Author: saimat team

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दहशतवादी कृत्यासंबंधी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (वय ५०) असं संशयित दहशतवाद्याचा नाव आहे. एटीएसने दोन संशयित दहशतवादी झाकीर हुसेन शेख आणि रिझवान मोमीन यांना ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवसांनी, एटीएसने गुरुवारी या प्रकरणात पुन्हा तिसरी अटक केली. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (५०) या संशयिताला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. एटीएसने उघड केले की, झाकीर आणि रिझवानच्या चौकशी दरम्यान अली शेखच्या भूमिकेबद्दल सांगितले. त्यानंतर त्याला नागपाडा येथील एटीएसच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आणि गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. एका सुत्राने सांगितले, “सतत चौकशी केल्यानंतर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । चप्पल विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या १५ हजार रूपये किंमतीच्या गोणीभर चप्पल, सॅंडल लंपास केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी घडली होती, याप्रकरणी शहर पोलिसांनी त्या चोरट्यांना २९ रोजी सायंकाळच्या सुमारास अटक केली आहे. जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी जुबेर युसूफ शेख (वय २७) हा फुले मार्केट परिसरात हातगाडीवर चप्पल, सॅंडल विक्रीचा व्यवसाय करतो. मंगळवार २८ रोजी दुपारी १२ वाजता काँग्रेस भवन, फुले मार्केट गेट जवळ दुकान लावले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्याने सर्व माल ६ गोणीत भरून त्याने समोर असलेल्या दु.क्र.१२८ च्या बाहेर ठेवून घरी निघून गेलो. दुकान मालक अजय चौधरी यांना सांगून जुबेर घरी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब जळगाव ईस्ट आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विदयमाने ” चला मधुमेह ला हरवू या” या मोफत शिबिरात २९३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे शिबिर कांताई रुग्णालय आणि जैन इरिगेशनच्या बांभोरी येथील आस्थपनेत झाले. या शिबिरात रुग्णांची शुगर लेव्हल, शुगर लेव्हल जास्त असल्यास जास्त झालेल्या शुगरला नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. डॉ.राहुल भन्साळी, डॉ. डॉली रणदिवे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अमेय कोतकर आणि नेत्र तपासणी कांताई रुग्णालयातील डॉक्टरांनी केली, अशी माहिती रोटरी क्लब जळगाव ईस्टचे अध्यक्ष सीए वीरेंद्र छाजेड, सचिव प्रणव मेहता यांनी दिली. शिबिर यशस्वीतेसाठी कांताई नेत्रालयाचे अमर चौधरी, तसेच डॉ. जगमोहन छाबडा, संग्राम…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । तालुका ग्रामिण काँग्रेस कमिटीच्यावतीने आज उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असल्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुका काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, सचिन माळी, निलेश बोरा, भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, मुरली सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या अतिरीक्त साठवण तलावाच्या बांधकामात पावणदोन कोटी रुपयाच्या भ्रष्टाचार गैरप्रकार आणि अपहाराच्या आरोपाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी येथील तालुका भाजपाच्या वतीने बुधवार दि.29 रोजी येथील भाजपा शहर कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतुन केली आहे. नगराध्यक्षा सौ.नौशाद मुबारक तडवी यांनी दोन दिवसापुर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेवुन त्यांचेकडे यावल नगरपालिकेने उभारलेल्या अतिरिक्त साठवण तलावाचे कामात 1 कोटी 80 लाख रुपयाचा अपहार केल्याची लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली. या नगराध्यक्षांनी केलेल्या या भ्रष्ठाचाराच्या चौकशी मागणीस6 भाजपाने समर्थन करीत घडलेल्या या भ्रष्ठाचाराचा जाहीर निषेध करून भाजपने या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी…

Read More

यावल, प्रतिनिधी । माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राचार्य मुख्याध्यापक सर्व अनुदानित माध्य व उच्च माध्य शाळांना लेखी सूचना देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा दुस-या हप्त्या देण्याची कार्यवाही करावी असे कळविले आहे परंतु प्रत्यक्षात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दुसरा हत्ता मिळत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जिल्हयामधील सर्व खाजगी अनूदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सेवानिवृत्त कर्मच-यांना सातवा वेतन आयोग दुस-या हफ्त्याची देयके दिलेल्या तारखाना सादर करावी.ज्या शाळेतील कर्मचारी यांची भ.नि.नि.जमा करावयाची पहिल्या हफ्त्याची देयके तरतूद आभावी कार्यालयाकडे प्रलंबित असतील ती सर्व देयके कार्यालयातून परत घेऊन त्यातील सेवानिवृत्त कर्मच-यांची पहिल्या ह्फ्त्याची देयके रोखीने सादर करावी.तालुका देयके सादर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भारत सरकार मान्यताप्राप्त. भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटना. महाराष्ट्र राज्य. जळगाव. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब रघुनाथरावजी कांबळे साहेब. यांनी कुर्डूवाडी जि.सोलापूर.नगरपरिषदेचा जवळजवळ पाचशे कोटी रुपयांचा रुपयांचा घोटाळा पुराव्यासहित उघडकीस आणून सुद्धा शासन प्रशासनाने संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई गुन्हा,अथवा एफ.आय.आर.ची नोंद पुरावे असल्यावर सुद्धा केलेली नाही. संस्थापक अध्यक्ष यांनी सदर पुरावे पोलीस प्रशासनापासून तर संबंधित आणि जबाबदार अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा गुन्ह्याची नोंद झालेले नाही. या कारणास्तव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अध्यक्ष. उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष यांचे आदेशानुसार लाक्षणिक उपोषण दि 30 गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंर्तगत इकरा युनानी मेडीकल कॉलेजतर्फे दि. २९ बुधवार रोजी मेडीकल कॅम्पचे शिरसोली येथे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष अ. करीम सालार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिरसोलीचे सरपंच हिलाल भील, उपसरपंच श्रावण शंकर ताड़े व ग्रामपंचायत सदस्य विनोद बारी, शशिकांत बारी, गौतम चौरे, सुभाष बारी, भगवान बोबड़े, ग्रामसेवक सुनिल दांडगे, नानाभाऊ पाटील, वनाभाऊ बारी, उमेश माळी, सुनिल बारी यांचे पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाचे उप- प्रचार्य डॉ. शोएब शेख यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉक्टर व हॉस्पीटलचे कर्मचारी उपस्थीत होते. शिरसोली येथील बारी समाज मंगल कार्यालयात आरोग्य शिबीराचे आयोजन…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जास्त नुकसानी झालेल्या परिसरात सरसकट पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना शासकीय नियमानुसार मदत प्रदान करण्याचे निर्देशही ना.गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बर्‍याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा महापूर आला असून इतर तालुक्यांमध्येही मुसळधार पावसामुळे शेतीची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यातील वाघूर, बोरी आणि अंजनी ही धरणे पूर्ण भरली असून गिरणा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. या…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पेट्रोल आणि डिझेलचे दर आज वाढले आहेत. आज दिल्लीमध्ये, जिथे पेट्रोलचे दर 25 पैसे प्रति लीटरने वाढून 101.64 रुपये प्रति लीटर झाले. त्याचबरोबर डिझेलचा दर 30 पैसे प्रति लीटर वाढून 89.87 रुपये प्रति लीटर झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सुधारित करतात आणि रोज संध्याकाळी 6 पासून पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर जारी करतात. महानगरांमधील आजचे नवीनतम दर जाणून घ्या आता दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 101.64 रुपये आहे. तर 1 लीटर डिझेल 89.87 रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे. आता…

Read More