुवार दि.30सप्टेंबर2021रोजी यावल तालुक्यातील मनवेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. धुनीवाले दादाजी दरबार मनवेल 30सप्टेंबर रोजी सकाळी7 वाजता आरती,8वाजता सेवा, दहा वाजता होम,हवन,सेवा व दुपारी12वाजे पासून महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणूक,रात्री8वाजता महाआरती व रात्र भर ठिक ठिकाणाहुन आलेल्या दादा भक्त गण भजन गायनच्या कार्यक्रम होणार आहे. श्री.रेवानंद स्वामी यांनी मनवेल येथे काही दिवस वास्तव्य केले आहे.भाद्रपद महिन्यात अविधवा नवमीला त्यानी1939या वर्षी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील अंबाडा या गावी समाधी घेतली…
यावल, प्रतिनिधी । दि. 28 मंगळवार रोजी सकाळी11 वाजेच्या सुमारास पंचायत राज समिती जळगावहुन विदगाव मार्गे यावल येत असताना रस्त्यात थांबुन डांभुर्णी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली तसेच इयत्ता चौथी नंतर पाचवीचा वर्ग का सुरू केला नाही याचा संबंधितांना जाब विचारला तसेच डांभुर्णी जिल्हा परिषद शाळे जवळ रस्त्यावरील माटीयुक्त गाऱ्यामध्ये/किचडात पंचायत राज समितीचे वाहन अडकल्याने तसेच पंचायत राज समितीचेच दुसरे एक वाहन संरक्षण भिंतीवर आदळल्याने ग्रामीण भागात शासनाचा,यावल पंचायत समिती अधिकारी,बांधकाम कनिष्ठ शाखा अभियंता,कर्मचारी ग्रामसेवकांचा कसा भोंगळ कारभार सुरू आहे हे पंचायतराज समितीच्या प्रत्यक्षात लक्षात येऊन अनुभव आला यामुळे एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे या…
मुंबई, प्रतिनिधी । धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना वाढली पाहिजे असे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. धुळे-नंदुरबार जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील दादर येथील सेना भवनात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, धुळे जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित, हेमंत साळुंखे, नंदुरबार जिल्हा प्रमुख आमशा दादा पाडवी, सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी शिवसेना उपनेते तथा…
जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब जळगाव ईस्ट आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विदयमाने “डायबेटिस ला हरवू या” या मोफत शिबिराचे आयोजन २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कांताई रुग्णालयात करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांची शुगर लेव्हल, शुगर लेव्हल जास्त असल्यास जास्त झालेल्या शुगर ला नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णांची मोफत तपासणी फिजिशियन डॉ.मंदार पंडित, तसेच त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अमेय कोतकर आणि नेत्र तपासणी कांताई रुग्णालयातील डॉक्टर करतील. गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब जळगाव ईस्ट चे अध्यक्ष सीए वीरेंद्र छाजेड, सचिव प्रणव मेहता आणि कांताई नेत्रालयाचे अमर चौधरी यांनी केले.
जळगाव, प्रतिनिधी । गेल्या महिनाभरापासून चाळीसगाव शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नदी किनाऱ्यावरील नागरीक तसेच व्यापारी, व्यावसायिकांना कोट्यावधी रुपयांचे नुकसानीस सामोरे जावे लागले होते. शहरातून जाणाऱ्या डोंगरी व तितूर नदीच्या प्रवाहाला दयानंद ते सदानंद पुलामुळे बंधाऱ्याचे स्वरूप आले होते. कमी उंची आणि पुलाखालून कमीत कमी मोऱ्या असल्याने पाणी अडवले जात असल्याने हे पाणी गल्लीबोळात जाऊन व किनाऱ्यावरील व्यापारी आस्थापनांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचत होते. गेल्या पाच पुरांमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान शहर व तालुक्यात झाले होते. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ही वस्तुस्थिती सांगितल्याने ना.गडकरी यांनी तात्काळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून पुलाला मंजुरी…