Author: saimat team

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील भरधाव लक्झरी व मालवाहू छोटा हत्ती वाहनांची समोरा – समोर धडक झाल्याने चालक जागीच ठार झाला आहे व दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बाजार पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भरधाव लक्झरी व मालवाहु छोटा हत्ती पिकअप वाहनात समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात पिकअप वाहनातील धुळ्याच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन सह प्रवासी जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. सुदैवाने लक्झरी उलटली नाही अन्यथा मोठी जीवीत हानी होण्याची भीती होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळ येथून महेंद्र ट्रॅव्हल्सची लक्झरी (जी.जे.19 एक्स.9596)…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । वावडदा येथे आज सकाळी ४.१५ मुसळधार पाऊस झाल्यामुळे जळगाव ते मनमाड महामार्ग वावडदाजवळील गलाठी नाल्याच्या पुलाहुन पाणी वाहत असल्यामुळे ह्या मार्गावरील वाहतुक सकाळी ५ ते १२.३० पर्यंत बंद होता हा नाला वरी पुलाचे काम गेल्या वर्षापासून चालु आहे. तरी समंधीत ठेकेदार याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. सदर ह्या हप्तात दोन वेळा ही वाहतुक ठप्प झाली होती, सदर ह्या पुलाचे काम ८० टक्के पुर्ण झाले आहे संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री स्व. लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री स्व. लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, भुसंपादन अधिकारी किरण सावंत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ हे घर अशी ओळख . सातत्याने गावठी पिस्तूल आढळून येणे , वर्षभरात खुना सारख्या गंभीर अपराधांचा वाढता आलेख , सिनेस्टाइल हत्त्या व अपराध . यामुळे शहरात भीतीचे वातावरण. पण उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी येथील गुन्हेगारीचा अभ्यास करून त्यावर अंकुश लावण्याचा उपाय सुरु केला आहे. शहरात गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. भुसावळकरावर गुन्हेगारांची दहशत बसत होती. शिस्तप्रिय डीवायएसपी वाघचौरे साहेबानी अपराध्यांच्या कुंडलीच बनविल्या . उपद्रवी लोकांना हद्दपार करण्यासाठीचा बंदोबस्त केला. नामांकित लोक हद्दपार व्हायला सुरुवात झाली आणि शहरात शांतता नांदायला प्रारंभ झाला. अपराध्यावर कायद्याची जरब बसायला सुरुवात झाली. वाघचौरे यांच्या अगोदरही कर्तव्यदक्ष अनेक…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जनावरांमध्ये अचानक ताप व त्वचेवर गाठी येत असल्याने पशुपालन शेतकरी बांधव चितांग्रस्त झाले आहेत. लम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुधनापासून इतर जनावरांना संसर्ग होऊ नये. यासाठी तातडीने गावपातळीवर लसीकरण मोहीम राबवावी धास्तावलेले पशुपालकांना दिलासा द्यावा. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. आपल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नमूद केले आहे की सद्यस्थितीत जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार आहे. यात संकरीत जनावरांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथीना सूज येणे, साधारणतः एक आठवडाभर भरपूर ताप येणे,…

Read More

सातारा, वृत्तसंस्था । करोना काळानंतर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांचा दरवाजा सोमवारी (दि. ४) उघडला जाणार आहे. परिणामी २२८0 शाळांची घंटा वाजणार असून यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि गावपातळीवर कार्यरत ग्रामशिक्षण समितींनी आवश्यक ती तयारी सुरु केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या २ हजार ८८ तर शहरी भागातील आठवी ते बारावीच्या १९२ शाळा असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली. जिल्ह्यात फेब्रुवारी २0२0 पासून शाळा, कॉलेज बंद आहेत. शाळांचे निकाल जुन्या निकालांच्या आधारे लावण्यात आले. दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल नववी आणि अकरावीच्या गुणांवर आधारित देण्यात आले. दरम्यान, २०२१ मध्ये काही प्रमाणात…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । महात्मा गांधी यांची आज 152वी जयंती, पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपित्याला अभिवादन. राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 152 वी जयंती आहे. यावेळी देशभरात अनेक कार्यक्रम होतात. महात्मा गांधींच्या कार्याचा गौरव केला जातो. 2 ऑक्टोबरला राष्ट्रीय सुट्टी असते, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींचं योगदान फार मोठं आहे, त्यांच्या अहिंसेच्या मार्गाने सगळ्या जगाला प्रभावित केलं, हे आपल्या सर्वांना माहित आहे. भारतात महात्मा गांधींची जयंती हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो,मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरही महात्मा गांधींच्या जयंतीला फार महत्त्व आहे. जगभरात 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी(१ ऑक्टोबर) महावितरणने निकाल जाहीर केला आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या आर्थिक दुर्बल घटक वगळता इतर सर्व प्रवर्गातील ४५३४ उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे डॉ. राऊत यांनी ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे. “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडी सरकारतर्फे बेरोजगार युवकांना विद्युत सहाय्यक नोकरीची ही भेट देण्यात आली आहे. विविध न्यायालयीन प्रक्रियेत हा निकाल प्रदीर्घ काळ अडकला होता. या विषयावर विविध बैठका घेऊन व कायदेतज्ञांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा सूचना मी…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेने बांधकाम केलेल्या अतिरिक्त साठवण तलावाच्या बांधकामात गैरप्रकार,भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अध्यक्षा सौ.नौशाद तडवी यांनी व त्यांच्या काही मोजक्या सहकारी नगरसेवकांनी केली असली तरी न्यायालया मार्फत चौकशी झाल्यास फिर्यादी हेच आरोपी होऊ शकतात तसेच यावल नगरपरिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती म्हणून आरक्षण असल्याने तसेच अनुसूचित जमातीच्या अध्यक्षा सुरेखा कोळी या अपात्र ठरल्याच्या कारणावरुन अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानंतर नगरपरिषद सदस्यांमध्ये एकमेव असलेल्या अनुसूचित जमातीच्या सदस्या सौ.नौशाद मुबारक तडवी यांच्या निवडीसाठी मी स्वतः तसेच नगरसेवक राकेश कोलते अनुक्रमे सूचक,अनुमोदक झालेले आहेत त्यामुळे त्यांच्याबाबत कधी गैरसमज, मतभेद नव्हते आणि नाहीत.तरी सुद्धा त्यांनी अतिरिक्त साठवण तलाव बांधकामाबाबत खोटी तक्रार करून तसेच…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा जळगाव शहरातून जातो. तर शहराच्या बाहेर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच महाविद्यालय व काही प्रायव्हेट कंपन्या आहेत. याठिकाणी नियमित विद्यार्थी, शिक्षक व कामगार ये-जा करीत असतात. तर बांभोरी गावापासून ते थेट पाळधी बायपास पर्यंत मुख्य महामार्गाच्या अगदीकडेला काही दुकानदारांनी दुकाने थाटल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे उदाहरण आज सायंकाळी 5 वा. समोर आले आहे. शहरातून धुळेकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं.6 वरबांभोरी गावापासून ते पाळधी बायपासपर्यंत भरपूर हॉटेल्स्‌ची अवैध पार्किंग तसेच रस्त्याच्या कडेला काही दुकानदारांनी खेळण्याचे साहित्य तसेच विविध वस्तू विक्रीचे दुकाने थाटले आहेत. त्यामुळे जाणारे येणारे या दुकानातून वस्तू घेण्यासाठी गाडी थांवितात परंतु त्या…

Read More